शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

सीएम कार्यालय कर्मचाऱ्यांनी व्यापला मंच, साहित्यिक मागच्या रांगेत; मंत्रिमंडळाची बैठक की साहित्य संमेलनाचे उद्घाटन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 10:46 IST

Marathi Sahitya Sammelan: राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी (जि. वर्धा)  ९६ व्या मराठी साहित्य संमेलनात दुसऱ्या रांगेत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीच मंचावर ताबा घेतल्याचे चित्र खटकणारे होते.  

- अभिनय खोपडेराष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी (जि. वर्धा)  ९६ व्या मराठी साहित्य संमेलनात दुसऱ्या रांगेत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीच मंचावर ताबा घेतल्याचे चित्र खटकणारे होते.  महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना तिसऱ्या रांगेत बसावे लागले. मात्र, सरकारच्या अनुदानावर आयोजन असल्याने महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यालाही मूक संमती  देत मौन पाळल्याचे दिसून आले. उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री कार्यालयाचे कर्मचारी आल्याने त्यांनाही मंचावर स्थान देण्यात आले. ही मंत्रिमंडळाची बैठक आहे की, साहित्य संमेलनाचे उद्घाटन, असा प्रश्न  चर्चिला जात होता.

संमेलनासाठी राज्य शासनाने पहिल्यांदा ५० लाख व त्यानंतर दोन कोटी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संमेलनावर राज्य सरकार व भाजप अशा दोन्ही आघाड्यांचा पगडा दिसून येत होता, अशी जाहीर टीकाही झाली. मध्यंतरी राज्यात अनेक साहित्यिकांनी राजीनामे देऊन सरकारच्या चुकीच्या धोरणाचा निषेधही नोंदविला होता. या साऱ्या घटनांचे पडसाद साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात दिसून आले. स्वत: शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही आपल्या मार्गदर्शनात याचा उल्लेख केला. 

संमेलनातील किस्से....

अन् पाहुण्यांची खुर्ची पडली...उद्घाटनाकरिता मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री नियोजित कार्यक्रमापेक्षा दीड तास उशिराने पोहोचले. त्यामुळे इतरांना व्यासपीठावर त्यांची प्रतीक्षा करावी लागली. मंत्रिमहोदयांची एन्ट्री होताच व्यासपीठावर लगबग सुरू झाली. पहिल्या रांगेत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, स्वागताध्यक्ष, संमेलनाध्यक्ष, आदी मान्यवर विराजमान झाले. त्यानंतर दुसऱ्या रांगेतील खुर्चीवर मुख्यमंत्र्यांच्या मागे बसण्यासाठी गेलेल्या महोदयांची खुर्चीच पडली. त्यामुळे काहीशी धावपळ उडाली आणि त्यांना लगेच दुसरी खुर्ची देण्यात आली.साउंड सीस्टिमनेही सोडली साथ!मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच सभामंडपामध्ये काही विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत त्यांना पोलिस ठाण्यात नेले. या गोंधळाने मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरही परिणाम झाला. असे असतानाच अचानक मोठ्या साउंडचे स्पीकरही काही वेळेकरिता बंद पडल्याने आणखीनच गोंधळ झाला. 

माझं नाही, आधी संमेलनाध्यक्षांचे स्वागत करा!आयोजकांच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करताना मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्याची सूचना निवेदिकेने केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘आधी माझं नाही, तर संमेलनाध्यक्षांचं स्वागत करा,’ अशी विनंती केली. परंतु मानानुसार मुख्यमंत्र्यांचे स्वागत झाल्यानंतर विद्यमान संमेलनाध्यक्ष व मावळते संमेलनाध्यक्ष यांचे आयोजकांच्या वतीने आणि शासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.स्वागताध्यक्षांचा उत्साहअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी खासदार दत्ता मेघे यांची नियुक्ती करण्यात आली होती. वयाची ८० वर्षे पार केल्यानंतरही त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून संमेलनात हजेरी लावली आहे. त्यांनी वेळेत उपस्थित राहून स्वागताध्यक्ष म्हणून भाषणही केले.

१७ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे आज उद्घाटनवर्धा : विद्रोह सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्यावतीने १७ वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन शनिवारी (दि. ४) व रविवारी (दि. ५) कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्यनगरी सर्कस ग्राउंड वर्धा येथे आयोजित करण्यात आले आहे. ४ फेब्रुवारीला शनिवारी या साहित्य संमेलनाचे उद्घाटन सिनेअभिनेत्री रसिका आगासे-अय्युब यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ संपादक व शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे, मावळते संमेलनाध्यक्ष गणेश विसपुते उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकरवादी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर, न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे, रणजित मेश्राम आदी उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन