शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

...तर पेट्रोलपेक्षाही महाग होईल पाणी; पाण्याचा काटकसरीने वापर गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 05:00 IST

येळाकेळी तसेच पवनार येथील धाम नदीच्या पात्रातून पाण्याची उचल करून वर्धा शहरातील तब्बल १७ हजारांहून अधिक कुटुंबीयांना वर्धा नगरपालिका प्रशासन पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करते. वर्धा शहरात एकूण १९ प्रभाग असून, प्रत्येक प्रभागात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. असे असले तरी प्रत्येक कुटुंबाला किमान ७७५ लीटर पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देशहरातील १७ हजार कुटुंबीयांना वर्धा नगरपालिका करते पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा

अभिनय खोपडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील सुमारे १७ हजार कुटुंबीयांना वर्धा नगरपालिका प्रशासन पाणीपुरवठा करीत असले तरी अनेक व्यक्ती पिण्यायोग्य पाण्याचा गैरवापर करीत असल्याचे चित्र बघावयास मिळते. सध्या पेट्रोलने शंभरी पार केली असून, प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने वापर न केल्यास भविष्यात पाणी पेट्रोलपेक्षाही महाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.येळाकेळी तसेच पवनार येथील धाम नदीच्या पात्रातून पाण्याची उचल करून वर्धा शहरातील तब्बल १७ हजारांहून अधिक कुटुंबीयांना वर्धा नगरपालिका प्रशासन पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करते. वर्धा शहरात एकूण १९ प्रभाग असून, प्रत्येक प्रभागात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. असे असले तरी प्रत्येक कुटुंबाला किमान ७७५ लीटर पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तर शहरातील विविध भागांत घरगुती विहिरी तसेच मोठ्या प्रमाणात बोअरवेल आहेत. चिल्ड वॉटरच्या नावाखाली पाणी भरलेली एक लीटरची बाटली बाजारपेठेत किमान २० रुपयांना विक्री केली जात आहे. उपलब्ध पाण्याचा अतिरेकी वापर होत पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन न झाल्यास पिण्याचे पाणी पेट्रोलपेक्षा महाग होण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत वर्धा जिल्ह्यावर भीषण जलसंकट ओढावले होते. त्या वेळी महाकाळी येथील धाम प्रकल्पातून मृत जलसाठ्याच्या जोरावर वर्धा शहरासह वर्धा शहराशेजारील ११ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील नागरिकांची तृष्णातृत्पी वर्धा पाटबंधारे विभागाने केली. त्या वेळी धाम प्रकल्पाच्या उंचीवाढीसह धाम गाळमुक्त करण्याचा विषय पुन्हा एकदा बहुचर्चीत ठरला. तर सध्या धाम प्रकल्पात बऱ्यापैकी जलसाठा असला तरी प्रत्येक नागरिकाने उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करणे गरजेचे आहे. शासनस्तरावरही नागरिकांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले जात आहे. त्यामुळे याचे प्रत्येकाने गांभीर्य लक्षात घेवून कृती केली पाहिले. दयालनगरात सर्वाधिक बोअरवेल; पाणी सर्वांत कमीवर्धा शहर परिसरात एकूण ५०८ च्या वर बोअरवेल आहेत. त्यापैकी ९० टक्केहून अधिक बोअरवेल कुठलीही परवानगी न घेता खोदण्यात आल्या आहेत. शहरातील विविध भागांची तुलना केल्यास दयालनगर भागात सर्वाधिक बोअरवेल तसेच पाणी सर्वाधिक कमी असल्याचे सांगण्यात येते.

रामनगरात सर्वाधिक पाणी- शहराचे हृदयस्थान असलेल्या रामनगर भागातील भू-गर्भात सर्वाधिक पाणी असल्याचे सांगण्यात येते. - शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्यास रामनगर भागातील संत गाडगे बाबा मठ येथील न.प.च्या विहिरीवरून पाण्याची उचल करून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

कोणीही यावे अन् बोअरवेल खोदावे?- वर्धा शहरात ५०८ बोअरवेल असल्याची नोंद वर्धा नगरपालिका प्रशासनाने घेतली आहे. असे असले तरी यापैकी ९० टक्के बोअरवेल अनधिकृत आहेत.- बोअरवेल खोदताना भूजल वैज्ञानिक विभागाकडून रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे. परंतु, नागरिकांकडून मनमर्जीचा सपाटा लावून बोअरवेल खोदण्यात आल्या आहेत.

जलपुनर्भरण महत्वाचेे...

जल हे जीवन असून प्रत्येक नागरिकाने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संगोपन कसे करता येईल यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग घराच्या आवारात करावे.- माधव कोटस्थाने, जल तज्ज्ञ वर्धा.

पावसाचे पडणारे पाणी छतावरून सरळ वाहत जाते. त्याची जमिनीत साठवणूक होत नसल्याने भू-गर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे छतावर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब साठविण्यासाठी जलपुनर्भरण आवश्यक आहे.-डॉ. सचिन पावडे, जल तज्ज्ञ वर्धा.

 

टॅग्स :Waterपाणी