शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
4
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
5
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
6
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
7
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
8
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
9
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
10
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
11
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
12
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
13
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...
14
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
15
दहावीतील गुणांवरून नातेवाईकांनी उडवली होती खिल्ली, आता तरुणाने बँकेचा SMS दाखवला; आकडा पाहून 'बोलती बंद'
16
कोल्हापूरकरांच्या विरोधाची धग अंबानीपर्यंत पोहोचली; वनताराचे पथक नांदणीत येणार
17
Video: खऱ्याखुऱ्या पोलिस काकांना पहिल्यांदाच पाहून चिमुकली भलतीच खुश, म्हणाली 'हाय फाईव्ह...'
18
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
19
कियारा अडवाणीसाठी आणण्यात आला स्पेशल केक, लेकीसोबत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...
20
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच

अवकाळीचा कहर; बळीराजाचे स्वप्न भिजले, संकटाने मनही थिजले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 12:55 IST

दुसरा दिवसही पावसाचा, शेतकऱ्याची दाणादाण, वीज पडल्याने सेलू-काटे शिवारात गाय दगावली

वर्धा : दुसरा दिवसही अवकाळी पावसाचाच निघाला. सकाळपासून दुपारी उशिरापर्यंत सर्वदूर पावसाने धुव्वाधार हजेरी लावल्यामुळे शेतशिवारात पाणी साचले आहे. पांढऱ्या सोन्यावर शेतकऱ्यांचे मोठे स्वप्न होते. परंतु, या पावसात कपाशी भिजल्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नावरच पाणी फेरले आहे. तसेच तुरीचं बोनस पीकही या पावसाने हिरावून घेतलं आहे.

खरिपात पावसाअभावी फटका बसला तर आता अवकाळी पावसाने होतं नव्हतं सारं हिरावून घेतल्याने वारंवार येणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मनही आता थिजून गेलं आहे. शेतकऱ्यांच्या पाठीमागे ही संकट मालिका कधीपर्यंत चालणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या पावसात सोमवारी सायंकाळी सहा वाजता सेलू-काटे शिवारात वीज पडल्याने गाय दगावली. तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची गरज आहे.

चार हजार हेक्टरवर कपाशीचे नुकसान

आष्टी (शहीद) : तालुक्यात सोमवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. मंगळवारी पहाटेपर्यंत जोरधार सुरू असल्याने या पावसामुळे तालुक्यातील ४ हजार हेक्टरवरील कपशीचे, तर दीड हजार हेक्टरवरील तुरीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या वादळीपावसामुळे कपाशीसह तुरीही वाकून गेल्या आहेत. कापूस भिजून जमिनीवर पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील आष्टी, तळेगाव, भारसवाडा, लहानआर्वी, अंतोरा, साहूर या सर्व भागांतील कपाशी आणि तुरीच्या पिकाला फटका बसला आहे. वाऱ्यामुळे काही घरांवरील टिनाचे पत्रे उडाल्याने नागरिकांची दाणादाण उडाली.

पुलगाव परिसरालाही बसला अवकाळीचा फटका

पुलगाव : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे पुलगाव परिसरातील पुलगाव, नाचणगाव, खातखेडा, कोळोणा, घोडेगाव, एकांबा, सोनोरा यांसह इतर गावांना चांगलाच फटका बसला. तूर आणि कपाशीचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी पूर्णत: कोलमडून गेला आहे. या अवकाळी पावसाचा फटका रब्बी हंगामातील गहू व चणा पिकांनाही बसणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

कापूस वेचणीच्या हंगामातच शेतकऱ्यांना दणका

विरुळ (आ.) : यावर्षी तसेही कापसाचे उत्पादन कमीच आहे. सध्या कापसाची वेचणी सुरू असून बहुतांश शेतकऱ्यांचे शेत पांढरे झाले आहे. अशातच आता अवकाळी पावसाने सोमवारपासून हजेरी लावल्याने कापूस भिजला. आता यामुळे कापसाची प्रत घसणार असून, शेतकऱ्यांना भावामध्ये फटका बसण्याची शक्यता आहे. यावर्षी सोयाबीन हातचे गेले. आता अवकाळीमुळे कपाशी आणि तुरीलाही फटका बसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या दुहेरी संकटातून शेतकऱ्यांना सावरण्याकरिता तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

पावसामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले

सेवाग्राम : गेल्या काही दिवसांपासून ढगाळी वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती. अखेर सोमवारी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या पावसामुळे कापूस, तूर आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकऱ्याचे आर्थिक गणितच बिघडवून टाकले आहे. सोयाबीनचा मोठा फटका बसल्यानंतर शेतकऱ्यांनी कपाशी आणि तुरीकरिता मोठी मेहनत घेतली. आता तेही पीक मातीमोल केल्याने शेतकरी विवंचनेत सापडले आहे.

अवकाळी पावसाची धुवाधार बॅटिंग

चिकणी (जामनी) : चिकणीसह परिसरात दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार एंट्री केल्याने शेकडो हेक्टरवरील कपाशी आणि तुरीच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आणखी तीन दिवस अवकाळी पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीच वाढली आहे. चिकणी, पढेगाव, जामनी, दहेगाव परिसरातील कापूस भिजून तो जमिनीवर विखुरला आहे. तसेच तुरीचे पिकही जमिनीवर लोळले आहे. काही शेतांमध्ये पाणी साचून तलावाचे स्वरूप आले असून, पिकांना त्यापासून धोका आहे.

देवळी तालुक्यात धो-धो बरसला

देवळी : तालुक्यात मंगळवारी सकाळी ६ वाजपासून अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. दिवसभर पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मजुरांअभावी शेतामध्ये कापूस वेचायचा राहिला. पण, आता या पावसाने तो कापूस भिजवून टाकला आहे. पऱ्हाटीचा कापूस पावसाच्या दणक्याने खाली पडल्याने मातीमोल झाला. तुरीसह हरभऱ्यालाही चांगलाच मार बसला आहे. आधीच या हंगामात सोयाबीन व इतर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने कास्तकारांचे कंबरडे मोडले आहे. त्यात या अवकाळी पावसाने आणखीच भर घातली आहे. तालुक्यात किती नुकसान झाले याची आकडेवारी अद्याप तलाठ्यांकडून प्राप्त व्हायची असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे यांनी दिली.

रोहणा परिसरालाही झोडपले

रोहणा : या परिसरात सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. या पावसामुळे कापूस भिजला असून, तुरीचा फुलोराही गळून पडला. काही भागांत तुरीच्या शेंगा धरायला सुरुवात झाली होती. त्या शेंगाही गळाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. जेव्हा आवश्यकता होती, तेव्हा पाऊस आला नाही. आता आवश्यकता नसताना पावसाने हजेरी लावून पिकांची वाट लावल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहे. शेतकरी हा संकटामध्ये सातत्याने भरडला जात असल्याने शासनाने आता मायबाप म्हणून पाठीशी उभे राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसCropपीकwardha-acवर्धा