शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

७२ तासांत मिळणार ‘त्या’ कुटुंबांना दहा लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 16:12 IST

शक्रियेच्या कार्यक्रमानंतर दुथडी भरून वाहणाऱ्या वर्धा नदीत नाव उलटल्याने तारासावंगा येथील पाच व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २ लाख प्रतिव्यक्ती शासकीय मदत मंजूर झाली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मिळाली जिल्हा प्रशासनाला राशी

वर्धा : दशक्रियेच्या कार्यक्रमानंतर दुथडी भरून वाहणाऱ्या वर्धा नदीत नाव उलटल्याने तारासावंगा येथील पाच व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला होता. ही घटना अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील झुंज या पर्यटनस्थळी घडली होती. याच घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून दोन लाख प्रतिव्यक्ती शासकीय मदत मंजूर झाली असून, ही रक्कम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. सदर रक्कम मृतांच्या वारसांच्या बँक खात्यात येत्या ७२ तासांत वळती होणार आहे.

झुंज येथे घडलेल्या घटनेत अकरा व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला. यात वर्धा जिल्ह्यातील तारासावंगा येथील अतुल गणेश वाघमारे (२५), वृषाली अतुल वाघमारे १९), आदिती सुखदेव खंडाळे (१३), मोहिनी सुखदेव खंडाळे (२२) व अश्विनी अमर खंडाळे (२५) यांचा समावेश होता. गौरी विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली होती. ही घटना संपूर्ण राज्यात बहुचर्चित ठरली. मृतांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत देण्याची मागणी झाल्यानंतर शासनानेही त्या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार करून मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबींयांना मंजूर केली आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीचे १० लाख जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, ही रक्कम येत्या ७२ तासांत मृतांच्या वारसांच्या बँक खात्यात वळती होणार आहे.

तहसीलदारांचा प्रस्ताव ठरला महत्त्वाचा

झुंज येथील घटनेनंतर आष्टी येथील तहसीलदारांनी आर्वी येथील उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मृतांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळावी यासाठी प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनीही तातडीने कार्यवाही करून तो प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. त्यानंतर आता राज्य शासनाकडून शासकीय मदत मंजूर झाली आहे.

मृतांत सख्या बहिणींचा समावेश

झुंज येथे गेलेल्या तारासावंगा येथील पाच जणांना नाव उलटल्याने जलसमाधी मिळाली. जलसमाधी मिळालेल्यांत दोन सख्ख्या बहिणी, तसेच एक नवदाम्पत्य आणि एका नवविवाहितेचा समावेश आहे. विशेष म्हणजे गौर विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेत तब्बल आठ महिलांना जलसमाधी मिळाली हाेती.

झुंज येथील घटनेत मृत पावलेल्या कुटुंबियांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून एकूण १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. ही रक्कम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून, जिल्हा प्रशासनाने ती बँकेकडे वळती केली आहे. येत्या ७२ तासांत मृतांच्या वारसांच्या बँक खात्या ही रक्कम वळती होणार आहे.

- अर्चना मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा

टॅग्स :GovernmentसरकारfundsनिधीSocialसामाजिक