शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
3
लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
4
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
5
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
6
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
7
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
8
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
9
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
10
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
13
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
14
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
15
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
16
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
17
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
18
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
19
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
20
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...

दहा हजार नागरिकांनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:39 IST

स्वातंत्र्यांच्या यज्ञकुंडात प्राणाची आहुंती देणाऱ्या शहीदवीरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शहीद स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दहा हजार नागरिकांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करुन भावनांना वाट मोकळी करुन दिली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची उपस्थिती : ले. जनरल राजेंद्र निंभोरकर यांचा सत्कार, उरी सर्जिकल स्ट्राईकचा प्रत्यक्ष थरार सांगितला

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : स्वातंत्र्यांच्या यज्ञकुंडात प्राणाची आहुंती देणाऱ्या शहीदवीरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शहीद स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दहा हजार नागरिकांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करुन भावनांना वाट मोकळी करुन दिली. या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उरी सर्जिकल स्ट्राईकचे लेप्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचा सत्कार करण्यात आला.शहीद स्मृतीस्तंभावर सकाळी ११.३० वाजता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांचे आगमन झाले. त्यांनी मिल्ट्रीच्या बँड पथक सलामीने शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. त्यानंतर तालुका क्रीडा संकुलात आयोजित शहीद स्मृतिदिन कार्यक्रमाला सुरूवात झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक भास्करराव ठाकरे सपत्नीक उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून ना. चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रामदास आंबटकर, माजी आमदार दादाराव केचे, माजी खासदार विजय मुडे, तालुका निर्मितीचे प्रणेते श्रीधरराव ठाकरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, जि.प.च्या समाजकल्याण सभापती नीता गजाम, नगराध्यक्ष जयश्री मोकदम, पंचायत समिती सभापती नीता होले, कारंजा पंचायत समिती सभापती मंगेश खवशी, आर्वी पंचायत समिती सभापती शीला पवार, उपसभापती धर्मेंद्र राऊत, आर्वीचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक पारे, उपाध्यक्ष डॉ. किशोर गंजीवाले, राष्ट्रीय स्मृतीस्थळ अध्यक्ष डॉ. अरविंद मालपे, शहीद स्मृतिदिन कार्यक्रम समन्वयक राहुल ठाकरे, ले.जनरल राजेंद्र निंभोरकर यांची मंचावर उपस्थिती होती.यावेळी राहुल ठाकरे म्हणाले की, आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यात रोजगाराचे साधन नाही. त्यामुळे शासनाने रोजगार उपलब्ध करून द्यावे, महिला, तरूण, युवक, युवतींना रोजगारामुळे आर्थिक बळ प्राप्त होईल. बचत गटांना उत्पादनासाठी मार्केटींगची जोडही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून क्रांतीलढ्याचे स्थळ उपेक्षित आहे. शासनाने आद्यकर्तव्य समजून राष्ट्रीय स्मारक घोषित करावे. यासाठी संबंध नागरिक, तरूण मंडळी शासनावर विश्वास ठेवून असल्याचे मत डॉ.अरविंद मालपे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन शितल वेरूळकर, धर्मेंद्र ताटीसार यांनी केले तर आभार भरत वणझारा यांनी मानले.सर्जिकल स्ट्राईकच्या कथनाने तरळले अश्रूसत्काराला उत्तर देतांना ले.जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी उरी सर्जिकल स्ट्राईकचा अनुभव कथन केला. यातील एक-एक प्रसंगाचे वर्णन करताना वातावरण सुन्न झाले होते. त्यांच्या या अनुभव क थनाने पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी भावूक झाले होते तर काहींच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.मोदी सरकारच्या निर्णयक्षमतेमुळेच स्ट्राईक शक्य-बावनकुळेमोदी सरकारच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे १९४७ नंतर प्रथमच एवढे मोठे सर्जिकल स्ट्राईक करणे शक्य झाले आहे. या सैनिकांनीच संपूर्ण देशाला सुरक्षित ठेवले आहे. उणे ३५ डिग्रीच्या तापमनात ४० दिवसाचे अन्न सोबत घेवून आपली सेवा देतात, त्या सैनिकांच्या पाठीशी देश उभा राहिला पाहिजे. १२० कोटीच्या देशाला सैनिकांनीच संकटातून वेळोवेळी वाचविले आहे. सैनिकांना निर्णय घेण्याचे व सुसज्ज सुविधा देण्याचे काम सरकारने केल्याने देशाला स्थैर्यता मिळाली आहे, असे प्रतिपादन ना. बावनकुळे यांनी केले.