शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

महात्मा गांधींचे आदीनिवास टाकतेय कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 12:46 AM

येथील ऐतिहासिक आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांचे सहकारी ज्या प्रथम निवासस्थानात राहिले, ते निवासस्थान आदिनिवास या नावाने प्रसिद्ध आहे. त्या निवासाला आज ८२ वर्षे पूर्ण झालीत. या काळात त्याचे छत झुकल्याने त्याची दुरूस्ती आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसेवाग्राम आश्रमात पारंपरिक पद्धतीने उपाययोजना : पर्यटकांना काही दिवस या इमारत परिसरात ‘नो एंट्री’

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : येथील ऐतिहासिक आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांचे सहकारी ज्या प्रथम निवासस्थानात राहिले, ते निवासस्थान आदिनिवास या नावाने प्रसिद्ध आहे. त्या निवासाला आज ८२ वर्षे पूर्ण झालीत. या काळात त्याचे छत झुकल्याने त्याची दुरूस्ती आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात येत आहे. ही दुरूस्ती करताना मुख्य इमारतीत कुठलाही फरक पडणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे.आश्रमाला बरेच वर्ष झाले असून येथील प्रत्येक इमारत माती, कुड, बल्ली, बांबू, बोरे, कवेलू आदि स्थानिक साहित्याच्या माध्यमातून बनविण्यात आले आहे. यामुळे त्या वास्तुची वर्षाला ऋतू बदलताच सुरक्षा करावी लागते. सध्या परिसरात माकडांचा हैदोस वाढल्याने या छाताची दैनावस्था झाली आहे. शिवाय या दिवसात छतावरील कवेलू फेरावे लागतात.आश्रमातील या पहिल्या कुटीचा मागचा भाग वाकल्याने त्याची दुरूस्ती करणे गरजेचे आहे. कुटी राष्ट्रीय स्मारक असल्याने त्यांच्या जतन व संरक्षणाच्या दृष्टीने बल्ली व बांबूवर विशेष प्रक्रिया करण्यात येत आहे. बांबू मोरचूद, गोमुत्र, निंबोळी अर्क इत्यादीच्या मिश्रणात ठेवण्यात आलेले आहे. या सर्वांचा योग्य प्रकारे उपयोग करून मागील भाग तशाचा तसा नव्याने बनविण्यात येत आहे. ही दुरूस्ती २० ते २५ वर्षानंतर होत असल्याची माहिती अधीक्षक भावेष चव्हाण यांनी दिली. लवकरच नव्याने मागचा भाग तयार होवून दर्शनार्थी पाहू शकेल, असेही त्यांनी सांगितले. सध्या हे काम जोरात असून ते लवकरच पूर्ण होण्याचे संकेत आहेत.१०० रुपयांत तयार झाले होते आदिनिवास१९३६ मध्ये गांधजींनी शेगावमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. जमनालाल बजाज यांच्या मालकीच्या शेतातील जांबाच्या बागेत अस्थाई झोपडी करून गांधीजी सहकाऱ्यांसोबत राहिले. चार-पाच दिवसानंतर ते चरखा यात्रेसाठी निघाले. या ठिकाणी राहण्याच्या निर्णय झाल्यानंतर प्रथम कुटी बनविण्यासाठी काही अटी मीराबहन, बलवंतसिंग, मन्नालाल शहा यांनी समोर ठेवल्या. यात स्थानिक संसाधन कारागिर व १०० रुपयांपेक्षा अधिक खर्च नको, असे सुद्धा सांगितले. बापू चरखा यात्रेला गेल्यानंतर प्रथम निवासस्थानच्या कामाला सुरूवात झाली. १६ जून १९३६ मध्ये बापू परत शेगावला आल्यानंतर याच कुटीमध्ये ते कस्तुरबा आणि अन्य सहकाºयांसोबत राहिले. १९४२ च्या ठरावाची बैठक सुद्धा याच कुटीत झाली होती.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी