शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शेतकरी आत्महत्यांचा फास घट्ट; दीड वर्षात २०२ जणांनी संपविले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 16:32 IST

वारसांना मदत मिळणार तरी कधी : पीडित कुटुंबांचा टाहो, प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे

वर्धा : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन मुख्य कारणांमुळे झालेल्या शेतकरी आत्महत्यांप्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना सहायक अनुदानाच्या रूपाने तातडीने मदत देण्यात येते. ऐन खरिपाच्या तोंडावर मदतीची घोषणा झाल्याने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना हातभार लागणार आहे. मागील दीड वर्षात जिल्ह्यात २०२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून जानेवारी ते जून २०२३ या सहा महिन्यांत तब्बल ४८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा फास घट्ट होत चालला आहे, हे तितकेच खरे.

निसर्गाच्या भरवशावर बळीराजा पेरणी करतो. मात्र, या शेतकऱ्याला निसर्गाचा लहरीपणा नडतो. कधी कोरड्या दुष्काळाने तर कधी ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके नष्ट होऊन बळीराजाच्या स्वप्नांचा चुराडा होतो आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच जातो. यातूनच नाइलाजाने शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर न सोडता शासनाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपये मदत दिली जाते. यातील ७० हजार रुपये कुटुंबीयांना प्रत्यक्ष दिले जातात. तर ३० हजार रुपये त्यांच्या बॅंक खात्यात जमा केले जाते.

जिल्ह्यात सन २०२२ मध्ये १५४ तर यंदा ३० जूनपर्यंत सहा महिन्यांत ४८ शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मात्र, यासाठी तातडीने निधी देण्याची तरतूद असतानाही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना वेळेत मदत मिळाली नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

केवळ ६ प्रकरणं पात्र उर्वरित ३० प्रलंबित

जिल्ह्यात जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ४८ शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले. यापैकी केवळ ६ प्रकरणं मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून १२ प्रकरणं अपात्र ठरवित ३० प्रकरणं प्रलंबित ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

मदत मिळणार तरी केव्हा ?

जिल्ह्यात यंदा ४८ जणांनी मृत्यूला कवटाळले असून अद्याप एकाही आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या वारसांना मदत मिळालेली नाही. जेव्हा की तत्काळ अनुदान देण्याचे आदेश असतानाही शासनाकडून निधी अप्राप्त असल्याने मदत मिळणार तरी केव्हा, असा आर्त टाहो आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांकडून होत आहे.

शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी

  • जानेवारी - १०
  • फेब्रुवारी - ०८
  • मार्च - ११
  • एप्रिल - १४
  • मे - ०३
  • जून - ०२
टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीwardha-acवर्धा