शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

हिटरलशाहीमुळे ‘अच्छे दिन’ नाही

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

निवडणुकीच्या प्रचारात देशातील नागरिकांना विविध प्रकारची आश्वासने देत देशात अच्छे पाहायला मिळतील, ....

एम.एम. शेख यांचा बैठकीतून आरोप पुलगाव : निवडणुकीच्या प्रचारात देशातील नागरिकांना विविध प्रकारची आश्वासने देत देशात अच्छे पाहायला मिळतील, अशी ग्वाही भाजपाने दिली; पण सत्तेत आल्यानंतर दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती करण्याऐवजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटरलशाही डोळ्यापुढे ठेवून देशाचा कारभार चालवित आहे. मग, देशात अच्छे दिन कसे येणार? असा प्रश्न काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष एम.एम. शेख यांनी उपस्थित केला.वर्धा जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते पूढे म्हणाले की, भाजपा सत्तेत आल्यावर त्यांना अल्पसंख्याक समाजाचा विसर पडला; पण काँग्रेस सत्तेत असो वा नसो, पक्ष सतत अल्पसंख्याक समाजासोबतच आहे. देशात अनेक प्रश्न, अनेक समस्या आहेत, त्याकडे भाजपाचे दुर्लक्ष होत आहे. केवळ त्यांना काँग्रेसमुक्त भारत करण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. ते कधीच पूर्ण होणार नाही. देशवासियांपुढे १५० वर्षांचा काँग्रेसचा इतिहास आहे. तो कधीच विसरला जाणार नाही, असा आत्मविश्वास व्यक्त करीत ११ एप्रिल रोजी नागपूरला काँग्रेस अध्यक्ष सोनिया येणार असून त्या कार्यक्रम उपस्थित राहण्याचे त्यांनी आवाहन केले. याप्रसंगी विभागाचे प्रदेश महासचिव नहीम शेख, काँगे्रसचे शहराध्यक्ष रमेश सावरकर, नगराध्यक्ष मनीष साहू, महिला काँगे्रस शहर अध्यक्ष रंजना पवार, हमीदभाई, डॉ. खान आदी उपस्थित होते. बैठकीचे संचालन आणि प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष शब्बीर पठाण यांनी केले. बैठकीला शकील खान, अब्दुल जलील, मृणाल सोनी, बबलू शुक्ला, मुन्ना, सिद्दीकी, सहारे, लोखंडे, युसूफभाई यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)