शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा तालुका मेळावा

By admin | Updated: June 11, 2014 23:31 IST

कारंजा तालुक्यातील विविध शिक्षण संस्थांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शालेय पोषण आहार (मध्यान्ह भोजन) तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आष्टी तालुका मेळावा गुरुदेव सेवा मंडळ सभागृह

वर्धा : कारंजा तालुक्यातील विविध शिक्षण संस्थांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शालेय पोषण आहार (मध्यान्ह भोजन) तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आष्टी तालुका मेळावा गुरुदेव सेवा मंडळ सभागृह कारंजा येथे पार पडला़ मेळाव्यास कारंजा तालुक्यातील १५० महिला उपस्थित होत्या.सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून मेळाव्यास प्रारंभ झाला़ यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जायदा हुसैन, सुनीता निंभारकर, दिलीप शापामोहन, महादेव गारपवार अमरावती, सिटूचे जिल्हाध्यक्ष व कामगार नेते यशवंत झाडे, सीताराम लोहकरे, भैय्या देशकर, लिला रामटेके, संध्या संभे आष्टी, संगीता मरस्कोल्हे कारंजा आदी उपस्थित होते़ मेळाव्याचे उद्घाटन दिलीप शापामोहन यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी सीताराम लोहकरे यांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या एका जनहित याचिकेतून पश्चिम बंगाल सरकारद्वारे अनेक वर्षांपासून राबविल्या जात असलेली मध्यान्ह भोजन योजना २००४ मध्ये प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता विस्तारीत करण्यात आली़ भारतातील मध्यान्ह भोजन ही जगातील सर्वात मोठी योजना आहे. देशभरातील १३ लाख शाळांतील विद्यार्थी लाभ घेतात. यात १२ कोटी मुले दररोज दुपारचे जेवण घेतात. यावर वार्षिक १३ हजार २१५ हजार कोटी रुपये सरकार खर्च करते. असे असताना जगातील सर्वाधिक ४० टक्के कूपोषित मुले भारतात आहेत. ही सर्व गरिबांची मागास जमातींची मुले आहेत. भारत सरकारने योजना सुरू केली खरी; पण त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या नाही. प्रत्येक शाळेत स्वतंत्र पाकगृह नाही. स्वच्छ पिण्याचे पाणी नाही. विद्यार्थ्यांना जेवणासाठी स्वतंत्र खोली, भोजन गृह नाही. यामुळे शाळेतील एखाद्या पडक्या खोलीत अन्न शिजवावे लागते. मुलांना उघड्यावर जेवावे लागते. या समस्या दूर करून मध्यान्ह भोजन निर्मितीचे काम करणाऱ्या महिलांना दरमहा १० हजार रुपये मानधन द्यावे, सर्व सोई-सवलती मिळाव्या. सामाजिक सुरक्षा मिळावी. शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यासाठी संघटीत व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.भैय्या देशकर, महादेव गारपवार, दिलीप शापामोहन, अनिल चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. अंगणवाडी सेविका अर्चना मोकाशी, रंजना सहारे, संजय भगत, संजय देशमुख यांनी समस्या मांडल्या. शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. मेळाव्याला नीता डोंगरे, प्रमीला घागरे, देवका बागडे, मरस्कोल्हे आदींनी सहकार्य केले़(कार्यालय प्रतिनिधी)