शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

कापूस दरवाढीचा लाभ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:09 IST

या हंगामात सुरू असलेली कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आबाळ थांबण्याचे कुठलेही संकेत नाहीत. एकीकडे, कापसाने पाच हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. भाव वाढत असले, तरीही उत्पादन घटल्याने या दरवाढीचा कोणताही फायदा यंदा शेतकºयांना होणार असल्याची चिन्हे नाहीत.

ठळक मुद्देबोंडअळीचा फटका : उत्पादनात कमालीची घट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : या हंगामात सुरू असलेली कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आबाळ थांबण्याचे कुठलेही संकेत नाहीत. एकीकडे, कापसाने पाच हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. भाव वाढत असले, तरीही उत्पादन घटल्याने या दरवाढीचा कोणताही फायदा यंदा शेतकऱ्यांना होणार असल्याची चिन्हे नाहीत. असे असताना बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी प्रतीक्षा करण्यावाचून पर्याय उरलेला नाही.कापसावर पडलेल्या शेंदरी बोंडअळीमुळे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे आता उघड झाले आहे. बीटी कपाशीचे बियाणे वापरल्यानंतर मुळात सर्व अळ्यांपासून पिकाला संरक्षण मिळणे अपेक्षित होते. शेंदरी बोंडअळीच्या बाबतीत बीटी बियाणे अयशस्वी ठरत असल्याचे सहा ते सात वर्षांपूर्वीच लक्षात आले होते. सुरुवातीची काही वर्षे बीटी तंत्रज्ञानाने बोंडअळीला चांगला अटकाव केला होता, पण गत काही वर्षांमध्ये बीटी कपाशीला या अळीने प्रतिकार क्षमता विकसित केल्याचे निदर्शनास आले. कृषी विभागाला याचे गांभीर्य लक्षात आले नाही. बोंडअळीपुढे बीटी कपाशी अपयशी ठरत असल्याचा अहवाल कृषी विभागाने गत वर्षी जुलै महिन्यात सरकारला दिला होता, पण तोवर उशीर होऊन गेला. बोंडअळीला अटकाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी अतिविषारी कीटकनाशकांचा अमर्याद वापर सुरू केला, त्याकडेही कुणाचे लक्ष नव्हते. जेव्हा शेतकरी आणि शेतमजूरांचे विषबाधेने मृत्यू झाले, तेव्हा सरकारला जाग आली.बियाण्यांची ११० प्रकरणे न्यायालयात दाखलमुळात विदभार्तील अनेक शेतकऱ्यांना मान्यता नसलेले आणि तणनाशकाला सहनशील असलेले (एच.टी.) अवैध कापूस बियाणे विकण्यात आल्याची बाब साऊथ आशिया टेक्नॉलॉजी सेंटरने केंद्र सरकारच्या जनुकीय अभियांत्रिकी मूल्यमापन समितीला (जीईएसी) पाठवलेल्या पत्रात नमूद केली होती. आता यासंदर्भात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. कापूस बियाण्यांचे नमुने अप्रमाणित आढळून आल्यानंतर अशा ११० प्रकरणांमध्ये न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. या बियाण्यांची अवैध विक्री करणाºया कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नुकसानापोटी ३० हजार रुपये प्रती हेक्टरी मदतीची अपेक्षाबोंडअळीमुळे झालेल्या नुकसानापोटी एनडीआरमार्फत ६ हजार ८०० रुपये, पीक विमा ८ हजार रुपये आणि कापूस नियंत्रण कायद्याअंतर्गत कंपन्यांकडून मिळणारे १६ हजार रुपये अशी एकूण साधारण ३० हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. असे असले तरी सरकारी पातळीवर अजूनही त्याचा अभ्यास सुरू आहे.एनडीआरएफच्या निकषानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्यास मदत प्रति शेतकऱ्याना दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाते. यातून शेतकऱ्यांच्या हाती काय लागणार हा एक प्रश्न आहे.बीटी कपाशीचा प्रश्न गंभीरबीटी कपाशीचा प्रश्न आता अधिकच गंभीर झाला आहे. बीजी-२ तंत्रज्ञानाप्रती शेंदरी बोंडअळीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याने उद्भवलेल्या परिस्थितीची जबाबदारी मोन्सॅन्टो कंपनीने स्वीकारावी, अन्यथा येत्या हंगामात बियाणे कंपन्या बीटी वाणांची विक्री करणार नाहीत, असा इशारा नॅशनल सीड असोसिएशनने दिला आहे. त्यामुळे बियाण्यांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने राज्य शासनाच्या वतीने बीटी बियाण्यांना संकरित बियाणे म्हणून विक्रीस मान्यता देण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. त्यासंदर्भात काय हालचाली झाल्या, हे सांगण्यात कुणी तयार नाही. बियाण्यांविषयी घोळ अजूनही कायम आहे. विदर्भाचे यंदा कर्जमाफीच्या घोळात रखडलेले पीक कर्जवाटप, परतीच्या पावसाने सोयाबीनची झालेली हानी, बोंडअळीचा हल्ला यातून सावरण्याची संधी शेतकऱ्यांना मिळू शकली नाही. आता तरी विनाविलंब मदत मिळावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

टॅग्स :cottonकापूस