शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कपाशीला दिला जातोय खताचा तिसरा, चौथा फेर; खर्चात झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 17:10 IST

पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा : उत्पादनात घट होण्याशी शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क सेलू: कंबरेला कापडाचा पोलका बांधून त्यात रासायनिक खत भरायचे. प्रत्येक कपाशीच्या झाडाच्या बुडात टोकदार विळ्याने खड्डा करून ते त्यात टाकायचे. खत टाकून झाले की त्यावर माती लोटायची, ही कामे सध्या शिवारात सुरू आहेत. काही शेतकऱ्यांचा कपाशीला खत देण्याचा तिसरा, तर काहींचा चौथा फेर सुरू आहे. थोडाफार पाऊस आल्याने शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.

कपाशीचे बियाणे जमिनीत टाकण्यापासून तर कपाशी वेचण्यापर्यंत महिला मजुरांची मोठी गरज पडते. दिवसभर कंबरेला बाक देऊन ही कामे महिलाच करू शकतात. त्यामुळे महिला मजुरांची जास्त गरज पडते. सध्या शेतशिवारात हे काम करण्यासाठी मजूर उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. महिला बचतगटांचे मेळावे, राजकीय कार्यक्रमात महिलांचा सहभाग, लाडकी बहीण योजना, बांधकाम मजूर भांडे वाटप, अशा विविध ठिकाणी महिला जात असल्याने शेतात काम करण्यासाठी वेळेवर मजूर मिळत नाहीत. 

सध्या मोठ्या प्रमाणात तालुकास्तरावर विविध योजनांचे लाभ पदरात पाडून घेण्यासाठी महिलांची गर्दी असते. उन्हात काम करण्याची महिलांची सवय आता कमी होत चालली असली तरी त्यात उन्ह अलीकडे उन्हाळ्यासारखे तापत असून सर्वांना घामाघूम करीत आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांना शेतात काम करण्यासाठी महिला मजुरांची गरज भासते. मजुरांच्या उपलब्धतेनुसार कामे उरकून घ्यावी लागतात. सध्या शेतात कपाशीला खत देण्याचे काम सुरू असून शेतकऱ्यांचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे. खर्च जास्त आणि भाव कमी, यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी शेवटी निराशाच पडत आहे. आपला पिढीजात व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांना शेतीत राबावेच लागते. हे मात्र तेवढेच खरे. 

 

टॅग्स :wardha-acवर्धाfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र