शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचा जिल्ह्यातील ७० गावांना तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 06:00 IST

डिसेंबर आणि जानेवारीत अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. यात खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले. रब्बी हंगामातील पिकांवर भिस्त असतानाच १० व ११ मार्च रोजी परत जिल्ह्याला वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने गार केले.

ठळक मुद्देप्रशासनाचा प्राथमिक अहवाल : १ हजार ७०८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात १० व ११ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसाने तब्बल ७० गावांना तडाखा दिला. यात १ हजार ७०८ हेक्टरवरील गहू, चणा, कापूस आदी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला.डिसेंबर आणि जानेवारीत अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. यात खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले. रब्बी हंगामातील पिकांवर भिस्त असतानाच १० व ११ मार्च रोजी परत जिल्ह्याला वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने गार केले.यात शेतातील काढणीला आलेले गहू आणि चण्याचे प्रचंड नुकसान झाले. गहू पीक भुईसपाट झाले. तर मजुरांअभावी शेतातच असलेला कापूसही खराब झाला. वादळीवारा आणि पावसामुळे ६१ गावांत अंशत: घरांची पडझड झाली. तर दोन ठिकाणी जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले.अवकाळी पावसामुळे वर्धा तालुक्यातील ३२ गावांत १ हजार ३२३ हेक्टर, सेलू तालुक्यातील एका गावात ६५ हेक्टर आर., देवळी तालुक्यातील २६ गावांत ८० हेक्टर आर., हिंगणघाट तालुक्यातील सात गावांत १४० हेक्टर आर. तर समुद्रपूर तालुक्यातील चार गावांत १०० हेक्टरवरील शेतपिकांची मोठी हानी झाली. वादळवाºयामुळे एक व्यक्ती जखमी झाली तर एका जनावराचा मृत्यू झाला.वर्धा, देवळी तालुक्यात सर्वाधिक नुकसानमंगळवारी आणि बुधवारी आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील वर्धा आणि देवळी तालुक्यातील अनुक्रमे ३२ आणि २६ गावांत शेतपिकांचे नुकसान झाले. प्राथमिक अहवालाच्या आधारे नुकसान झालेल्या शेतपिकांचे शासकीय यंत्रणेमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार असून शेतकऱ्यांना मदतीकरिता जिल्हा प्रशासनाला अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.गारपीट, वादळवाऱ्यामुळे पिकांचे नुकसानवर्धा : १० मार्चला सायंकाळी वादळवाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे तरोडा आणि तळेगाव जिल्हा परिषद सर्कलमधील गहू, चणा, कापूस, भाजीपाल्यासह फळपिकांचे मोठे नुकसान झाले. पिकांचे सर्वेक्षण करीत नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला देशमुख यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली. संबंधित गावात यावेळी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पांडुरंग देशमुख, पंचायत समिती सदस्य सुभाष चांभारे, संगीता मेहत्रे, तरोड्याच्या सरपंच शुभांगी चांभारे, मदनीचे सरपंच ललित कुरेकर, येसंबाचे सरपंच सत्यपाल भगत, गोजीच्या सरपंच शुभांगी गणोरे, सोनेगावचे सरपंच धनपाल भस्मे, भानखेड्याचे सरपंच विलास भालकर, धोत्र्याचे सरपंच उज्ज्वला गुरनुले, एकुर्लीच्या सरपंच लता हिंगे, नेरीचे सरपंच यशवंत गावंडे, भूगावच्या सरपंच दुर्गा थूल, श्रीकांत पाल, शोभा वानखेडे, सतीश धोटे, मनीषा मानकर, मनीषा वानखेडे महादेव धोपटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Rainपाऊस