शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

खड्डे उठलेय जिवावर; बँक अधिकाऱ्यासह दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 16:03 IST

दोघांवर उपचार सुरू : हिंगणघाट ते वर्धा मार्गावर झाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : हिंगणघाट ते वर्धा मार्गावरील वेळानजीकच्या टेक्सटाइल पार्कजवळील खड्डे नागरिकांच्या जिवावर उठल्याची ओरड सातत्याने केली जात आहे. पण, प्रशासनासह कंत्राटदाराकडूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने येथील खड्ड्यात दुचाकी उसळून एका बँक अधिकाऱ्यांसह दोघांना जीव गमवावा लागला तर दोघांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात बुधवारी रात्री ९ वाजतादरम्यान झाला असून, तीव्र रोष व्यक्त होत आहे.

अमोल बाबाराव पराते (३६, रा. स्वस्तिक कॉलनी वरुड, हल्ली मुक्काम तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट) व संजय नांदे (४० रा. माता मंदिर वॉर्ड, हिंगणघाट) अशी मृतांची नावे आहेत, तर महेश उईके (२४, रा. निशानपुरा वॉर्ड, हिंगणघाट) व राहुल पराते (२४ रा. टिळक वॉर्ड, हिंगणघाट) अशी जखमींची नावे आहेत. मृत अमोल पराते हे बैंक ऑफ इंडियाच्या नागरी येथील शाखेत व्यवस्थापक होते. ते वर्ध्याला अधिकाऱ्यांच्या बैठकीकरिता गेले होते. वर्ध्यातील बैठक आटोपून रात्रीला नऊ वाजता बुलेटने हिंगणघाटकडे येत असताना वेळानजीकच्या टेक्सटाइल पार्कजवळील खड्यातून बुलेट उसळून हा अपघात झाला. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

त्यानंतर याच ठिकाणी संजय नांदे, महेश उईके व राहुल पराते यांच्याही दुचाकीचा अपघात झाला असून, यात दुचाकीचालक संजयचा रुग्णालयात आणत असताना मृत्यू झाला. हे तिघेही एकाच दुचाकीने वर्धेकडून हिंगणघाटकडे जात होते. यांचीही दुचाकी उसळल्याने तिघेही रस्त्यावर आदळले. गंभीर जखमी झाल्याने तिघांनाही सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात संजयचा मृत्यू झाला असून दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. 

कंत्राटदारावर गुन्हा दाखल कराहिंगणघाट ते वर्धा मार्गावर कंत्राटदाराने खोदकाम करून ठेवले आहे. येथे कोणतेही सूचनाफलक किंवा सुरक्षा कठडे लावले नसल्याने दोन्ही दुचाकीचालकांना खड्याचा अंदाज आला नाही. परिणामी एका बँक अधिकाऱ्यांसह दोघांना जीव गमवावा लागला. अपघाताची माहिती मिळताच बँक मृत अमोल पराते ऑफ इंडियाचे जिल्हा प्रबंधक चेतन शिरभाते, वरिष्ठ अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी वैभव लहाने यांनी घटनास्थळ गाठले. तसेच प्रहारचे विदर्भ प्रमुख गजू कुबडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या निवेदनाची दखल घेऊन तहसीलदारांना चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

रस्ता नकोत पण, जीवघेणा विकास आवराहिंगणघाट ते वर्धा मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून आता कंत्राट- दाराने त्यात आणखीच भर घातली आहे. एका बाजूने रस्ता खोदला पण, सुरक्षा कठडे लावले नाही. या मार्गावर सतत वर्दळ राहत असल्याने अपघाताचा धोका लक्षात घेता आंदोलन करून प्रशासनाला निवेदनही देण्यात आले. परंतु कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने दोघांना जीव गमवावा लागला. परिणामी आता रोष खदखदत असून रस्ता नकोत पण, जीवघेणा विकास आवरा, अशी मागणी हिंगणघाटकरां- कडून केली जात आहे. 

 

टॅग्स :wardha-acवर्धाAccidentअपघात