शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

खड्डे उठलेय जिवावर; बँक अधिकाऱ्यासह दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 16:03 IST

दोघांवर उपचार सुरू : हिंगणघाट ते वर्धा मार्गावर झाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : हिंगणघाट ते वर्धा मार्गावरील वेळानजीकच्या टेक्सटाइल पार्कजवळील खड्डे नागरिकांच्या जिवावर उठल्याची ओरड सातत्याने केली जात आहे. पण, प्रशासनासह कंत्राटदाराकडूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने येथील खड्ड्यात दुचाकी उसळून एका बँक अधिकाऱ्यांसह दोघांना जीव गमवावा लागला तर दोघांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात बुधवारी रात्री ९ वाजतादरम्यान झाला असून, तीव्र रोष व्यक्त होत आहे.

अमोल बाबाराव पराते (३६, रा. स्वस्तिक कॉलनी वरुड, हल्ली मुक्काम तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट) व संजय नांदे (४० रा. माता मंदिर वॉर्ड, हिंगणघाट) अशी मृतांची नावे आहेत, तर महेश उईके (२४, रा. निशानपुरा वॉर्ड, हिंगणघाट) व राहुल पराते (२४ रा. टिळक वॉर्ड, हिंगणघाट) अशी जखमींची नावे आहेत. मृत अमोल पराते हे बैंक ऑफ इंडियाच्या नागरी येथील शाखेत व्यवस्थापक होते. ते वर्ध्याला अधिकाऱ्यांच्या बैठकीकरिता गेले होते. वर्ध्यातील बैठक आटोपून रात्रीला नऊ वाजता बुलेटने हिंगणघाटकडे येत असताना वेळानजीकच्या टेक्सटाइल पार्कजवळील खड्यातून बुलेट उसळून हा अपघात झाला. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

त्यानंतर याच ठिकाणी संजय नांदे, महेश उईके व राहुल पराते यांच्याही दुचाकीचा अपघात झाला असून, यात दुचाकीचालक संजयचा रुग्णालयात आणत असताना मृत्यू झाला. हे तिघेही एकाच दुचाकीने वर्धेकडून हिंगणघाटकडे जात होते. यांचीही दुचाकी उसळल्याने तिघेही रस्त्यावर आदळले. गंभीर जखमी झाल्याने तिघांनाही सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात संजयचा मृत्यू झाला असून दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. 

कंत्राटदारावर गुन्हा दाखल कराहिंगणघाट ते वर्धा मार्गावर कंत्राटदाराने खोदकाम करून ठेवले आहे. येथे कोणतेही सूचनाफलक किंवा सुरक्षा कठडे लावले नसल्याने दोन्ही दुचाकीचालकांना खड्याचा अंदाज आला नाही. परिणामी एका बँक अधिकाऱ्यांसह दोघांना जीव गमवावा लागला. अपघाताची माहिती मिळताच बँक मृत अमोल पराते ऑफ इंडियाचे जिल्हा प्रबंधक चेतन शिरभाते, वरिष्ठ अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी वैभव लहाने यांनी घटनास्थळ गाठले. तसेच प्रहारचे विदर्भ प्रमुख गजू कुबडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या निवेदनाची दखल घेऊन तहसीलदारांना चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

रस्ता नकोत पण, जीवघेणा विकास आवराहिंगणघाट ते वर्धा मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून आता कंत्राट- दाराने त्यात आणखीच भर घातली आहे. एका बाजूने रस्ता खोदला पण, सुरक्षा कठडे लावले नाही. या मार्गावर सतत वर्दळ राहत असल्याने अपघाताचा धोका लक्षात घेता आंदोलन करून प्रशासनाला निवेदनही देण्यात आले. परंतु कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने दोघांना जीव गमवावा लागला. परिणामी आता रोष खदखदत असून रस्ता नकोत पण, जीवघेणा विकास आवरा, अशी मागणी हिंगणघाटकरां- कडून केली जात आहे. 

 

टॅग्स :wardha-acवर्धाAccidentअपघात