शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
3
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
4
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
5
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
6
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
7
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
8
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
9
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
10
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
11
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
12
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
13
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
14
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
15
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
16
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
17
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
18
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
19
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
20
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!

उत्तर प्रदेशातील साखर लॉबीच्या दबावातच ठरतात ऊसाचे दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:24 IST

केंद्र सरकारने एफआरपी प्रतिक्विंटल शंभर रुपये वाढवून दिला आहे. मात्र, साखर विक्रीच्या किमान दराबाबत अजूनही भूमिका स्पष्ट केलेली नाही.

ठळक मुद्देज्येष्ठ शेतकरी नेत्याचा दावाएफआरपीमध्ये केवळ शंभर रुपयांची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्राची साखर लॉबी मजबूत असली तरीही केंद्र सरकार दरवर्षी उत्तर प्रदेशातील साखर लॉबीच्या दबावात ऊसाचे दर निश्चित करीत असते. त्यामुळे महाराष्ट्राच्या साखर कारखानदारांना नेहमी उपेक्षेचीच भूमिका पार पडावी लागते. हे आजवर अनेक घटनातून दिसून आल्याचा दावा ज्येष्ठ शेतकरी नेत्यांनी व्यक्त केला आहे. ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या साखर हंगामासाठी केंद्र सरकारने एफआरपी प्रतिक्विंटल शंभर रुपये वाढवून दिला आहे. मात्र, साखर विक्रीच्या किमान दराबाबत अजूनही भूमिका स्पष्ट केलेली नाही. उत्तर प्रदेशातील परिस्थिती पाहून यावर केंद्र सरकार भूमिका निश्चित करेल, असे मत कृषी अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

भारत सरकारच्या कृषी मूल्य आयोगाने जाहीर केलेल्या उसाच्या हमीभावापेक्षा जास्त हमीभाव जाहीर करण्याचा अधिकार उत्तर प्रदेश सरकारला आहे. याला स्टेट अ‍ॅडमिस्टर्ड प्राईस (एसएपी) अस म्हणतात. पूर्वी साखरेवर ६५ टक्के लेव्ही होती, तेव्हा उत्तर प्रदेशच्या ऊस उत्पादकांना उसाची जास्त किंमत देणे शक्य व्हावे म्हणून पश्चिम व दक्षिण भारतापेक्षा उत्तरेत लेव्हीच्या साखरेला जास्त किंमत देण्याचे धोरण होते. नंतर लेव्ही ५ व १० टक्के झाली व ऊसाच्या किमती बाजारातील साखरेच्या किमतीवर देण्याची व्यवस्था झाली. पाकिस्तानातून साखर आयात झाल्याने साखरेचे भाव पडले. उत्तर प्रदेशातील कारखानदारांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देता येत नव्हते म्हणून १९९९ मध्ये तत्कालीन सरकारने साखरेचे बाजारातील भाव वाढविण्यासाठीच ६० टक्क्यांपर्यंत आयातकर वाढविला.

या धोरणामुळे व्यापाºयांना साखर आयातीची संधी मिळाली. जागतिक बाजारात साखरेच्या भावात मंदी येताच भारतात साखरेची आयात वाढू लागली. त्यावेळी जागतिक बाजारात साखरेचे भाव २०० ते २५० डॉलर प्रतिटन होते. (८.५० ते १०.५० प्रति किलो) आयात कर वाढवूनही साखर बाजारातील मंदी रोखता येत नव्हती, म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने दर महिन्याला बाजारात साखर किती विकायची, (कोटा) हे अधिकार पूर्णपणे केंद्र सरकारच्या अधिकारात घेणारे विधेयक संसदेत मंजूर करून घेतले. त्याला घटनेच्या नवव्या परिशिष्टाचे संरक्षण दिले. या निर्णयामुळेच बाजारात १२ रुपये किलोपर्यंत पडलेले साखरेचे भाव १५ ते १६ रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढले व नंतर ते २० ते २१ रुपयांपर्यंत वाढले. या निर्णयामागचे खरे कारण केवळ महाराष्ट्राच्या सहकार लॉबीचा दबाव नसून, उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा दबाव होता. साखर लॉबीच्या दबावात येऊन उसाला एसएपी देता यावा म्हणून साखरेचे दर निश्चित करतात. पण, शासनाची हीच भूमिका कापूस उत्पादकांबाबत का राहात नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

दरवर्षी शासनाकडून पिकांचे हमीभाव जाहीर केले जातात. यावर्षी खरिपातील पिकांचे हमीभाव जाहीर करण्यात आले. तसेच आता केंद्र सरकारने साखर हंगामाकरिता एफआरपी प्रतिक्विंटल शंभर रुपये वाढवून दिला आहे. ही नियमित प्रक्रिया आहे, यात नवे काहीच नाही. साखर लॉबीचा नेहमीच शासनावर दबाव राहिला आहे. विशेषत: उत्तर प्रदेशातील साखर लॉबीचा प्रभाव अधिक असतो.विजय जावंधिया, शेतकरी संघटनेचे पाईक

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने