शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

वर्धा जिल्ह्यात दीड वर्षाच्या कालावधीत वडिलांसह दाेन मुलांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 22:37 IST

Wardha News वर्धा जिल्ह्यातील बांबार्डा या गावी अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत वडिल व दोन मुलांनी आत्महत्या केल्याने गावातील समाजमन सुन्न झाले आहे.

ठळक मुद्देवर्षभरापूर्वी वडील, सहा महिन्यांपूर्वी थोरला तर आता धाकट्याने संपविले जीवन बांबर्डा येथील घटनेने परिसरात हळहळ

वर्धा: एक हसता-खेळता छोटासा परिवार होता. आजी-आजोबा, आई-वडील आणि दोन मुले. सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक वडिलांनी आत्महत्या केली. त्या पाठोपाठ सहा महिन्यांपूर्वी मोठ्या मुलानेही आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. त्यांच्यानंतर गुरुवारी १४ वर्षीय थोरल्या मुलानेही घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना बांबर्डा या गावी घडली. दीड वर्षात एकाच परिवारातील तिघांनी आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

आर्यन मनोज आत्रात (१४) रा. बांबर्डा, असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनच्या वडिलांनी वर्षभरापूर्वी तर भावाने सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. त्यामुळे आर्यन हा आजी-आजोबासोबत राहत होता. वडील व भाऊ जगातून निघून गेले तर आई सोबत राहत नसल्याने आर्यन तणावात असायचा, असे सांगितले जाते.

अशातच गुरुवारी आजी-आजोबा शेतात कामाकरिता गेले असता घरी कुणीही नसल्याचे पाहून घरातील लोखंडी अँगलला दोराने गळफास घेतला. याची माहिती मिळताच त्याला लागलीच उपचाराकरिता वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही कळू शकले नाही.

घटनेची माहिती मिळताच वडनेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी लक्ष्मण केंद्रे, सतीश नैताम यांनी पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहे. आर्यनच्या या आत्महत्येने वृद्ध आजी-आजोबांचा आधार हिरावला. त्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट कोसळल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Deathमृत्यू