शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नदीच्या पुरात शेतमजूर गेला वाहून; अद्याप शोध लागला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 20:50 IST

राजनी ते बोंदरठाणा रस्त्यापासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर एक बंधारा आहे.

वर्धा : कारंजा घाडगे तालुक्यात बोंदरठाणा, चिंचोली, शेलगाव उमाटे या परिसरामध्ये गुरुवारी (दि. २९) दुपारी ३ वाजेपासून मुसळधार पाऊस झाला. सायंकाळी बोंदरठाणा येथील खरकाडी नदीला मोठा पूर आला. नदीच्या पुरात शेतमजूर वाहून गेला.

अंबादास बंडूजी श्रीराम (४०, रा. बोंदरठाण) असे वाहून गेलेल्या शेतमजुराचे नाव आहे. वृत्त लिहिस्तोवर त्यांचा शोध लागला नव्हता. तालुक्यात गुरुवारी दुपारपासून पावसाने हजेरी लावली. काही वेळानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. अंबादास श्रीराम गावातील इतर शेतकऱ्याच्या शेतात फवारणी करीत होते. सायंकाळी ते घरी परत येत होते. दरम्यान, मुसळधार पावसामुळे खरकाडी नदीला मोठा पूर आला होता. त्यामुळे ते बाजूला असलेल्या प्रवीण हिंगवे यांच्या शेतात सहज बसण्यासाठी गेले. मात्र, घरी लवकर परतण्याच्या बेताने ते पुरातून निघण्यासाठी नदीत शिरले. मात्र, पुराचा अंदाज न आल्याने अंबादास वाहून गेले.

राजनी ते बोंदरठाणा रस्त्यापासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर एक बंधारा आहे. त्या बंधाऱ्यावरून अंबादास येत होते. परंतु त्यांना दुसरे टोक गाठता आले नाही. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते पुरात वाहून गेले. वृत्तलिहिस्तोवर त्यांचा शोध लागला नव्हता. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार ऐश्वर्या गिरी, नायब तहसीलदार भाऊ टिपरे, मंडळ अधिकारी भाऊ आत्राम, बोंदरठाणाच्या तलाठी ताई दळवणकर, कोतवाल भाऊ सोनुले घटनास्थळी दाखल झाले. रात्री अंधारात शोधकार्य करता येत नसल्याने वाहून गेलेल्या अंबादास श्रीराव यांचा शोध लागला नाही. दरम्यान, शोधकार्यात अडथळा येत असला तरी रात्रीपर्यंत शोधकार्य सुरू होते.