शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात महिनाभरात ३ हजार पोटदुखीचे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 14:34 IST

उन्हाळ्यामुळे पाण्याच्या वेळापत्रकाचे बजेट कोलमडले त्यामुळे साथीच्या आजारांची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. एका महिन्यात पोटदुखीच्या आजाराचे ३००० रूग्ण एकट्या आष्टी तालुक्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देआष्टी तालुक्यात दुषित पाण्यामुळे रोगांची लागण लहान मुलांमध्ये टायफाईडचे रुग्ण अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उन्हाळ्यामुळे पाण्याच्या वेळापत्रकाचे बजेट कोलमडले त्यामुळे साथीच्या आजारांची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. एका महिन्यात पोटदुखीच्या आजाराचे ३००० रूग्ण एकट्या आष्टी तालुक्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.टंचाईमुळे पाणीपुरवठा करणारे साधन बदलली आहे. शेवाळयुक्त दुषित, दुर्गधी पाणी पुरवठा केल्या जात आहे. शिवाय पाण्यात तुरटी व ब्लिचिंगचे प्रमाण नगण्य आहे. सध्या उन्हाचा पारा ३५ अंशाच्या वरती गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा घटला आहे. ट्रँकरद्वारे देण्यात येणार पाणी, बैलगाडी किंवा तत्सम साधनाने केल्या जाणारा पाणी पुरवठा हा दुषित स्वरूपाचा आहे. शासनाने पाणी तपासल्यास सर्व नमुने फेल जाण्याची शक्यता दस्तुरखुद्द आरोग्य विभागाने वर्तविली आहे.अशुद्ध पाणी पुरवठा केल्यामुळे ग्रामीण भागातील आजारांना खतपाणी मिळाले आहे. दोन ते पाच वर्ष वयोगटातील लहान मुलांना जास्त क्षारयुक्त पाणी पिण्यात गेल्यामुळे आजार बळावले आहे. पाणी पिताना त्याचा लोहयुक्त वास येतो तर काही ठिकाणी जास्त जडपणा वाटत आहे. गावागावात शेतातील विहिरीमधील पाणी पिण्यात शेत असल्यामुळे ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे.आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात पोटदुखी, हगवण, उलट्या करणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तळेगाव, आष्टी, साहुर, अंतोरा या सर्व भागातील गावात परिस्थिती सारखीच आहे. आरोग्य यंत्रणाकडे पुरेसे संख्या बळ नसल्याने तात्पुरता इलाज करून रुग्णांना खासगी दवाखान्यात उपचार करून घ्यावा लागत आहे. उन्हामुळे विविध आजारांत झपाट्याने वाढ होत आहे. पाण्याच्या टंचाईमुळे या सर्व आजाराने डोके वर काढले आहे. अशक्तपणामुळे सलाईन घ्यावे लागत आहे. त्या देखील सुविधा मिळत नसल्याने रुग्णांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गावखेड्यातील रुग्णांना तालुकास्थळी यावे लागत असल्याने व त्यातही शासकीय उपचार तोकडा असल्याने यावर कशी मात करायची हा प्रश्न कायम आहे.

आरोग्य यंत्रणा सलाईनवरग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर, नर्स, कर्मचारी नाही औषध, सलाईन, इजेक्शन साठा नाही. वेळेवर खासगी औषध लिहून दिली जाते. त्यामुळे आरोग्य यंत्रणाच सलाईनवर असल्याने यावर मात कशी करणार जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून आरोग्याची समस्या मार्गी लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

आष्टीचे ग्रामीण रुग्णालय डॉक्टर व कर्मचारी नसल्याने वाºयावर आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन डॉक्टर व औषध देत नाही. याला हुकुमशाहीचे धोरण म्हणावे लागेल. याचा आम्ही निषेध करतो, पुन्हा आंदोलन उभारणार.मकरंद देशमुख, अध्यक्ष, जनशक्ती संघटना, आष्टी (शहीद)

टॅग्स :Healthआरोग्य