शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

७२ तासांत मिळणार ‘त्या’ कुटुंबांना दहा लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 16:12 IST

शक्रियेच्या कार्यक्रमानंतर दुथडी भरून वाहणाऱ्या वर्धा नदीत नाव उलटल्याने तारासावंगा येथील पाच व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २ लाख प्रतिव्यक्ती शासकीय मदत मंजूर झाली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मिळाली जिल्हा प्रशासनाला राशी

वर्धा : दशक्रियेच्या कार्यक्रमानंतर दुथडी भरून वाहणाऱ्या वर्धा नदीत नाव उलटल्याने तारासावंगा येथील पाच व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला होता. ही घटना अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील झुंज या पर्यटनस्थळी घडली होती. याच घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून दोन लाख प्रतिव्यक्ती शासकीय मदत मंजूर झाली असून, ही रक्कम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. सदर रक्कम मृतांच्या वारसांच्या बँक खात्यात येत्या ७२ तासांत वळती होणार आहे.

झुंज येथे घडलेल्या घटनेत अकरा व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला. यात वर्धा जिल्ह्यातील तारासावंगा येथील अतुल गणेश वाघमारे (२५), वृषाली अतुल वाघमारे १९), आदिती सुखदेव खंडाळे (१३), मोहिनी सुखदेव खंडाळे (२२) व अश्विनी अमर खंडाळे (२५) यांचा समावेश होता. गौरी विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली होती. ही घटना संपूर्ण राज्यात बहुचर्चित ठरली. मृतांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत देण्याची मागणी झाल्यानंतर शासनानेही त्या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार करून मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबींयांना मंजूर केली आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीचे १० लाख जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, ही रक्कम येत्या ७२ तासांत मृतांच्या वारसांच्या बँक खात्यात वळती होणार आहे.

तहसीलदारांचा प्रस्ताव ठरला महत्त्वाचा

झुंज येथील घटनेनंतर आष्टी येथील तहसीलदारांनी आर्वी येथील उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मृतांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळावी यासाठी प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनीही तातडीने कार्यवाही करून तो प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. त्यानंतर आता राज्य शासनाकडून शासकीय मदत मंजूर झाली आहे.

मृतांत सख्या बहिणींचा समावेश

झुंज येथे गेलेल्या तारासावंगा येथील पाच जणांना नाव उलटल्याने जलसमाधी मिळाली. जलसमाधी मिळालेल्यांत दोन सख्ख्या बहिणी, तसेच एक नवदाम्पत्य आणि एका नवविवाहितेचा समावेश आहे. विशेष म्हणजे गौर विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेत तब्बल आठ महिलांना जलसमाधी मिळाली हाेती.

झुंज येथील घटनेत मृत पावलेल्या कुटुंबियांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून एकूण १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. ही रक्कम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून, जिल्हा प्रशासनाने ती बँकेकडे वळती केली आहे. येत्या ७२ तासांत मृतांच्या वारसांच्या बँक खात्या ही रक्कम वळती होणार आहे.

- अर्चना मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा

टॅग्स :GovernmentसरकारfundsनिधीSocialसामाजिक