शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

अंगापेक्षा भोंगा मोठा; तीन महिन्यांत १८ जणांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2022 05:00 IST

प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे. परंतु, नियमांचा भंग करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण पोलीस तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून धडक कारवाई करण्यात येते. वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने वाहनात क्षमतेपेक्षा जास्त साहित्याचा भरणा करून वाहतूक करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाईच केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वाहनात क्षमतेपेक्षा जास्त साहित्य लादून त्याची वाहतूक करणे कायदेशीर गुन्हाच आहे. अशा वाहनचालकांवर वाहतूक नियंत्रण पोलीस तसेच उपप्रादेशिक परिवहन विभाग दंडात्मक कारवाई करते. ओव्हरलोडचा ठपका ठेऊन मागील तीन महिन्यांत वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी तब्बल १८ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून १८ हजारांचा दंड वसूल केला आहे. प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे. परंतु, नियमांचा भंग करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण पोलीस तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून धडक कारवाई करण्यात येते. वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने वाहनात क्षमतेपेक्षा जास्त साहित्याचा भरणा करून वाहतूक करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाईच केली आहे.

रात्री ओव्हरलोड आणि ओव्हारस्पीडही१ रात्रीच्या सुमारास विविध रस्त्यांवर वाहनांची जास्त वर्दळ राहत नसल्याने तसेच ठिकठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारीही राहत नसल्याने याच संधीचे सोनं नियमांना बगल देणारे वाहन चालक करतात.

२ शहरातील विविध  भागात दिवसाला वाहतूक पोलीस कर्तव्यावर राहतात. पण रात्रीच्या सुमारास या भागात पोलीस कर्मचारी राहत नसल्याने ओव्हरलोड तसेच ओव्हरस्पीड वाहने धावत असल्याचे वास्तव आहे.

३ ओव्हरलोड तसेच ओव्हरस्पीट वाहनांमुळे अपघाताचा जास्त धोका राहतो. पण सध्या रात्रीच्या सुमारास वर्धा शहरातून ही अवजड वाहने मनमर्जीनेच पळविली जात असल्याचे दिसून येते.

४ हजार ४३१ वाहनांची तपासणी

-    मागील तीन महिन्यांच्या काळात वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांकडून तब्बल ४ हजार ४३१ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोषी वाहनचालकांवर विविध वाहतूक नियमांना बगल दिल्याचा ठपका ठेवून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात ओव्हरलोडची तब्बल १८ प्रकरणे असल्याचे सांगण्यात आले. वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने मोहीम पुढेही सूरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

मागील तीन महिन्यांत वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने ओव्हरलोडचा ठपका ठेवून १८ वाहन चालकांकडून १८ हजारांचा दंड वसूल केला आहे. सुरक्षित प्रवास या हेतूने प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करायलाच हवे.- धनाजी जळक, पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस