शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

अवकाळीचा जिल्ह्यातील ७० गावांना तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 06:00 IST

डिसेंबर आणि जानेवारीत अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. यात खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले. रब्बी हंगामातील पिकांवर भिस्त असतानाच १० व ११ मार्च रोजी परत जिल्ह्याला वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने गार केले.

ठळक मुद्देप्रशासनाचा प्राथमिक अहवाल : १ हजार ७०८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात १० व ११ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसाने तब्बल ७० गावांना तडाखा दिला. यात १ हजार ७०८ हेक्टरवरील गहू, चणा, कापूस आदी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला.डिसेंबर आणि जानेवारीत अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. यात खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले. रब्बी हंगामातील पिकांवर भिस्त असतानाच १० व ११ मार्च रोजी परत जिल्ह्याला वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने गार केले.यात शेतातील काढणीला आलेले गहू आणि चण्याचे प्रचंड नुकसान झाले. गहू पीक भुईसपाट झाले. तर मजुरांअभावी शेतातच असलेला कापूसही खराब झाला. वादळीवारा आणि पावसामुळे ६१ गावांत अंशत: घरांची पडझड झाली. तर दोन ठिकाणी जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले.अवकाळी पावसामुळे वर्धा तालुक्यातील ३२ गावांत १ हजार ३२३ हेक्टर, सेलू तालुक्यातील एका गावात ६५ हेक्टर आर., देवळी तालुक्यातील २६ गावांत ८० हेक्टर आर., हिंगणघाट तालुक्यातील सात गावांत १४० हेक्टर आर. तर समुद्रपूर तालुक्यातील चार गावांत १०० हेक्टरवरील शेतपिकांची मोठी हानी झाली. वादळवाºयामुळे एक व्यक्ती जखमी झाली तर एका जनावराचा मृत्यू झाला.वर्धा, देवळी तालुक्यात सर्वाधिक नुकसानमंगळवारी आणि बुधवारी आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील वर्धा आणि देवळी तालुक्यातील अनुक्रमे ३२ आणि २६ गावांत शेतपिकांचे नुकसान झाले. प्राथमिक अहवालाच्या आधारे नुकसान झालेल्या शेतपिकांचे शासकीय यंत्रणेमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार असून शेतकऱ्यांना मदतीकरिता जिल्हा प्रशासनाला अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.गारपीट, वादळवाऱ्यामुळे पिकांचे नुकसानवर्धा : १० मार्चला सायंकाळी वादळवाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे तरोडा आणि तळेगाव जिल्हा परिषद सर्कलमधील गहू, चणा, कापूस, भाजीपाल्यासह फळपिकांचे मोठे नुकसान झाले. पिकांचे सर्वेक्षण करीत नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला देशमुख यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली. संबंधित गावात यावेळी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पांडुरंग देशमुख, पंचायत समिती सदस्य सुभाष चांभारे, संगीता मेहत्रे, तरोड्याच्या सरपंच शुभांगी चांभारे, मदनीचे सरपंच ललित कुरेकर, येसंबाचे सरपंच सत्यपाल भगत, गोजीच्या सरपंच शुभांगी गणोरे, सोनेगावचे सरपंच धनपाल भस्मे, भानखेड्याचे सरपंच विलास भालकर, धोत्र्याचे सरपंच उज्ज्वला गुरनुले, एकुर्लीच्या सरपंच लता हिंगे, नेरीचे सरपंच यशवंत गावंडे, भूगावच्या सरपंच दुर्गा थूल, श्रीकांत पाल, शोभा वानखेडे, सतीश धोटे, मनीषा मानकर, मनीषा वानखेडे महादेव धोपटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Rainपाऊस