शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

कृषी योजनांचा लाभ घेऊन शेतातील उत्पन्न दुप्पट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:36 IST

विद्यमान केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील उत्पादन दुप्पट करून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.

ठळक मुद्देआमदारांचे आवाहन : गिलगाव येथे शेतकरी दिन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यमान केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील उत्पादन दुप्पट करून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.राज्य शासनाच्या निर्देशानुसार कै. विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्मदिन शेतकरी दिवस म्हणून शुक्रवारी गिलगाव येथे साजरा करण्यात आला. जिल्हास्तरीय या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गिलगावचे सरपंच किरण कोवासे, उपसरपंच पिंपळशेंडे, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, तालुका कृषी अधिकारी वीरेंद्र राजपूत, चंद्रकांत ठाकरे, कृषी पर्यवेक्षक चव्हाण, मेश्राम, कृषी सहायक भैसारे, तरंग शेतकरी उत्पादक कंपनीचे कैलास घोगरे, सचिन सातपुते, सतीश पुरकमवार यांच्यासह गिलगाव परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.याप्रसंगी आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांनी अनुषंगिक योजनांची कारण मिमांसा केली. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी स्थानिक निविष्ठा तयार करून सेंद्रीय शेती तंत्रज्ञान अवलंबिण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणे गडचिरोलीतील शेतकऱ्यांनी कष्टाळूवृत्तीने व तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी सांगितले. सदर कार्यक्रमात भात पिकांचे किड व रोग संरक्षण, शेतीतील महिलांचा सहभाग याविषयी उपविभागीय कृषी अधिकारी हिरळकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शेतकऱ्यांना खोडकिडीच्या नियंत्रणासाठी आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते कामगंध सापळ्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.संचालन हेमंत उंदीरवाडे यांनी केले. कार्यक्रमाला गिलगाव, नवरगाव, थाटरी व कोतेगाव परिसरातील ३०० शेतकरी उपस्थित होते.पूरग्रस्तांसाठी १० हजारांची मदतभेंडाळा येथील तरंग शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत केरळमधील पूरग्रस्तांसाठी १० हजार रूपयांची मदत करण्यात आली. सदर दहा हजार रूपयांचा धनादेश आ. डॉ. देवराव होळी यांच्या मार्फत उपविभागीय कृषी अधिकारी हिरळकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. भेंडाळा, फोकुर्डी, दोटकुली येथील युवक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तरंग शेतकरी उत्पादक कंपनी नुकतीच स्थापन केली. सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून या शेतकरी कंपनीतर्फे १० हजार रूपयांची मदत केरळमधील पूरग्रस्तांसाठी जिल्हा प्रशासनाकडे जमा करण्यात आली.

टॅग्स :agricultureशेतीDevrao Holiदेवराव होळी