शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

प्रयत्नात सातत्याशिवाय ध्येय प्राप्ती नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:03 IST

अद्ययावत तंत्रज्ञान सर्व क्षेत्रात विस्तारत असताना केवळ एका क्षेत्रापुरते ज्ञानाला सिमित ठेवून चालणार नाही. चौफेर असे ज्ञान विद्यार्थ्यांनी संपादीत करणे गरजेचे आहे. अद्यायावत तंत्रज्ञानामध्ये ज्ञानाच्या परिभाषा बदलल्या आहेत.

ठळक मुद्देआर.एस. कडू : बापुराव देशमुख अभियांत्रिकीतील राष्ट्रीयस्तरीय परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : अद्ययावत तंत्रज्ञान सर्व क्षेत्रात विस्तारत असताना केवळ एका क्षेत्रापुरते ज्ञानाला सिमित ठेवून चालणार नाही. चौफेर असे ज्ञान विद्यार्थ्यांनी संपादीत करणे गरजेचे आहे. अद्यायावत तंत्रज्ञानामध्ये ज्ञानाच्या परिभाषा बदलल्या आहेत. याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा. कुठलेही क्षेत्राची निवडही त्यात कौशल्य विकसित करता आले पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द आणि प्रयत्नामध्ये सातत्य ठेवले तर अवघड असे काही नाही, असे प्रतिपादन डॉ. आर. एस. कडू यांनी केले.सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशनच्यावतीने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात अप्लीकेशन आॅफ मेकॅनिकल इंजिनिअरींग (ए.एम.ई १८) या विषयावर सहाव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.व्यासपीठावर प्राचार्य डॉ. जी.व्ही. ठाकरे, डॉ. सुहास कोंगरे, विभाग प्रमुख डॉ. एम. जे. शेख, प्रा. आर. जे. डहाके, प्रा. राजेश ठाकरे, प्रा. योगेश महंतारे, प्रा. जी.पी. ढलवार यांची उपस्थिती होती.डॉ. कडू पुढे म्हणाले, कुठलाही विषय किंवा क्षेत्र निवडा; पण त्यात कौशल्य विकसित करा. स्पेशालिटी निर्माण झाली पाहिजे. त्यांनी स्वत: कंपनीचे अनुभव आणि कार्यपद्धती सांगितली. सिव्हील इंजि. सोडून पोलिटेक्निक मध्ये मेकॅनिकला प्रवेश घेतला. भविष्य उज्वल करण्याचा ध्यास घेतला की स्वताला झोकून द्याव लागतं. हे सर्व चिकाटी आणि प्रयत्नामध्ये सातत्य ठेवल्याने होत त्यामुळे ध्येयप्रती स्वत:ला झोकून द्यावा. पॅशन असल्याशिवाय सक्सेस मिळत नाही असा यशाचा मुलमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरींगसह सर्व क्षेत्रात अद्यायावत तंत्रज्ञानाने उत्तुंंग झेप घेतली आहे. तंत्रज्ञानाचे बदलते स्वरूपाचा अभ्यास विद्यार्थ्यांना व्हावा. अद्यावत तंत्रज्ञानाच्या प्रवाहात विद्यार्थ्यांना सामील होवून तंत्रज्ञान आत्मसात करावे असे ते म्हणाले. प्रा. ठाकरे यांनी कार्यशाळेची रूपरेषा विषद केली. संचालन अंकीत टिपले, श्रृष्टी टेटे यांनी केले तर आभार वैष्णवी कुभंलवार हिने मानले. कार्यशाळेला विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Studentविद्यार्थी