शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षाच्या मतभेदात विदर्भ राज्याचा मुद्दा गुंडाळला

By अभिनय खोपडे | Updated: November 30, 2022 10:36 IST

स्वतंत्र भारत पक्षच आक्रमक; प्रमुख राजकीय पक्षांची बोटचेपी

वर्धा : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, ही अत्यंत जुनी मागणी असूनही राजकीय पक्षाच्या धरसोड वृत्तीमुळे अजूनही स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी बाळसे पकडू शकलेली नाही. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाने विदर्भ राज्याच्या मागणीचा कायम राजकीय वापर केला तर शिवसेनेने स्वतंत्र विदर्भ राज्याला आपला विरोध कायम ठेवला असल्याने विदर्भ राज्याबाबत केंद्र व राज्य सरकारला अद्यापही ठोस भूमिका घेता आली नाही. त्यामुळे विदर्भाच्या विकासावरही मोठा परिणाम होत असल्याची भावना विदर्भातील शेतकरी, विदर्भवादी नेते व्यक्त करीत आहेत.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती करतानाच स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्दा उपस्थित झाला होता. मात्र, तेव्हा व त्यापूर्वीपासूनही विदर्भाच्या मुद्याकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रात अनेक वर्षे सरकार होते; परंतु काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीसाठी विदर्भाचा मुद्दा वापरला. मात्र, स्वतंत्र राज्य देण्याची भूमिका घेतली नाही. भारतीय जनता पक्षानेही स्वतंत्र विदर्भ राज्याचे आश्वासन दिले होते. मात्र, केंद्रात व राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपनेही हा मुद्दा सोडून दिला. राज्यात शिवसेनेसोबत भाजपची युती होती. शिवसेनेचा विदर्भ राज्याला बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून विरोधच कायम राहिला आहे. तो अद्यापही कायम आहे. त्यानंतर २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यांच्याही किमान समान कार्यक्रमातून विदर्भ राज्याच्या मुद्दा शिवसेनेमुळेच दोन्ही काँग्रेसला सोडून द्यावा लागला.

विदर्भ आंदोलनासाठी आक्रमक भूमिका घेणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप यांचे नेते आता विदर्भ राज्यावर बोलण्यास तयार नाही. स्वतंत्र विदर्भ राज्य रखडल्यामुळे विदर्भातील जवळपास १० ते ११ नवे जिल्हे व तेवढेच तालुक्यांच्या विभाजनाचे प्रस्ताव रखडून पडले आहेत. उपराजधानीचा दर्जा देऊन दरवर्षी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन घेतले जाते. मात्र, त्यातून विदर्भाच्या प्रश्नावर काहीही तोडगा निघत नाही, अशी भावना विदर्भवादी नेत्यांनी व्यक्त केली आहे.

स्वतंत्र भारत तेवढा आक्रमक

शेतकरी संघटना प्रणित स्वतंत्र भारत पक्ष तेवढा विदर्भ राज्यासाठी आक्रमक भूमिका घेऊन आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशनच्या काळात प्रतिअधिवेशन व अनेक आंदोलने केली जातात. आता आरपारची लढाई लढण्याचा निर्धार स्वतंत्र भारत पक्षाने जाहीर केला आहे. मध्यंतरीच्या काळात विदर्भ राज्याच्या आंदोलनाची धुरा राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर हे घेणार असल्याचे सांगण्यात आले हाेते. मात्र, अजूनपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाला त्यांनाही बळ देता आलेले नाही.

मी विदर्भवादी आहे. विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी काही राजकीय अडचणी असेल तर विदर्भांतर्गत जिल्हे व तहसीलमध्ये प्रशासकीय बदल करून प्रशासन लोकांच्या दारी पोहोचविण्याची व्यवस्था केली तरी विदर्भ राज्यनिर्मितीचा उद्देश काही प्रमाणात पूर्ण होऊ शकतो. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी हे शक्य नाही. हे आजवर दिसून आले आहे.

- ॲड. मुरली मनोहर व्यास, माजी नगराध्यक्ष, हिंगणघाट

टॅग्स :PoliticsराजकारणVidarbhaविदर्भ