शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

वर्धा जिल्ह्यातील जलाशये अर्धेअधिक भरली; गेल्या वर्षी होता ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 15:59 IST

गेल्या महिन्यात आणि या जुलै महिन्यांमध्ये दमदार पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने वर्धा जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघू अशा सर्वच जलाशयांची पातळी ५० टक्केच्या वर गेली आहे.

ठळक मुद्देमोठ्या ११ तर २० लघु प्रकल्पांचा समावेश गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचा जोर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रारंभी पावसाने दडी मारल्यामुळे जलाशयांची पातळी खालावली होती. मात्र गेल्या महिन्यात आणि या जुलै महिन्यांमध्ये दमदार पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघू अशा सर्वच जलाशयांची पातळी ५० टक्केच्या वर गेली आहे. गेल्यावर्षी या महिन्यापर्यंत ठणठण असलेल्या जलाशयात यावर्षी मात्र पाण्याची मुबलकता दिसून येत आहे.

जिल्ह्यातील आठही तालुक्यात ११ मोठे तर २० लघू व मध्यम जलाशय आहेत. गेल्यावर्षी २१ जूलैपर्यंत आठही तालुक्यामध्ये १६१८.९७ मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली होती. यावर्षी याच कालावधीमध्ये २९३६.६५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे डोंगरगाव प्रकल्प हाऊसफुल्ल झाला असून वर्धा कारनदी प्रकल्पही ९७.६१ टक्के भरला आहे. सोबतच दहेगाव (गोंडी) हा लघू प्रकल्प ९९.०० टक्के भरला आहे. यासह आंजी बोरखेडी, रोठा-२, आष्टी, पिलापूर, कन्नमवारग्राम, परसोडी हे लघू प्रकल्पातही सध्या ७० टक्क्यापेक्षा अधिक जलसाठा आहेत. जिल्ह्यात उशिराका होईना पण, दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. विशेषत: सर्वच तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. अजून दमदार पावसाचे दिवस शिल्लक असल्याने यावर्षी सर्वच जलाशये हाऊसफुल्ल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दोन जलाशयाची दारे उघडलीवर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नांद प्रकल्प, वडगाव प्रकल्प, उर्ध्ववर्धा प्रकल्प आणि बेंबळा प्रकल्पाचा वर्ध्यासह नागपूर, अमरावती, यवतमाळ याही जिल्ह्याला मोठा फायदा होतो. यापैकी नांद प्रकल्प वगळता इतर सर्वच जलाशयांची पातळी ६० टक्क्यापेक्षा अधिक असल्याने वडगाव प्रकल्पाचे तीन तर बेंबळा प्रकल्पाचे २ गेट गेट १० से.मी.ने उघडण्यात आले आहे. त्यामुळे लगतचे नदी, नालेही ओसंडून वाहत आहे.

टॅग्स :Waterपाणी