शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

अपघातास ट्रॅव्हल्स मालकही दोषी, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा! पालकांच्या मागण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2023 18:47 IST

Wardha News बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताला चालकाइतकाच ट्रॅव्हल्स मालकही जबाबदार आहे. त्यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वर्ध्यातील मृतांच्या कुटुंबाने एका बैठकीत केली आहे.

वर्धा : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु या अपघाताला चालकाइतकाच ट्रॅव्हल्स मालकही जबाबदार आहे. पोलिस अधिकारी भास्कर दरणे यांच्या पत्नीच्या नावाने ही ट्रॅव्हल्स असून त्यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वर्ध्यातील मृतांच्या कुटुंबाने एका बैठकीत केली आहे.

या ट्रॅव्हल्स अपघातात वर्ध्यातील १४ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये शिक्षणासाठी आणि नोकरीनिमित्ताने जात असलेल्या युवक-युवतींची संख्या मोठी आहे. परिवाराचा आधारच हिरावल्याने या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघातानंतर शासनाने सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. मात्र अद्यापही शासनाकडून योग्य मदत आणि कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने मृतांच्या पालकांची संयुक्त बैठक घेतली.

या बैठकीत ट्रॅव्हल्स एजन्सीचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाशी असलेली साठगाठ यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रत्येकाच्या घरातील आधार हिरावल्याने मृताच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी. ट्रॅव्हल्सचे नियम आणखी कडक करून वाहनाची वेगमर्यादा निश्चित करावी. समृद्धी महामार्गावर थांबा घेण्याची व्यवस्था करण्यात यावी. चालक मद्यप्राशन करीत असल्याची माहिती ट्रॅव्हल्स मालकाला असतानाही त्यांनी त्याच्यावर जबाबदारी सोपवून २४ प्रवाशांना मृत्यूच्या दाढेत ढकलले. त्यामुळे याप्रकरणी एक चौकशी समिती नेमून या घटनेची सखोल चौकशी करून चालक आणि मालकांवर कठोर कारवाई करावी, अशा अनेक मागण्या मृतांच्या पालकांनी यावेळी केल्या. बैठकीला नीलिमा खोडे, सौरभ वंजारी, विशाल वंजारी, मदन वंजारी, अनुप राजूरकर, ओमप्रकाश गांडोळे, रामदास पोकळे, दिनकर खेलकर, निलू तायडे, मेघना तायडे, राजेश कामडी, सपना कामडी, साक्षी पोहनकर व शार्दुल वांदिले आदींची उपस्थिती होती.

तुमचे दु:ख चार दिवसांचे, माझी संपूर्ण गाडी जळाली!

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मृत प्रथमेश खोडे याची आई नीलिमा खोडे यांनी सर्वप्रथम ट्रॅव्हल्स मालकाशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला होता. यावर, ‘तुमचे दु:ख फक्त चार दिवसांचे आहे. माझी संपूर्ण गाडी जळाली,’ असे उद्धटपणे उत्तर देऊन त्यांनी फोन कट केल्याचे या बैठकीदरम्यान नीलिमा खोडे यांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात