शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

शाळेचे फेर मूल्यांकन करावे, अन्यथा आमरण उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 17:51 IST

शाळा व्यवस्थापन समितीचा इशारा : तक्रारीनंतरही कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान टप्पा-२अंतर्गत झालेल्या तालुकास्तरीय मूल्यांकनात प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी भेदभाव केला. त्यामुळे शाळेचे तालुकास्तरीय फेरमूल्यांकन करावे. तसेच शाळा पहिल्या तीन क्रमांकात आल्यास पुरस्काराची रक्कम प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या वेतनातून वसूल करावी, अशी मागणी कारंजा तालुक्यातील सुसंद येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी निवेदनातून केली होती; पण कार्यवाही झाली नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना आमरण उपोषणाचा इशारा दिला. याकरिता २६ सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला होता.

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांतील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रति उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान टप्पा-२ राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत कारंजा पंचायत समितीअंतर्गत येणारी सुसंद येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळाही सहभागी होती. नियमानुसार कारंजाचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी पंकज तायडे यांनी तालुकास्तरीय समिती गठीत न करता आपल्या मर्जीतील प्रभारी केंद्र प्रमुखांचा चार्ज असलेल्या शिक्षकांस सोबत घेऊन शाळेचे मूल्यांकन केले. 

यात मर्जीतील शाळांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक दिलेत. त्यामुळे आमची शाळा पहिल्या तीन क्रमांकात असतानाही मागे राहिली. त्यामुळे फेर मूल्यांकन करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल वाटगुळे यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनातून केली होती परंतु अद्यापही फेर मूल्यांकन झाले नसल्याने पुन्हा शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन २६ सप्टेबरपर्यंतचा अल्टिमेटम देत दालनात बसून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. त्यामुळे आता शाळा व्यवस्थापन समिती उपोषण करणार की, फेर मूल्यांकन होणार? याकडे लक्ष लागले आहे. 

शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपलीजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सुसंद येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने ६ सप्टेंबरला मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे तक्रार करून तालुकास्तरीय शाळा मूल्यांकनात झालेल्या गैरप्रकार लक्षात आणून दिला होता. तसेच फेरमूल्यांकन करुन प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. नीतू गावंडे यांनी १२ सप्टेंबर रोजी कारंजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून तालुकास्तरीय मूल्यांकन समितीकडून फेर मूल्यांकन करावे व अहवाल सादर करावा, असे आदेश दिले होते; पण अद्यापही या समितीने फेर मूल्यांकन केले नसल्याचे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी सांगितले. 

रकाना कोरा ठेवला, पेन्सीलने नोंद घेतली

  • तालुकास्तरीय मूल्यांकन समितीने कोणत्याही प्रकारचा कार्यालयीन आदेश न काढता अनधिकृतपणे ५ सप्टेंबरला दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सुसंदचे मूल्यांकन केले. 
  • या मूल्यांकनादरम्यान एक महिला कर्मचारीही होत्या. प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मर्जीतील शिक्षकांना सोबत घेऊन मूल्यांकन केले. 
  • या समितीत नगरपालिकेचे मुख्याधिकारी व सेवाज्येष्ठ विस्तार अधिकारी या पदाचे एकही व्यक्ती नव्हते. मुख्याध्यापकांनी मुद्द्यांची माहिती दिल्यावरही तो रकाना कोरा सोडण्यात आला.
  • इतकेच नाही तर मूल्यांकनाचे गुणदान करताना पेन्सीलने नोंद घेतली. तसेच मूल्यांकन तक्त्यावर मुख्याध्यापकाची स्वाक्षरीही घेतली नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे
टॅग्स :wardha-acवर्धा