शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

'पोषणआहाराच्या' खिचडीतून विद्यार्थ्यांना विषबाधा; ३७ विद्यार्थी, २ शिक्षक रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 17:11 IST

१८ जणांना सुटी: वाघोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहाराअंतर्गत देण्यात येणारी खिचडी खाल्ल्यामुळे ५७ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांना विषबाधा झाली. यापैकी ३७ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, ते सध्या डॉक्टरांच्या निगराणीत असून, १८ जणांना सुटी देण्यात आली. दाखल रुग्णांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेन पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या ८७ असून सोमवारी, दि. ८ रोजी शाळेत ८५ विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मोड आलेली मोट व खिचडी नेहमीप्रमाणे देण्यात आली. हीच खिचडी मुख्याध्यापक व शिक्षकांनी नियमानुसार प्रथम खाऊन तपासणी केल्यानंतरच विद्यार्थ्यांना खाण्यास दिली. मात्र, तेव्हापासूनच रात्रीला, तसेच मंगळवारी देखील सकाळच्या सुमारास काही विद्यार्थ्यांना ताप, थंडी आणि अस्वस्थ वाटत असल्याने विद्यार्थी शाळेत गेले नाहीत. मात्र, दुपारी शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांना उलट्या, ताप, पोटदुखी, डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्याने पालक कामावरून घरी पोहोचल्यावर धावपळ सुरू झाली. रात्री ८ वाजेपासून एकूण ५७ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी ३७ जणांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मुख्याध्यापक अरुण पोहणे व शिक्षिका त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून, काहींना डोकेदुखी व ताप असल्याने ते निगराणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई: रहमान विषबाधा प्रकरणात माध्यान्ह भोजनातून देत असलेले अन्न व पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यानंतर सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन रहमान यांनी दिली. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. नितू गावंडे आदींनी उपचार घेत असलेले विद्यार्थी, शिक्षकांची भेट घेत प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर त्यांनी शाळेलासुद्धा भेट दिली. रुग्णालयात दाखल असलेल्या विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या चांगली असून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतील असे जतिन रहमान यांनी सांगितले. तसेच यापुढे आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

आमदार समीर कुणावार यांच्याकडून कुटुंबीयांना धीर दुर्देवी घटनेची आमदार समीर कुणावार यांनी दखल घेत आरोग्य विभाग व शिक्षण विभागाला तातडीची मदत देऊन विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे निर्देश दिले. ११ रोजी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन उपचारार्थ दाखल विद्यार्थ्यांच्या समस्या जाणल्या. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन रहमान, डॉक्टर नाईक सर, हिंगणघाट पंचायत समिती विस्तार अधिकारी, हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयच्या अधीक्षक डॉ. मिसार, डॉ. राहुल भोयर, अपूर्व पीरके, डॉ. कांबळे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुजर उपस्थित होते.

"उपजिल्हा रुग्णालयात भरती ३७ रुग्णांची प्रकृती स्थिर असून, ते धोक्याबाहेर आहेत. मात्र, काहींना डोकेदुखी व ताप असल्याने निगराणीखाली ठेवले आहे. त्यांना २४ तासांनंतरच सुटी देण्यात येईल." - डॉ. समीर पाटील, बालरोगतज्ज्ञ, हिंगणघाट

"मोड आलेली मोट व खिचडी तयार करण्यात आल्यानंतर आम्ही तपासली व नंतर विद्यार्थ्यांना दिली. तेव्हापासून २४ तासांत विषबाधेचे कोणतेही लक्षण आढळले नाही. मंगळवारी दुपारी माझ्यासह विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला. विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात, तर हृदयविकाराचा रुग्ण असल्याने खासगीत तज्ज्ञ डॉक्टरांकडे उपचार घेत आहे." - अरुण पोहणे, मुख्याध्यापक, वाघोली.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाfood poisoningअन्नातून विषबाधाwardha-acवर्धा