शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

शेतकरी आत्महत्यांचा फास घट्ट; दीड वर्षात २०२ जणांनी संपविले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 16:32 IST

वारसांना मदत मिळणार तरी कधी : पीडित कुटुंबांचा टाहो, प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे

वर्धा : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन मुख्य कारणांमुळे झालेल्या शेतकरी आत्महत्यांप्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना सहायक अनुदानाच्या रूपाने तातडीने मदत देण्यात येते. ऐन खरिपाच्या तोंडावर मदतीची घोषणा झाल्याने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना हातभार लागणार आहे. मागील दीड वर्षात जिल्ह्यात २०२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून जानेवारी ते जून २०२३ या सहा महिन्यांत तब्बल ४८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा फास घट्ट होत चालला आहे, हे तितकेच खरे.

निसर्गाच्या भरवशावर बळीराजा पेरणी करतो. मात्र, या शेतकऱ्याला निसर्गाचा लहरीपणा नडतो. कधी कोरड्या दुष्काळाने तर कधी ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके नष्ट होऊन बळीराजाच्या स्वप्नांचा चुराडा होतो आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच जातो. यातूनच नाइलाजाने शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर न सोडता शासनाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपये मदत दिली जाते. यातील ७० हजार रुपये कुटुंबीयांना प्रत्यक्ष दिले जातात. तर ३० हजार रुपये त्यांच्या बॅंक खात्यात जमा केले जाते.

जिल्ह्यात सन २०२२ मध्ये १५४ तर यंदा ३० जूनपर्यंत सहा महिन्यांत ४८ शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मात्र, यासाठी तातडीने निधी देण्याची तरतूद असतानाही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना वेळेत मदत मिळाली नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

केवळ ६ प्रकरणं पात्र उर्वरित ३० प्रलंबित

जिल्ह्यात जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ४८ शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले. यापैकी केवळ ६ प्रकरणं मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून १२ प्रकरणं अपात्र ठरवित ३० प्रकरणं प्रलंबित ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

मदत मिळणार तरी केव्हा ?

जिल्ह्यात यंदा ४८ जणांनी मृत्यूला कवटाळले असून अद्याप एकाही आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या वारसांना मदत मिळालेली नाही. जेव्हा की तत्काळ अनुदान देण्याचे आदेश असतानाही शासनाकडून निधी अप्राप्त असल्याने मदत मिळणार तरी केव्हा, असा आर्त टाहो आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांकडून होत आहे.

शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी

  • जानेवारी - १०
  • फेब्रुवारी - ०८
  • मार्च - ११
  • एप्रिल - १४
  • मे - ०३
  • जून - ०२
टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीwardha-acवर्धा