शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील गोदामात जागा नाही; शेतमाल खरेदी वांध्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 14:46 IST

शासनाने निर्धारित केलेली गोदाम फुल्ल झाल्याने सध्या जिल्ह्यात कापूस खरेदीला ब्रेक लागले आहे तर नाफेडची चणा खरेदी बंद होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देपावसाळ्याच्या तोंडावर कापूस, चणा विकण्याची शेतकऱ्यांना चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास दीड महिना कापूस खरेदी ठप्प राहिल्याने आता पावसाळ्याच्या तोंडावर कापूस खरेदी अडचणीत आली आहे. कापसाशिवाय चणा विक्रीची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. शासनाने निर्धारित केलेली गोदाम फुल्ल झाल्याने सध्या जिल्ह्यात कापूस खरेदीला ब्रेक लागले आहे तर नाफेडची चणा खरेदी बंद होण्याच्या मार्गावर आहे.वर्धा जिल्ह्यात कापूस व सोयाबीन हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असून यावर्षी २२ मार्चनंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील व्यवहार ठप्प झाला. कापसाची सुरू असलेली खरेदी बंद पडली. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस विकता आला नाही. त्यानंतर लॉकडाऊन शिथील झाल्यावर कापूस खरेदीचे काम सीसीआय व व्यापाऱ्यांकडून सुरू करण्यात आले. मात्र, सीसीआयचा भाव ५ हजार ३०० रुपये क्विंटलवर असल्याने अनेकांनी सीसीआयलाच कापूस देण्यास पसंती दाखविली. दरम्यान, अनेक जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीतील परप्रांतीय मजूर बाहेरगावी निघून गेले. त्यामुळे कापूस खरेदीचे कामही रेंगाळले. जिनिंगमध्ये असलेल्या कापूस गाठी आणि सरकी ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने पावसाचे कारण पुढे करीत जिल्ह्यातील मोठ्या बाजार समितीतील कापूस खरेदी थांबविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. व्यापाऱ्यांकडे ४ हजार ३०० रुपये भाव आहे. तशीच परिस्थिती हरभरा व तूर खरेदीची आहे. अद्याप हरभरा व तूर शेतकऱ्यांकडे पडून आहे. बºयाच ठिकाणी जागा नसल्याचे कारण देत ही खरेदी थांबविण्यात आली आहे. पालकमंत्री सुनील केदार यांनी येत्या पंधरा दिवसात ही खरेदी आटोपा, अशा सूचना दिल्या आहेत.

दोन हजार शेतकऱ्यांकडून ३४ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदीजिल्ह्यात एकूण ११ हजार १४७ शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नाफेड व महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनकडे नोंदणी केली आहे. त्यापैकी २ हजार ४५८ शेतकऱ्यांकडील हरभऱ्याची विक्री झाली असून आतापर्यंत ३४ हजार ६७७ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली.कापूस चौकशीचा ससेमिराशेतकऱ्यांची अडचण लक्षात न घेता सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार खात्याकडून दररोज चौकशीला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे कापूस विक्रीची चिंता, तर दुसरीकडे चौकशीचा ससेमिरा या दुहेरी संकटात सध्या शेतकरी सापडला आहे. सीसीआयची कापूस खरेदी बंद झाल्यास व्यापारी भाव पाडतील, या भितीने शेतकरी कापूस कसा विकावा, या विवंचनेत आहेत.

जिल्ह्यात जिनिंगमध्ये असलेल्या कापूस गाठी आणि सरकी ठेवण्यासाठी खासगी तसेच औद्योगिक विकास महामंडळामध्ये रिकामी असलेली गोदामे शोधून ती सीसीआयला सरकी आणि गाठी ठेवण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.- सुनील केदार, पालकमंत्री, वर्धा जिल्हा.

टॅग्स :Farmerशेतकरी