शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यफूल लागवड ठरतेय उत्पन्नाचे नवे साधन

By admin | Updated: May 16, 2015 02:16 IST

सूर्यफुलाचे पीक हे खरीप, रबी व उन्हाळी अशा तीनही हंगामात घेता येते.

वर्धा : सूर्यफुलाचे पीक हे खरीप, रबी व उन्हाळी अशा तीनही हंगामात घेता येते. यामुळे दुष्काळ व नापिकीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना हे पीक उत्पन्नाचे नवे साधन ठरत आहे. याला जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन केल्यास मधविक्रीतून आर्थिक उत्पन्न मिळते. ही बाब हेरुन जिल्हातील काही भागात सूर्यफुलाची लागवड केली जात आहे.सूर्यफुलाच्या एकूण लागवडीपैकी ४० टक्के लागवड खरीप तर ६ टक्के लागवड रबी व उन्हाळी हंगामात केली जाते. सूर्यफुलाची बागायतीखाली लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळते. सूर्यफुलाच्या तेलाचे आहारातील महत्त्व तसेच बाजारातील मागणी व मिळणाऱ्या किंमत पाहता सूर्यफूल पिकांखालील क्षेत्रात उत्पादकतेत वाढ करणे गरजेचे असल्याचे कृषितज्ज्ञ म्हणतात. सूर्यफूल हे पीक साधारणत: ८० ते १०० दिवसात येत असते. बहुविध दुबार पीक, क्रमिक पीक व आंतर पीक पद्धतीस योग्य व कमी पाण्यावर येणारे हे पीक आहे. पाण्याचा ताण सहन करीत कमी लागवड खर्च असतो. यामुळे सूर्यफुलाची लागवड करणे शेतकऱ्यांसाठी हिताचे ठरत आहे. बी-बियाण्यांची योग्य तपासणी करून लागवड केल्यास यासह प्रतिहेक्टरी रोपांची संख्या योग्य राखणे, हलक्या व कमी प्रतिच्या जमिनीत लागवड न करणे, वेळीच व योग्य प्रकारच्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव नष्ट करणे, उन्हाळी सूर्यफुलास जमिनीच्या मुबलकतेनुसार पाणी देणे या बाबींची खबरदारी घेतल्यास चांगले उत्पन्न मिळते. शिवाय याला जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन करता येणे शक्य आहे. सूर्यफुलात परागीकरणासाठी मधमाश्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. यामुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी या सूर्यफूल लागवडीचा प्रयोग केला असून यातून नवे उत्पन्नाचे साधन ठरत असल्याचे दिसत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)