शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

अंगापेक्षा भोंगा मोठा; तीन महिन्यांत १८ जणांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2022 05:00 IST

प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे. परंतु, नियमांचा भंग करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण पोलीस तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून धडक कारवाई करण्यात येते. वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने वाहनात क्षमतेपेक्षा जास्त साहित्याचा भरणा करून वाहतूक करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाईच केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वाहनात क्षमतेपेक्षा जास्त साहित्य लादून त्याची वाहतूक करणे कायदेशीर गुन्हाच आहे. अशा वाहनचालकांवर वाहतूक नियंत्रण पोलीस तसेच उपप्रादेशिक परिवहन विभाग दंडात्मक कारवाई करते. ओव्हरलोडचा ठपका ठेऊन मागील तीन महिन्यांत वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी तब्बल १८ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून १८ हजारांचा दंड वसूल केला आहे. प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे. परंतु, नियमांचा भंग करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण पोलीस तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून धडक कारवाई करण्यात येते. वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने वाहनात क्षमतेपेक्षा जास्त साहित्याचा भरणा करून वाहतूक करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाईच केली आहे.

रात्री ओव्हरलोड आणि ओव्हारस्पीडही१ रात्रीच्या सुमारास विविध रस्त्यांवर वाहनांची जास्त वर्दळ राहत नसल्याने तसेच ठिकठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारीही राहत नसल्याने याच संधीचे सोनं नियमांना बगल देणारे वाहन चालक करतात.

२ शहरातील विविध  भागात दिवसाला वाहतूक पोलीस कर्तव्यावर राहतात. पण रात्रीच्या सुमारास या भागात पोलीस कर्मचारी राहत नसल्याने ओव्हरलोड तसेच ओव्हरस्पीड वाहने धावत असल्याचे वास्तव आहे.

३ ओव्हरलोड तसेच ओव्हरस्पीट वाहनांमुळे अपघाताचा जास्त धोका राहतो. पण सध्या रात्रीच्या सुमारास वर्धा शहरातून ही अवजड वाहने मनमर्जीनेच पळविली जात असल्याचे दिसून येते.

४ हजार ४३१ वाहनांची तपासणी

-    मागील तीन महिन्यांच्या काळात वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांकडून तब्बल ४ हजार ४३१ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोषी वाहनचालकांवर विविध वाहतूक नियमांना बगल दिल्याचा ठपका ठेवून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात ओव्हरलोडची तब्बल १८ प्रकरणे असल्याचे सांगण्यात आले. वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने मोहीम पुढेही सूरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

मागील तीन महिन्यांत वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने ओव्हरलोडचा ठपका ठेवून १८ वाहन चालकांकडून १८ हजारांचा दंड वसूल केला आहे. सुरक्षित प्रवास या हेतूने प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करायलाच हवे.- धनाजी जळक, पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस