शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
4
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
5
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
6
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
7
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
8
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
9
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
10
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
11
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
12
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
13
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
14
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
15
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
16
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
17
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
18
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
19
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
20
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, कुठलं मध्यान्ह भोजन; आम्हाला चटणी-भाकरीचाच आधार!

By आनंद इंगोले | Updated: June 2, 2023 18:10 IST

खुद्द कामगारच झाले बोलते : कामगार मंडळाची योजना वादाच्या भोवऱ्यात

आनंद इंगोले

वर्धा : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन ही योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत कंत्राटदाराकडून भोजन पुरविले जात असून, सन २०२२-२३ मध्ये तब्बल २५ लाख ०५ हजार ५२३ कामगारांना मध्यान्ह भोजन देऊन १४ कोटी १० लाख ८४ हजार ३५६ रुपयांचे देयकही अदा करण्यात आले. या अनुषंगाने ‘लोकमत’ने शहरातील सोशालिस्ट चौकातील कामगारांची भेट घेऊन मध्यान्ह भोजन योजनेतील वास्तविकता जाणली असता, ‘साहेब, कुठलं मध्यान्ह भोजन; आम्हाला आमच्या चटणी-भाकरीचाच आधार’, असे धक्कादायक उत्तर मिळाल्याने हे भोजन कुणाच्या पोटात जाते, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

वर्धा शहरातील सोशालिस्ट चौकात शहरासह आजूबाजूच्या शहरातील साधारणत: पाचशे ते सहाशे कामगार काम मिळविण्याकरिता सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत गोळा होतात. येथून काम मिळाल्यानंतर ते कामावर जातात, हा त्यांचा नित्यक्रम आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता येथील काही कामगारांच्या भेटी घेऊन त्यांना मध्यान्ह भोजन योजनेबद्दल माहिती विचारली तर मध्यान्ह भोजन योजनाच माहिती नाही; आम्ही दररोज घरूनच डबा घेऊन येतो आणि त्यावरच आमचा दिवस निघतो, असे सांगितले. यातील काहींनी महामंडळाकडे नोंदणी केली असून, त्यांना अद्याप एकाही योजनेचा लाभ मिळाला नाही. काहींना तर महामंडळ काय, योजना काय, नोंदणी कशी करतात याची साधी माहितीही त्यांच्याकडे नसल्याचे लक्षात आले. शहरातच ही अवस्था असून, इतर ठिकाणचे काय? त्यामुळे कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा लाभ नेमका कोण उचलतो, याचीही चौकशी होण्याची गरज आहे. ज्यांच्याकरिता या योजना आहे, त्या घाम गाळणाऱ्या कामगारांना जर त्याचा लाभ मिळत नसेल तर योजनांचा फायदा काय?

अबब..! २५ लाख कामगारांना भोजन?

मध्यान्ह भोजन देण्याचीही योजना २०१९ पासून सुरू करण्यात आली. देवळीनजीकच्या इसापूर येथील केंद्रीय किचनमधून जिल्ह्यात कामगारांना भोजन वितरणाचे काम सुरू आहे. येथून गेल्यावर्षी तब्बल २५ लाख पाच हजार ५२३ कामगारांना भोजन दिले असून, त्याकरिता ११ कोटी ८३ लाख १३ हजार ८१६ रुपये निव्वळ रक्कम आणि दोन कोटी १२ लाख ९६ हजार ४८७ रुपये जीएसटी असा एकूण १४ कोटी १० लाख ८४ हजार ३५६ रुपयांचा खर्च झाला आहे. आजही जिल्ह्यात नियमित दोन ते अडीच हजार कामगारांना भोजन दिले जात असल्याची कागदोपत्री नोंद असून, प्रत्यक्षात हजाराच्या आतच भोजन वितरण होत असल्याची ओरड आहे.

काय म्हणाले कामगार...

आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून कामाच्या शोधात या चौकात येत असतो. येथे आल्यानंतर मिळेल त्या कामावर निघून जातो. परंतु अद्यापही आम्हाला कामगार विभागाच्या कोणत्याही योजनेची ना माहिती मिळाली, ना लाभ मिळाला. मध्यान्ह भोजन ही काय योजना आहे याचीही कल्पना नाही.

- अशपाक अहमद अब्दुल रसिद, रसुलाबाद

मी पुलगाववरून दररोज सोशालिस्ट चौकात कामाच्या शोधात येत असतो. मला माहिती मिळाल्यानंतर मी एका एजंटमार्फत कामगार नोंदणी केली. तेव्हा १ हजार रुपये खर्च केल्यानंतर पेटी व सुरक्षा किट मिळाली. त्यानंतर त्या एजंटचा चेहराही दिसला नाही आणि कोणत्याही योजनेचा लाभही मिळाला नाही.

- दिनेश राऊत, पुलगाव

कामगारांना जेवण मिळतात, अशी माहिती आहे; परंतु आम्ही अनेक वर्षांपासून कामगार असून, अद्यापही कोणत्याच योजनेचा लाभ मिळाला नाही. इतकेच नाही तर मध्यान्ह भोजन योजना कधीही आम्हा कामगारांपर्यंत पोहोचली नसून घरच्या भाकरीवरच आमचे काम सुरू आहे.

- रविकिरण प्रधान, वर्धा

राजकीय पाठबळ, कंत्राटदाराची मनमर्जी

मध्यान्ह भोजन वितरणाचा कंत्राट ज्या नागपुरातील व्यक्तीला मिळाला त्याला राजकीय वरदहस्त असल्याने मनमर्जी कारभार चालविला आहे. मिळेल त्या गावात जाऊन भोजन वाटप करून कागदोपत्री आकडा फुगवून देयक काढण्याचे धोरण अवलंबले आहे.

मध्यान्ह भोजन योजनेकरिता निवडलेल्या लाभार्थींना आरएफ बेस्ड कार्ड देणे अनिवार्य असून, ते कार्ड अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करणे अनिवार्य असताना, ना कार्ड तयार केले ना प्रमाणित करण्यात आले. त्यामुळे एकाच नावावर भोजन वाटप करून कागद काळे केले जात आहे.

भोजनाचे वितरण करणाऱ्या वाहनांवर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नाव, लोगो व योजनेचे नाव आदी तपशील नमूद करणे अनिवार्य असतानाही कोणत्याच वाहनावर याचा उल्लेख नाही. काही वाहने विनाक्रमांकाने धावताना दिसत आहे.

जिल्ह्यामध्ये नियमित साधारणतः १ हजार ८०० ते २ हजार २०० कामगारांना मध्यान्ह भोजन दिले जात असल्याची माहिती प्राप्त होत आहे. सध्या यामध्ये काहींकडून तक्रारी यायला लागल्या आहे. काहींनी निकृष्ट दर्जाचे भोजन असल्याच्याही तक्रारी केल्या असून, याप्रकरणी तपासणी केली जाईल. त्यातील सत्यता काय? याचा शोध घेऊन कार्यवाही करणार.

- कौस्तुभ भगत, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी, वर्धा

टॅग्स :SocialसामाजिकLabourकामगारfoodअन्न