शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शाळेतच मुक्काम ठोकलेल्या चोरट्यांनी विद्यार्थिनीवर उगारला सुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 22:09 IST

Wardha News वर्धा जिल्ह्यातील हुसनापूरच्या शाळेत दडून बसलेल्या चोरट्यांना पाहून न घाबरता चोर चोर असे ओरडत सगळ्यांना सावध करणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थिनीने मंगळवारी आपल्या धाडसाचा नमुना दाखवला.

ठळक मुद्देचिमुकलीच्या धैर्याचे कौतुक चोरटे झाले पसार; हुसनापूर येथे दहशत

वर्धा : दिवसभर शेतशिवारातून काम करून आलेले नागरिक झोपी गेले असता गावात आलेल्या चोरट्यांनी चोरीचा सपाटा लावला. दोन घरी हात साफ करून गावातील शाळेचा आश्रय घेत रात्र काढली. सकाळी शाळा सुरू होताच एका चिमुकलीची नजर या चोरट्यांवर पडताच चोरट्यांनी तिच्यावर सुरा उगारला. पण, तिने मोठ्या धैर्याने ‘चोर.. चोर...’ अशी आरोळी ठोकताच त्यांनी धूम ठोकली. ही एखाद्या कथानकाप्रमाणे वाटणारी घटना देवळी तालुक्यातील हुसनापूर येथे घडली असून, या चोरट्यांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागपूर ते यवतमाळ या राष्ट्रीय महामार्गालगत दोनशे ते अडीचशे लोकवस्तीचे हुसनापूर हे गाव आहे. या गावातील नागरिक शेती व मोलमजुरी करतात. चोरट्यांनी १ जानेवारीच्या रात्रीला दिलीप वाहारे यांच्या घरी ५० हजार रुपयांच्या ऐवजावर हात साफ केला, तर सुधाकर वाघमारे यांच्या घरातील सर्व सदस्य बाहेरगावी गेले असता त्यांच्या घरातील मुद्देमाल पळविला. दुसऱ्या दिवशी चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी रात्रीला गस्त घालायला सुरुवात केली. त्यानंतर ३ जानेवारीला चार ते पाच अनोळखी व्यक्ती गावात आढळून आल्याने गस्तीवर असलेल्या नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला तर ते अंधाराचा फायदा घेऊन शाळेच्या शौचालयात दडून बसले. ग्रामस्थांनी सर्वत्र शोधाशोध करूनही थांगपत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता गावातील विद्यार्थी शाळेत गेले असता वर्ग चौथीतील विद्यार्थी तनू गणेश वाहारे, कार्तिक तोडासे, नयन महाजन यांनी नेहमीप्रमाणे वर्गाची साफसफाई करायला निघाले. तेव्हा तोंडाला बांधून असलेले पाच व्यक्ती शौचालयाकडून पुढे आले. त्यांनी तनू या मुलीला चॉकलेट देऊ केले; पण तिने नकार देत ‘चोर... चोर’ अशी आरोळी ठोकली. चोरट्यांनी उगारलेला सुरा तिच्या दिशेने फेकत पळ काढला. सुदैवाने तनू यातून बचावली. गावकऱ्यांनी शाळेकडे धाव घेत गर्दी केली. तोपर्यंत ते पाचही चोर शाळेच्या भिंतीवरून उडी घेऊन शेताच्या दिशेने पसार झाले होते. या घटनेने गावात खळबळ उडाली असून, सर्वांनी तनूच्या धाडसाचे कौतुक केले.

तक्रार घेण्यास पोलिसांचा नकार

हुसनापूरमध्ये एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी केल्यानंतर तक्रार देण्याकरिता गेलेल्या नागरिकांची तक्रार घेण्यास देवळी पोलिसांनी नकार दिला. पोलिसांनी वेळीच तक्रार दाखल करून तपास केला असता तर चोरट्यांचा गावात मुक्काम राहिला नसता, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांप्रति गावामध्ये रोष व्यक्त होत आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी