शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या तांत्रिक गुन्ह्यांनी वाढविली पोलिसांची डोकेदुखी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 16:06 IST

काही ठराविकांकडून होत असलेल्या कायद्याच्या गैरवापरामुळे अ‍ॅट्रॉसिटीच्या तांत्रिक तक्रारीही वाढल्याचे चित्र आहे. मागील आठ महिन्यात जिल्ह्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत २८ गुन्हे दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात आठ महिन्यांत २८ गुन्ह्यांची नोंद : हेवेदावे, राजकीय कुरघोड्यांसाठी गैरवापर वाढला

वर्धा : वैयक्तिक हेवेदावे, भांडण किंवा राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी जिल्ह्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर हाेत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले, तरी तक्रारदाराच्या विरोधातच चोरी, दरोडेखोरीचे गुन्हे दाखल करून त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. हेही वास्तव आहे. मात्र, काही ठराविकांकडून होत असलेल्या कायद्याच्या गैरवापरामुळे अ‍ॅट्रॉसिटीच्या तांत्रिक तक्रारीही वाढल्याचे चित्र आहे.

मागील आठ महिन्यात जिल्ह्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत २८ गुन्हे दाखल झाले आहेत. यात किरकोळ वादातून अथवा राजकीय वादातून दाखल झालेल्या तांत्रिक स्वरुपाच्या गुन्ह्यांमुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जातीय मानसिकतेतून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी अ‍ॅट्रॉसिटी कायदा अस्तित्वात आणला गेला. मात्र, आजही हे अन्याय, अत्याचार होत आहेत हे देखील वास्तव आहे.

जातिव्यवस्था या वर्गावर अन्याय करीत असली आणि अ‍ॅट्रॉसिटी कायदा दुर्बलांचे संरक्षण करीत असला तरी हा कायदाच आता आमच्यावर अन्याय करीत असल्याच्या भावनाही अधिक तीव्र होत आहेत. समाज बदलत आहे. आपापल्या जातीचे अस्तित्व, अस्मिता जपत एकमेकांपासून अलग राहणारे समाजसमूह आता जवळ येऊ लागले आहेत. शिक्षण, नोकऱ्या, उद्योग, व्यवसाय, कला संस्कृतीतून सहजीवनाचे एक नवीन पर्व सुरू झाले. शिक्षण वा नोकरीच्या निमित्ताने दररोज एकत्र बसणे, उठणे, खाणेपिणे, काम करणे होत असते. परंतु, हे चाललेले असताना अचानकपणे अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणे, ही बाब वृद्धिंगत होत असलेल्या सहजीवनाच्या प्रक्रियेला तडा देणारी ठरत आहे.

अ‍ॅट्रॉसिटीचे जेवढे गुन्हे दाखल होतात, त्यातील बहुतांश गुन्हे ‘तांत्रिक’ असतात, अशा तक्रारी आता वाढत आहे. यात काही प्रमाणत तथ्यही असले. राजकीय व वैयक्तिक हेवेदावे, भांडणे, राजकीय कुरघोड्या करण्यासाठी काही मंडळी या कायद्याचा गैरवापर करत असल्याच्याही तक्रारी वाढल्या आहेत.

जिल्ह्यात अ‍ॅट्रॉसिटीचे दाखल झालेले गुन्हे

अनुसूचित जाती - १७

अनुसूचित जमाती - ११

एकूण दाखल प्रकरणं- २८

कायद्याचा गैरवापर रोखण्याचे आव्हान

वर्षानुवर्षे चालत आलेल्या जातीव्यवस्था आजही कायम आहे. त्यातून अनुसूचित जाती-जमातीमधील नागरिकांवर होणारे अन्याय, अत्याचारही कायम आहेत. हेही वास्तव आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी अ‍ॅट्रॉसिटी कायदा अस्तित्वात आला, तरी त्यानंतरही अत्याचार थांबलेले नाहीत. ते रोखायचे आव्हान आजही कायम आहे. मात्र, या कायद्याच्या वाढत्या गैरवापरामुळे खऱ्या पीडितांवरही अन्यायच होत आहे. त्यातून सामाजिक सलोखाही धोक्यात येत आहे. त्यामुळे कायद्याचा गैरवापर रोखण्याचे आव्हानही उभे ठाकले आहे. त्यासाठी सर्व समाजाच्या साथीने, प्रबोधनाच्या मार्गाने काही पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

‘तांत्रिक’ किती व ‘खरे’ किती?

मागील वर्षभरात २८ गुन्हे दाखल झाली आहेत. या गुन्ह्यांपैकी ‘तांत्रिक’ किती व ‘खरी’ किती, असा सवाल उपस्थित होत आहे. तांत्रिक गुन्ह्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी तर वाढलीच आहे मात्र, खऱ्या पीडितांना न्याय मिळण्यावर याचा थेट परिणाम होतो आहे. तांत्रिक गुन्ह्यांची संख्या वाढण्यास सुरुवात झाल्यामुळे इतर समाजांमध्येही अस्वस्थता वाढत आहे. त्यातून पोलीस यंत्रणेवरही ताण व जबाबदारीही वाढल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा