शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या रस्त्याची चौथ्यांदा निविदा, चार वर्षात ६७ कोटींचे काम गेले शंभर कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 10:40 IST

बदलले दोन कंत्राटदार : रस्त्याचे केवळ सहा किमी काम

आर्वी (वर्धा) : आर्वी-तळेगाव रस्त्याच्या एका बाजूचे सहा किलोमीटर अंतराचे काम काही प्रमाणात झाल्यानंतर उर्वरित कामासाठी चौथ्यांदा निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे ६७ कोटींचा खर्च आता ९९.५४ कोटींवर गेला आहे. १३ जानेवारी रोजी महामार्ग प्राधिकरणद्वारा ही निविदा काढण्यात आली.

मागील चार वर्षांपूर्वी तळेगाव-आर्वी महामार्गाचे काम सुरू झाले. कंत्राटदाराने हे काम वर्षभराच्या आतच सोडून हात वर केले होते. त्यानंतर दुसऱ्या कंत्राटदाराने कामाची सुरुवात केली. मात्र, गती खूपच मंद असल्याने चार वर्षांपासून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. अशातच राजकीय पक्षांद्वारे तसेच विविध संघटनांद्वारे रस्त्यासाठी वारंवार आंदोलने झाली. असे असतानाही कंत्राटदाराने काम कासवगतीने सुरू ठेवले. त्यामुळे दुसरा कंत्राटदारही काम सोडून गेल्याने या कामावर तिसरा कंत्राटदार नेमला आहे. सध्या रस्त्याच्या एका बाजूचे जवळपास सहा किलोमीटरचे काम पूर्ण झाल्याचे प्रवासी सांगतात. आर्वी ते तळेगाव रस्त्यावर असलेले पुलाचे कामही रखडलेले आहे, हे विशेष.

रस्ता कामाला आणखी किती वर्षे लागणार ?

प्रवाशांना होणाऱ्या त्रासाचे कंत्राटदाराला काही घेणे-देणे नसून दोन पुलांचे काम सुरू असले तरी काम केव्हा पूर्ण होईल, हे मात्र, सांगता येणार नाही. १२ किलोमीटर रस्त्याच्या कामापैकी अवघीच कामे पूर्ण झाली असून नवीन निविदेत जवळपास ३३ कोटींची झालेली वाढ तसेच जुन्या कंत्राटदारांना बरखास्त करून नवीन कंत्राटदाराला कामासाठी एका वर्षाचा कालावधी दिल्याने या रस्त्याच्या कामाला आणखी किती वर्षे लागतील आणि हे काम पूर्ण कधी होईल, हा प्रश्न प्रवाशांसमोर उभा ठाकला आहे. एचपीसी पाइपसह सहापैकी तीन लहान पुलांची कामे पूर्ण झाली आहेत. परंतु दोन पुलांचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने शंका व्यक्त केली जात आहे.

नव्या निविदेवर प्रश्नचिन्ह

चार वर्षांपूर्वी आर्वी ते तळेगावपर्यंतच्या रस्ता कामाची किंमत ६६.८८ कोटी होती. हे काम रखडल्याने कामाची किंमत १०० कोटींच्या घरात पोहोचली. तत्कालीन कंत्राटदाराने अर्ध्यापेक्षा जास्त काम केल्याने नव्याने निघालेल्या ९९.५४ कोटींच्या निविदेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या कामाकडे कुणाचेही लक्ष नसून याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अनेकांचे अपघाती मृत्यू झाले असून काहींना कायमचे अपंगत्वही आले आहे. रस्त्याचे काम जलद गतीने व्हावे, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच आता लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाwardha-acवर्धा