शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

दहा हजार नागरिकांनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:39 IST

स्वातंत्र्यांच्या यज्ञकुंडात प्राणाची आहुंती देणाऱ्या शहीदवीरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शहीद स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दहा हजार नागरिकांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करुन भावनांना वाट मोकळी करुन दिली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची उपस्थिती : ले. जनरल राजेंद्र निंभोरकर यांचा सत्कार, उरी सर्जिकल स्ट्राईकचा प्रत्यक्ष थरार सांगितला

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : स्वातंत्र्यांच्या यज्ञकुंडात प्राणाची आहुंती देणाऱ्या शहीदवीरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शहीद स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दहा हजार नागरिकांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करुन भावनांना वाट मोकळी करुन दिली. या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उरी सर्जिकल स्ट्राईकचे लेप्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचा सत्कार करण्यात आला.शहीद स्मृतीस्तंभावर सकाळी ११.३० वाजता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांचे आगमन झाले. त्यांनी मिल्ट्रीच्या बँड पथक सलामीने शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. त्यानंतर तालुका क्रीडा संकुलात आयोजित शहीद स्मृतिदिन कार्यक्रमाला सुरूवात झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक भास्करराव ठाकरे सपत्नीक उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून ना. चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रामदास आंबटकर, माजी आमदार दादाराव केचे, माजी खासदार विजय मुडे, तालुका निर्मितीचे प्रणेते श्रीधरराव ठाकरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, जि.प.च्या समाजकल्याण सभापती नीता गजाम, नगराध्यक्ष जयश्री मोकदम, पंचायत समिती सभापती नीता होले, कारंजा पंचायत समिती सभापती मंगेश खवशी, आर्वी पंचायत समिती सभापती शीला पवार, उपसभापती धर्मेंद्र राऊत, आर्वीचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक पारे, उपाध्यक्ष डॉ. किशोर गंजीवाले, राष्ट्रीय स्मृतीस्थळ अध्यक्ष डॉ. अरविंद मालपे, शहीद स्मृतिदिन कार्यक्रम समन्वयक राहुल ठाकरे, ले.जनरल राजेंद्र निंभोरकर यांची मंचावर उपस्थिती होती.यावेळी राहुल ठाकरे म्हणाले की, आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यात रोजगाराचे साधन नाही. त्यामुळे शासनाने रोजगार उपलब्ध करून द्यावे, महिला, तरूण, युवक, युवतींना रोजगारामुळे आर्थिक बळ प्राप्त होईल. बचत गटांना उत्पादनासाठी मार्केटींगची जोडही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून क्रांतीलढ्याचे स्थळ उपेक्षित आहे. शासनाने आद्यकर्तव्य समजून राष्ट्रीय स्मारक घोषित करावे. यासाठी संबंध नागरिक, तरूण मंडळी शासनावर विश्वास ठेवून असल्याचे मत डॉ.अरविंद मालपे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन शितल वेरूळकर, धर्मेंद्र ताटीसार यांनी केले तर आभार भरत वणझारा यांनी मानले.सर्जिकल स्ट्राईकच्या कथनाने तरळले अश्रूसत्काराला उत्तर देतांना ले.जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी उरी सर्जिकल स्ट्राईकचा अनुभव कथन केला. यातील एक-एक प्रसंगाचे वर्णन करताना वातावरण सुन्न झाले होते. त्यांच्या या अनुभव क थनाने पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी भावूक झाले होते तर काहींच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.मोदी सरकारच्या निर्णयक्षमतेमुळेच स्ट्राईक शक्य-बावनकुळेमोदी सरकारच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे १९४७ नंतर प्रथमच एवढे मोठे सर्जिकल स्ट्राईक करणे शक्य झाले आहे. या सैनिकांनीच संपूर्ण देशाला सुरक्षित ठेवले आहे. उणे ३५ डिग्रीच्या तापमनात ४० दिवसाचे अन्न सोबत घेवून आपली सेवा देतात, त्या सैनिकांच्या पाठीशी देश उभा राहिला पाहिजे. १२० कोटीच्या देशाला सैनिकांनीच संकटातून वेळोवेळी वाचविले आहे. सैनिकांना निर्णय घेण्याचे व सुसज्ज सुविधा देण्याचे काम सरकारने केल्याने देशाला स्थैर्यता मिळाली आहे, असे प्रतिपादन ना. बावनकुळे यांनी केले.