शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

प्रयत्नात सातत्याशिवाय ध्येय प्राप्ती नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:03 IST

अद्ययावत तंत्रज्ञान सर्व क्षेत्रात विस्तारत असताना केवळ एका क्षेत्रापुरते ज्ञानाला सिमित ठेवून चालणार नाही. चौफेर असे ज्ञान विद्यार्थ्यांनी संपादीत करणे गरजेचे आहे. अद्यायावत तंत्रज्ञानामध्ये ज्ञानाच्या परिभाषा बदलल्या आहेत.

ठळक मुद्देआर.एस. कडू : बापुराव देशमुख अभियांत्रिकीतील राष्ट्रीयस्तरीय परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : अद्ययावत तंत्रज्ञान सर्व क्षेत्रात विस्तारत असताना केवळ एका क्षेत्रापुरते ज्ञानाला सिमित ठेवून चालणार नाही. चौफेर असे ज्ञान विद्यार्थ्यांनी संपादीत करणे गरजेचे आहे. अद्यायावत तंत्रज्ञानामध्ये ज्ञानाच्या परिभाषा बदलल्या आहेत. याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा. कुठलेही क्षेत्राची निवडही त्यात कौशल्य विकसित करता आले पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द आणि प्रयत्नामध्ये सातत्य ठेवले तर अवघड असे काही नाही, असे प्रतिपादन डॉ. आर. एस. कडू यांनी केले.सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशनच्यावतीने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात अप्लीकेशन आॅफ मेकॅनिकल इंजिनिअरींग (ए.एम.ई १८) या विषयावर सहाव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.व्यासपीठावर प्राचार्य डॉ. जी.व्ही. ठाकरे, डॉ. सुहास कोंगरे, विभाग प्रमुख डॉ. एम. जे. शेख, प्रा. आर. जे. डहाके, प्रा. राजेश ठाकरे, प्रा. योगेश महंतारे, प्रा. जी.पी. ढलवार यांची उपस्थिती होती.डॉ. कडू पुढे म्हणाले, कुठलाही विषय किंवा क्षेत्र निवडा; पण त्यात कौशल्य विकसित करा. स्पेशालिटी निर्माण झाली पाहिजे. त्यांनी स्वत: कंपनीचे अनुभव आणि कार्यपद्धती सांगितली. सिव्हील इंजि. सोडून पोलिटेक्निक मध्ये मेकॅनिकला प्रवेश घेतला. भविष्य उज्वल करण्याचा ध्यास घेतला की स्वताला झोकून द्याव लागतं. हे सर्व चिकाटी आणि प्रयत्नामध्ये सातत्य ठेवल्याने होत त्यामुळे ध्येयप्रती स्वत:ला झोकून द्यावा. पॅशन असल्याशिवाय सक्सेस मिळत नाही असा यशाचा मुलमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरींगसह सर्व क्षेत्रात अद्यायावत तंत्रज्ञानाने उत्तुंंग झेप घेतली आहे. तंत्रज्ञानाचे बदलते स्वरूपाचा अभ्यास विद्यार्थ्यांना व्हावा. अद्यावत तंत्रज्ञानाच्या प्रवाहात विद्यार्थ्यांना सामील होवून तंत्रज्ञान आत्मसात करावे असे ते म्हणाले. प्रा. ठाकरे यांनी कार्यशाळेची रूपरेषा विषद केली. संचालन अंकीत टिपले, श्रृष्टी टेटे यांनी केले तर आभार वैष्णवी कुभंलवार हिने मानले. कार्यशाळेला विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Studentविद्यार्थी