शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या तांत्रिक गुन्ह्यांनी वाढविली पोलिसांची डोकेदुखी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 16:06 IST

काही ठराविकांकडून होत असलेल्या कायद्याच्या गैरवापरामुळे अ‍ॅट्रॉसिटीच्या तांत्रिक तक्रारीही वाढल्याचे चित्र आहे. मागील आठ महिन्यात जिल्ह्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत २८ गुन्हे दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात आठ महिन्यांत २८ गुन्ह्यांची नोंद : हेवेदावे, राजकीय कुरघोड्यांसाठी गैरवापर वाढला

वर्धा : वैयक्तिक हेवेदावे, भांडण किंवा राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी जिल्ह्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर हाेत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले, तरी तक्रारदाराच्या विरोधातच चोरी, दरोडेखोरीचे गुन्हे दाखल करून त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. हेही वास्तव आहे. मात्र, काही ठराविकांकडून होत असलेल्या कायद्याच्या गैरवापरामुळे अ‍ॅट्रॉसिटीच्या तांत्रिक तक्रारीही वाढल्याचे चित्र आहे.

मागील आठ महिन्यात जिल्ह्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत २८ गुन्हे दाखल झाले आहेत. यात किरकोळ वादातून अथवा राजकीय वादातून दाखल झालेल्या तांत्रिक स्वरुपाच्या गुन्ह्यांमुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जातीय मानसिकतेतून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी अ‍ॅट्रॉसिटी कायदा अस्तित्वात आणला गेला. मात्र, आजही हे अन्याय, अत्याचार होत आहेत हे देखील वास्तव आहे.

जातिव्यवस्था या वर्गावर अन्याय करीत असली आणि अ‍ॅट्रॉसिटी कायदा दुर्बलांचे संरक्षण करीत असला तरी हा कायदाच आता आमच्यावर अन्याय करीत असल्याच्या भावनाही अधिक तीव्र होत आहेत. समाज बदलत आहे. आपापल्या जातीचे अस्तित्व, अस्मिता जपत एकमेकांपासून अलग राहणारे समाजसमूह आता जवळ येऊ लागले आहेत. शिक्षण, नोकऱ्या, उद्योग, व्यवसाय, कला संस्कृतीतून सहजीवनाचे एक नवीन पर्व सुरू झाले. शिक्षण वा नोकरीच्या निमित्ताने दररोज एकत्र बसणे, उठणे, खाणेपिणे, काम करणे होत असते. परंतु, हे चाललेले असताना अचानकपणे अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणे, ही बाब वृद्धिंगत होत असलेल्या सहजीवनाच्या प्रक्रियेला तडा देणारी ठरत आहे.

अ‍ॅट्रॉसिटीचे जेवढे गुन्हे दाखल होतात, त्यातील बहुतांश गुन्हे ‘तांत्रिक’ असतात, अशा तक्रारी आता वाढत आहे. यात काही प्रमाणत तथ्यही असले. राजकीय व वैयक्तिक हेवेदावे, भांडणे, राजकीय कुरघोड्या करण्यासाठी काही मंडळी या कायद्याचा गैरवापर करत असल्याच्याही तक्रारी वाढल्या आहेत.

जिल्ह्यात अ‍ॅट्रॉसिटीचे दाखल झालेले गुन्हे

अनुसूचित जाती - १७

अनुसूचित जमाती - ११

एकूण दाखल प्रकरणं- २८

कायद्याचा गैरवापर रोखण्याचे आव्हान

वर्षानुवर्षे चालत आलेल्या जातीव्यवस्था आजही कायम आहे. त्यातून अनुसूचित जाती-जमातीमधील नागरिकांवर होणारे अन्याय, अत्याचारही कायम आहेत. हेही वास्तव आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी अ‍ॅट्रॉसिटी कायदा अस्तित्वात आला, तरी त्यानंतरही अत्याचार थांबलेले नाहीत. ते रोखायचे आव्हान आजही कायम आहे. मात्र, या कायद्याच्या वाढत्या गैरवापरामुळे खऱ्या पीडितांवरही अन्यायच होत आहे. त्यातून सामाजिक सलोखाही धोक्यात येत आहे. त्यामुळे कायद्याचा गैरवापर रोखण्याचे आव्हानही उभे ठाकले आहे. त्यासाठी सर्व समाजाच्या साथीने, प्रबोधनाच्या मार्गाने काही पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

‘तांत्रिक’ किती व ‘खरे’ किती?

मागील वर्षभरात २८ गुन्हे दाखल झाली आहेत. या गुन्ह्यांपैकी ‘तांत्रिक’ किती व ‘खरी’ किती, असा सवाल उपस्थित होत आहे. तांत्रिक गुन्ह्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी तर वाढलीच आहे मात्र, खऱ्या पीडितांना न्याय मिळण्यावर याचा थेट परिणाम होतो आहे. तांत्रिक गुन्ह्यांची संख्या वाढण्यास सुरुवात झाल्यामुळे इतर समाजांमध्येही अस्वस्थता वाढत आहे. त्यातून पोलीस यंत्रणेवरही ताण व जबाबदारीही वाढल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा