शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी मोबाईलचा उपयोग ज्ञानार्जनासाठी करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 22:24 IST

सध्याच्या काळात मोबाईलचा अतिरेकी वापर वाढत आहे. मोबाईलशिवाय राहणे अनेकांना असह्य झाले झाले आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनावर फार मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम घडून येत आहेत.

ठळक मुद्देस्पर्धेतील सूर : यशवंत महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्याच्या काळात मोबाईलचा अतिरेकी वापर वाढत आहे. मोबाईलशिवाय राहणे अनेकांना असह्य झाले झाले आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनावर फार मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम घडून येत आहेत. मोबाईल ही वस्तू ज्ञान देणारी उत्तम वस्तू असली तरी त्याचा वापर विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळविण्यासाठीच करावा असा सूर वादविवाद स्पर्धेतून व्यक्त झाला.यशवंत महाविद्यालयात मोबाईलचा वापर विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी फायदेशीर आहे? या विषयावर वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. यात महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. उत्तम पारेकर तर प्रा. प्रमोद नारायणे, डॉ. रवींद्र बेले, प्रा. उमाकांत डुकरे, विद्यापीठ प्रतिनिधी अक्षय नवघरे मंचावर उपस्थित होते.या स्पर्धेत अक्षरा ठाकरे, अपेक्षा माथनकर, अंकित गिरी, भूषण साळवे, शितल कुडमथे, आचल मेघरे, कांचन बैनलवार या विद्यार्थ्यांनी विषयाच्या विरोधी बाजूने बोलताना मोबाईलचा वापर विद्यार्थ्यांनी करूच नये अशी भूमिका घेतली. त्यांनी दाखला देताना अनेक थोरपुरुषांचे उदाहरण दिले. त्याकाळात मोबाईल नसतानाही ते ज्ञानी झाले, मग आज ज्ञानार्जनासाठी मोबाईलची गरज काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.विषयाच्या बाजूने बोलताना निलोफर खान, शुभम घारपुरे, भोजराज आंबटकर, गौरव तामगाडगे, प्रकाश हुलके, वंदन बोरकर यांनी मोबाईल वापराचे समर्थन केले. तंत्रज्ञान युगात मोबाईलशिवाय राहणे शक्य नसून ते मोठे ज्ञानभांडार असल्याचे सांगितले. आपण आपल्या हातात ज्ञान घेऊन वावरत असतो. जगातले संपूर्ण ज्ञान केव्हाही कुठेही मिळवू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा योग्य वापर करावा असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रमोद नारायणे यांनी केले. वरिष्ठ विभागातून प्रथम व द्वितीय क्रमांक अनुक्रमे भुषण साळवे, अपेक्षा माथनकर यांना मिळविले. तृतीय क्रमांक आचल मेघरे व संघपाल मून यांना विभागून दिला. कनिष्ठ विभागातून प्रथम व द्वितीय क्रमांक अनुक्रमे अल्फिया शेख, अश्विनी कबाडे तर तृतीय क्रमांक खुशाल राठोड व संकेत भुजाडे यांनी मिळविला. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण प्रा. रूपसिंग चव्हाण, डॉ. संजय धोटे, प्रा. संदीप चव्हाण यांनी केले. संचालन निवेदिता फुसाटे यांनी केले तर आभार गौरव तामगाडगे यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. रविशंकर मोर, डॉ. विद्या शहाणे, प्रा. प्रणाली हिवरकर, रियाज शेख, भगवान गुजरकर इत्यादींनी सहकार्य केले.दृष्टिकोन महत्त्वाचाकोणत्याही गोष्टीकडे आपण कशाप्रकारे पाहतो यावर त्याचा सदुपयोग व दुरुपयोग अवलंबून असतो. प्रत्येक बाबीला दोन बाजू असतात. त्याचा योग्य वापर झाल्यास ती लाभदायक ठरते. मात्र अतिरेकी वापर हा त्रासदायक ठरतो. विद्यार्थ्यांनी मोबाईलकडे ज्ञानाचे एक साधन म्हणून पाहावे असा सल्ला डॉ. उत्तम पारेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.