शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

उत्तर प्रदेशातील साखर लॉबीच्या दबावातच ठरतात ऊसाचे दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:24 IST

केंद्र सरकारने एफआरपी प्रतिक्विंटल शंभर रुपये वाढवून दिला आहे. मात्र, साखर विक्रीच्या किमान दराबाबत अजूनही भूमिका स्पष्ट केलेली नाही.

ठळक मुद्देज्येष्ठ शेतकरी नेत्याचा दावाएफआरपीमध्ये केवळ शंभर रुपयांची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्राची साखर लॉबी मजबूत असली तरीही केंद्र सरकार दरवर्षी उत्तर प्रदेशातील साखर लॉबीच्या दबावात ऊसाचे दर निश्चित करीत असते. त्यामुळे महाराष्ट्राच्या साखर कारखानदारांना नेहमी उपेक्षेचीच भूमिका पार पडावी लागते. हे आजवर अनेक घटनातून दिसून आल्याचा दावा ज्येष्ठ शेतकरी नेत्यांनी व्यक्त केला आहे. ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या साखर हंगामासाठी केंद्र सरकारने एफआरपी प्रतिक्विंटल शंभर रुपये वाढवून दिला आहे. मात्र, साखर विक्रीच्या किमान दराबाबत अजूनही भूमिका स्पष्ट केलेली नाही. उत्तर प्रदेशातील परिस्थिती पाहून यावर केंद्र सरकार भूमिका निश्चित करेल, असे मत कृषी अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

भारत सरकारच्या कृषी मूल्य आयोगाने जाहीर केलेल्या उसाच्या हमीभावापेक्षा जास्त हमीभाव जाहीर करण्याचा अधिकार उत्तर प्रदेश सरकारला आहे. याला स्टेट अ‍ॅडमिस्टर्ड प्राईस (एसएपी) अस म्हणतात. पूर्वी साखरेवर ६५ टक्के लेव्ही होती, तेव्हा उत्तर प्रदेशच्या ऊस उत्पादकांना उसाची जास्त किंमत देणे शक्य व्हावे म्हणून पश्चिम व दक्षिण भारतापेक्षा उत्तरेत लेव्हीच्या साखरेला जास्त किंमत देण्याचे धोरण होते. नंतर लेव्ही ५ व १० टक्के झाली व ऊसाच्या किमती बाजारातील साखरेच्या किमतीवर देण्याची व्यवस्था झाली. पाकिस्तानातून साखर आयात झाल्याने साखरेचे भाव पडले. उत्तर प्रदेशातील कारखानदारांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देता येत नव्हते म्हणून १९९९ मध्ये तत्कालीन सरकारने साखरेचे बाजारातील भाव वाढविण्यासाठीच ६० टक्क्यांपर्यंत आयातकर वाढविला.

या धोरणामुळे व्यापाºयांना साखर आयातीची संधी मिळाली. जागतिक बाजारात साखरेच्या भावात मंदी येताच भारतात साखरेची आयात वाढू लागली. त्यावेळी जागतिक बाजारात साखरेचे भाव २०० ते २५० डॉलर प्रतिटन होते. (८.५० ते १०.५० प्रति किलो) आयात कर वाढवूनही साखर बाजारातील मंदी रोखता येत नव्हती, म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने दर महिन्याला बाजारात साखर किती विकायची, (कोटा) हे अधिकार पूर्णपणे केंद्र सरकारच्या अधिकारात घेणारे विधेयक संसदेत मंजूर करून घेतले. त्याला घटनेच्या नवव्या परिशिष्टाचे संरक्षण दिले. या निर्णयामुळेच बाजारात १२ रुपये किलोपर्यंत पडलेले साखरेचे भाव १५ ते १६ रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढले व नंतर ते २० ते २१ रुपयांपर्यंत वाढले. या निर्णयामागचे खरे कारण केवळ महाराष्ट्राच्या सहकार लॉबीचा दबाव नसून, उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा दबाव होता. साखर लॉबीच्या दबावात येऊन उसाला एसएपी देता यावा म्हणून साखरेचे दर निश्चित करतात. पण, शासनाची हीच भूमिका कापूस उत्पादकांबाबत का राहात नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

दरवर्षी शासनाकडून पिकांचे हमीभाव जाहीर केले जातात. यावर्षी खरिपातील पिकांचे हमीभाव जाहीर करण्यात आले. तसेच आता केंद्र सरकारने साखर हंगामाकरिता एफआरपी प्रतिक्विंटल शंभर रुपये वाढवून दिला आहे. ही नियमित प्रक्रिया आहे, यात नवे काहीच नाही. साखर लॉबीचा नेहमीच शासनावर दबाव राहिला आहे. विशेषत: उत्तर प्रदेशातील साखर लॉबीचा प्रभाव अधिक असतो.विजय जावंधिया, शेतकरी संघटनेचे पाईक

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने