शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

अंगापेक्षा भोंगा मोठा; तीन महिन्यांत १८ जणांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2022 05:00 IST

प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे. परंतु, नियमांचा भंग करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण पोलीस तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून धडक कारवाई करण्यात येते. वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने वाहनात क्षमतेपेक्षा जास्त साहित्याचा भरणा करून वाहतूक करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाईच केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वाहनात क्षमतेपेक्षा जास्त साहित्य लादून त्याची वाहतूक करणे कायदेशीर गुन्हाच आहे. अशा वाहनचालकांवर वाहतूक नियंत्रण पोलीस तसेच उपप्रादेशिक परिवहन विभाग दंडात्मक कारवाई करते. ओव्हरलोडचा ठपका ठेऊन मागील तीन महिन्यांत वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी तब्बल १८ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून १८ हजारांचा दंड वसूल केला आहे. प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे. परंतु, नियमांचा भंग करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण पोलीस तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून धडक कारवाई करण्यात येते. वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने वाहनात क्षमतेपेक्षा जास्त साहित्याचा भरणा करून वाहतूक करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाईच केली आहे.

रात्री ओव्हरलोड आणि ओव्हारस्पीडही१ रात्रीच्या सुमारास विविध रस्त्यांवर वाहनांची जास्त वर्दळ राहत नसल्याने तसेच ठिकठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारीही राहत नसल्याने याच संधीचे सोनं नियमांना बगल देणारे वाहन चालक करतात.

२ शहरातील विविध  भागात दिवसाला वाहतूक पोलीस कर्तव्यावर राहतात. पण रात्रीच्या सुमारास या भागात पोलीस कर्मचारी राहत नसल्याने ओव्हरलोड तसेच ओव्हरस्पीड वाहने धावत असल्याचे वास्तव आहे.

३ ओव्हरलोड तसेच ओव्हरस्पीट वाहनांमुळे अपघाताचा जास्त धोका राहतो. पण सध्या रात्रीच्या सुमारास वर्धा शहरातून ही अवजड वाहने मनमर्जीनेच पळविली जात असल्याचे दिसून येते.

४ हजार ४३१ वाहनांची तपासणी

-    मागील तीन महिन्यांच्या काळात वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांकडून तब्बल ४ हजार ४३१ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोषी वाहनचालकांवर विविध वाहतूक नियमांना बगल दिल्याचा ठपका ठेवून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात ओव्हरलोडची तब्बल १८ प्रकरणे असल्याचे सांगण्यात आले. वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने मोहीम पुढेही सूरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

मागील तीन महिन्यांत वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने ओव्हरलोडचा ठपका ठेवून १८ वाहन चालकांकडून १८ हजारांचा दंड वसूल केला आहे. सुरक्षित प्रवास या हेतूने प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करायलाच हवे.- धनाजी जळक, पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस