शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

अपघातास ट्रॅव्हल्स मालकही दोषी, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा! पालकांच्या मागण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2023 18:47 IST

Wardha News बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताला चालकाइतकाच ट्रॅव्हल्स मालकही जबाबदार आहे. त्यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वर्ध्यातील मृतांच्या कुटुंबाने एका बैठकीत केली आहे.

वर्धा : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु या अपघाताला चालकाइतकाच ट्रॅव्हल्स मालकही जबाबदार आहे. पोलिस अधिकारी भास्कर दरणे यांच्या पत्नीच्या नावाने ही ट्रॅव्हल्स असून त्यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वर्ध्यातील मृतांच्या कुटुंबाने एका बैठकीत केली आहे.

या ट्रॅव्हल्स अपघातात वर्ध्यातील १४ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये शिक्षणासाठी आणि नोकरीनिमित्ताने जात असलेल्या युवक-युवतींची संख्या मोठी आहे. परिवाराचा आधारच हिरावल्याने या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघातानंतर शासनाने सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. मात्र अद्यापही शासनाकडून योग्य मदत आणि कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने मृतांच्या पालकांची संयुक्त बैठक घेतली.

या बैठकीत ट्रॅव्हल्स एजन्सीचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाशी असलेली साठगाठ यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रत्येकाच्या घरातील आधार हिरावल्याने मृताच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी. ट्रॅव्हल्सचे नियम आणखी कडक करून वाहनाची वेगमर्यादा निश्चित करावी. समृद्धी महामार्गावर थांबा घेण्याची व्यवस्था करण्यात यावी. चालक मद्यप्राशन करीत असल्याची माहिती ट्रॅव्हल्स मालकाला असतानाही त्यांनी त्याच्यावर जबाबदारी सोपवून २४ प्रवाशांना मृत्यूच्या दाढेत ढकलले. त्यामुळे याप्रकरणी एक चौकशी समिती नेमून या घटनेची सखोल चौकशी करून चालक आणि मालकांवर कठोर कारवाई करावी, अशा अनेक मागण्या मृतांच्या पालकांनी यावेळी केल्या. बैठकीला नीलिमा खोडे, सौरभ वंजारी, विशाल वंजारी, मदन वंजारी, अनुप राजूरकर, ओमप्रकाश गांडोळे, रामदास पोकळे, दिनकर खेलकर, निलू तायडे, मेघना तायडे, राजेश कामडी, सपना कामडी, साक्षी पोहनकर व शार्दुल वांदिले आदींची उपस्थिती होती.

तुमचे दु:ख चार दिवसांचे, माझी संपूर्ण गाडी जळाली!

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मृत प्रथमेश खोडे याची आई नीलिमा खोडे यांनी सर्वप्रथम ट्रॅव्हल्स मालकाशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला होता. यावर, ‘तुमचे दु:ख फक्त चार दिवसांचे आहे. माझी संपूर्ण गाडी जळाली,’ असे उद्धटपणे उत्तर देऊन त्यांनी फोन कट केल्याचे या बैठकीदरम्यान नीलिमा खोडे यांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात