शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

दहा हजार नागरिकांनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:39 IST

स्वातंत्र्यांच्या यज्ञकुंडात प्राणाची आहुंती देणाऱ्या शहीदवीरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शहीद स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दहा हजार नागरिकांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करुन भावनांना वाट मोकळी करुन दिली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची उपस्थिती : ले. जनरल राजेंद्र निंभोरकर यांचा सत्कार, उरी सर्जिकल स्ट्राईकचा प्रत्यक्ष थरार सांगितला

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : स्वातंत्र्यांच्या यज्ञकुंडात प्राणाची आहुंती देणाऱ्या शहीदवीरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शहीद स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दहा हजार नागरिकांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करुन भावनांना वाट मोकळी करुन दिली. या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उरी सर्जिकल स्ट्राईकचे लेप्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचा सत्कार करण्यात आला.शहीद स्मृतीस्तंभावर सकाळी ११.३० वाजता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांचे आगमन झाले. त्यांनी मिल्ट्रीच्या बँड पथक सलामीने शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. त्यानंतर तालुका क्रीडा संकुलात आयोजित शहीद स्मृतिदिन कार्यक्रमाला सुरूवात झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक भास्करराव ठाकरे सपत्नीक उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून ना. चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रामदास आंबटकर, माजी आमदार दादाराव केचे, माजी खासदार विजय मुडे, तालुका निर्मितीचे प्रणेते श्रीधरराव ठाकरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, जि.प.च्या समाजकल्याण सभापती नीता गजाम, नगराध्यक्ष जयश्री मोकदम, पंचायत समिती सभापती नीता होले, कारंजा पंचायत समिती सभापती मंगेश खवशी, आर्वी पंचायत समिती सभापती शीला पवार, उपसभापती धर्मेंद्र राऊत, आर्वीचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक पारे, उपाध्यक्ष डॉ. किशोर गंजीवाले, राष्ट्रीय स्मृतीस्थळ अध्यक्ष डॉ. अरविंद मालपे, शहीद स्मृतिदिन कार्यक्रम समन्वयक राहुल ठाकरे, ले.जनरल राजेंद्र निंभोरकर यांची मंचावर उपस्थिती होती.यावेळी राहुल ठाकरे म्हणाले की, आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यात रोजगाराचे साधन नाही. त्यामुळे शासनाने रोजगार उपलब्ध करून द्यावे, महिला, तरूण, युवक, युवतींना रोजगारामुळे आर्थिक बळ प्राप्त होईल. बचत गटांना उत्पादनासाठी मार्केटींगची जोडही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून क्रांतीलढ्याचे स्थळ उपेक्षित आहे. शासनाने आद्यकर्तव्य समजून राष्ट्रीय स्मारक घोषित करावे. यासाठी संबंध नागरिक, तरूण मंडळी शासनावर विश्वास ठेवून असल्याचे मत डॉ.अरविंद मालपे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन शितल वेरूळकर, धर्मेंद्र ताटीसार यांनी केले तर आभार भरत वणझारा यांनी मानले.सर्जिकल स्ट्राईकच्या कथनाने तरळले अश्रूसत्काराला उत्तर देतांना ले.जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी उरी सर्जिकल स्ट्राईकचा अनुभव कथन केला. यातील एक-एक प्रसंगाचे वर्णन करताना वातावरण सुन्न झाले होते. त्यांच्या या अनुभव क थनाने पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी भावूक झाले होते तर काहींच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.मोदी सरकारच्या निर्णयक्षमतेमुळेच स्ट्राईक शक्य-बावनकुळेमोदी सरकारच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे १९४७ नंतर प्रथमच एवढे मोठे सर्जिकल स्ट्राईक करणे शक्य झाले आहे. या सैनिकांनीच संपूर्ण देशाला सुरक्षित ठेवले आहे. उणे ३५ डिग्रीच्या तापमनात ४० दिवसाचे अन्न सोबत घेवून आपली सेवा देतात, त्या सैनिकांच्या पाठीशी देश उभा राहिला पाहिजे. १२० कोटीच्या देशाला सैनिकांनीच संकटातून वेळोवेळी वाचविले आहे. सैनिकांना निर्णय घेण्याचे व सुसज्ज सुविधा देण्याचे काम सरकारने केल्याने देशाला स्थैर्यता मिळाली आहे, असे प्रतिपादन ना. बावनकुळे यांनी केले.