शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

खोडमाशीमुळे यंदाही सोयाबीनची सवंगणी नाहीच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 05:00 IST

शेतकऱ्यांनी मागील वर्षी कपाशीपेक्षा सोयाबीनचा पेरा वाढविला होता. परंतु सुरुवातीला अतिवृष्टीने दगा दिला. त्यानंतर खोडकीड व चक्रीभुंगाने आक्रमण केल्याने सोयाबीनचे पीक हातचे गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी उभ्या पिकांमध्ये नांगर चालविणे किंवा जनावरे सोडण्याचा निर्णय घेतला होता. काही शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्याकरिता सोयाबीनची मळणी केली असता लागवड खर्चही भरुन निघाला नाही. बहुतांश शेतकऱ्यांना मळणीकरिता खिशातून अतिरिक्त पैसे खर्च करावे लागले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांसमोर संकट : आष्टा येथील शेतकऱ्याने दोन एकरात चालविला नांगर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/चिकणी (जामणी) : मागील वर्षीपासून सोयाबीन उत्पादकांसाठी खोडकीड कर्दनकाळ ठरत आहे. यावर्षी तरी सोयाबीनचे चांगले उत्पन्न होईल, अशी अपेक्षा होती. परंतु सुरुवातीलाच खोडकीड आणि व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षीही शेतकऱ्यांना सोयाबीन सवंगणीची वेळच येणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांनी मागील वर्षी कपाशीपेक्षा सोयाबीनचा पेरा वाढविला होता. परंतु सुरुवातीला अतिवृष्टीने दगा दिला. त्यानंतर खोडकीड व चक्रीभुंगाने आक्रमण केल्याने सोयाबीनचे पीक हातचे गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी उभ्या पिकांमध्ये नांगर चालविणे किंवा जनावरे सोडण्याचा निर्णय घेतला होता. काही शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्याकरिता सोयाबीनची मळणी केली असता लागवड खर्चही भरुन निघाला नाही. बहुतांश शेतकऱ्यांना मळणीकरिता खिशातून अतिरिक्त पैसे खर्च करावे लागले. गेल्या वर्षीचा धक्का लक्षात घेऊन यावर्षी सोयाबीनच्या लागवडीत कपात केली. परंतु यंदाही शेतकऱ्यांना पुन्हा त्याच संकटाचा सामना करावा लागत आहे. देवळी तालुक्यातील चिकणी, जामणी, पढेगाव व दहेगावसह इतरही गावांमध्ये सोयाबीनवर खोडकीडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पीक पिवळे पडायला लागले असून वाचविण्यासाठी धडपड सुरु आहे. वर्धा तालुक्यातही हीच परिस्थिती असून लगतच्या आष्टा येथील शेतकरी किशोर गुरनुले यांनी खोडकिडीच्या प्रादुर्भावाने दोन एकरातील सोयाबीनमध्ये नांगर चालविला.

पाण्याचा ताण, पुरेसा ओलावा नसताना तणनाशकाची फवारणी, चुनखडीयुक्त जमीन आदी कारणांमुळे सोयाबीन पिवळे पडत आहे. शेतकऱ्यांनी प्रादुभार्वाचा प्रकार लक्षात घेऊन चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या शेतात चिलेटेड फेरस सल्फेट किंवा मिश्र सुक्ष्म अन्नद्रव्य अधिक २ टक्के किंवा १९:१९:१९ या विद्राव्य खताची फवारणी करावी. तसेच खोडमाशी, चक्रीभुंगा, पांढरीमाशी याकरिता शिफारशीप्रमाणे कीटकनाशकाची फवारणी करावी.एस.एस. ढुमने, कृषी सहायक चिकणी/पढेगाव,

अडीच एकरात सोयाबीनची पेरणी केली. पेरणीही उत्तम प्रकारे साधली, पण कोवळी रोपटे असतानाच खोडकीड व व्हायरसचा प्रादुर्भाव झाला. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार फवारणी सुद्धा केलीत. तरीही पीक वाचवू शकलो नाही. यातील अर्धेअधिक झाडे नष्ट झालीत.भास्कर काकडे, शेतकरी चिकणी

गेल्यावर्षी आठ एकरात केवळ दीड क्विंटल सोयाबीन झाल्याने खर्चही निघाला नाही. यावर्षी दोन एकरामध्ये सोयाबीनची लागवड केली असता यंदाही खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला. परिणामी दोन एकरातील सोयाबीनवर नांगर चालवावा लागला. किशोर गुरनुले, शेतकरी,आष्टा

 

टॅग्स :agricultureशेती