शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
4
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
5
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
6
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
7
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
8
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
9
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
10
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
11
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
12
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
13
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
14
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
15
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
16
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
17
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
18
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
19
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
20
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका

रखडलेल्या रस्त्याची चौथ्यांदा निविदा, चार वर्षात ६७ कोटींचे काम गेले शंभर कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 10:40 IST

बदलले दोन कंत्राटदार : रस्त्याचे केवळ सहा किमी काम

आर्वी (वर्धा) : आर्वी-तळेगाव रस्त्याच्या एका बाजूचे सहा किलोमीटर अंतराचे काम काही प्रमाणात झाल्यानंतर उर्वरित कामासाठी चौथ्यांदा निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे ६७ कोटींचा खर्च आता ९९.५४ कोटींवर गेला आहे. १३ जानेवारी रोजी महामार्ग प्राधिकरणद्वारा ही निविदा काढण्यात आली.

मागील चार वर्षांपूर्वी तळेगाव-आर्वी महामार्गाचे काम सुरू झाले. कंत्राटदाराने हे काम वर्षभराच्या आतच सोडून हात वर केले होते. त्यानंतर दुसऱ्या कंत्राटदाराने कामाची सुरुवात केली. मात्र, गती खूपच मंद असल्याने चार वर्षांपासून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. अशातच राजकीय पक्षांद्वारे तसेच विविध संघटनांद्वारे रस्त्यासाठी वारंवार आंदोलने झाली. असे असतानाही कंत्राटदाराने काम कासवगतीने सुरू ठेवले. त्यामुळे दुसरा कंत्राटदारही काम सोडून गेल्याने या कामावर तिसरा कंत्राटदार नेमला आहे. सध्या रस्त्याच्या एका बाजूचे जवळपास सहा किलोमीटरचे काम पूर्ण झाल्याचे प्रवासी सांगतात. आर्वी ते तळेगाव रस्त्यावर असलेले पुलाचे कामही रखडलेले आहे, हे विशेष.

रस्ता कामाला आणखी किती वर्षे लागणार ?

प्रवाशांना होणाऱ्या त्रासाचे कंत्राटदाराला काही घेणे-देणे नसून दोन पुलांचे काम सुरू असले तरी काम केव्हा पूर्ण होईल, हे मात्र, सांगता येणार नाही. १२ किलोमीटर रस्त्याच्या कामापैकी अवघीच कामे पूर्ण झाली असून नवीन निविदेत जवळपास ३३ कोटींची झालेली वाढ तसेच जुन्या कंत्राटदारांना बरखास्त करून नवीन कंत्राटदाराला कामासाठी एका वर्षाचा कालावधी दिल्याने या रस्त्याच्या कामाला आणखी किती वर्षे लागतील आणि हे काम पूर्ण कधी होईल, हा प्रश्न प्रवाशांसमोर उभा ठाकला आहे. एचपीसी पाइपसह सहापैकी तीन लहान पुलांची कामे पूर्ण झाली आहेत. परंतु दोन पुलांचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने शंका व्यक्त केली जात आहे.

नव्या निविदेवर प्रश्नचिन्ह

चार वर्षांपूर्वी आर्वी ते तळेगावपर्यंतच्या रस्ता कामाची किंमत ६६.८८ कोटी होती. हे काम रखडल्याने कामाची किंमत १०० कोटींच्या घरात पोहोचली. तत्कालीन कंत्राटदाराने अर्ध्यापेक्षा जास्त काम केल्याने नव्याने निघालेल्या ९९.५४ कोटींच्या निविदेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या कामाकडे कुणाचेही लक्ष नसून याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अनेकांचे अपघाती मृत्यू झाले असून काहींना कायमचे अपंगत्वही आले आहे. रस्त्याचे काम जलद गतीने व्हावे, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच आता लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाwardha-acवर्धा