शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

आहार, विहार, विचारांचे संतुलन हेच स्ट्रेस मॅनेजमेंट सूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:49 IST

एखाद्या प्रसंगी, घटनेत अथवा परिस्थितीत आपल्याजवळ संसाधन कमी असतात आणि पे्रशर जास्त येतात. त्यामुळे मानसिक ताण येतो, ताण येणं हे वाइृ नसतं, तो एक प्रोटेक्टीव्ह मेकॅनिझामचे काम करतो. स्ट्रेसमुळे आपण उत्कृष्ट कार्य करू शकतो.

ठळक मुद्देडॉ. सुरेखा ठक्कर : मानसिक ताणतणावावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एखाद्या प्रसंगी, घटनेत अथवा परिस्थितीत आपल्याजवळ संसाधन कमी असतात आणि पे्रशर जास्त येतात. त्यामुळे मानसिक ताण येतो, ताण येणं हे वाइृ नसतं, तो एक प्रोटेक्टीव्ह मेकॅनिझामचे काम करतो. स्ट्रेसमुळे आपण उत्कृष्ट कार्य करू शकतो. ज्याप्रमाणे पतंगीला तिचा दोरा आणि वारा पंच उडण्यास मदत करते तसेच स्ट्रेस देखील आपल्याला मदत करीत असतो. फक्त त्याचे योग्य ते व्यवस्थापन करता यायला हवे. त्याकरिता स्ट्रेस हा नकारात्मक न घेता सकारात्मक दृष्टीकोन, पिरॅडिक रिलॅक्ससेशन आवश्यक असून तणावा विषयीची जागरूकता गरजेची आहे असे प्रतिपादन एडमास विद्यापीठ कोलकत्ता आणि सी.व्ही. रमण विद्यापीठ रायपूरच्या माजी कुलगुरू तथा जनमाध्यम विशेषज्ञ डॉ. सुरेखा ठक्कर यांनी केले.इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन (ईप्टा) आणि यशवंत दाते स्मृती संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच स्थानिक यशवंत दाते स्मृती संस्थेच्या सभागृहात डॉ. सुरेखा ठक्कर यांचे ‘स्टे्स मॅनेजमेंट’ ताण तणाव व्यवस्थापन या विषयावरील व्याख्यान पार पडले. यावेळी हिंदी विश्वविद्यालयाच्या परफार्मींग आर्ट विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सतीश पावडे , यशवंतराव दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. ठक्कर म्हणाल्या की, स्ट्रेस एज लाईक अ फायर असला तरी आगपेटीच्या काडी सारखे जळून न जाता आत्मपे्ररणा प्रकाशित करायची. ज्या प्रमाणे निखाऱ्यावर राख धरते पण आत आग धगधगत असते. त्याप्रमाणे ताणाने आत्मप्रेरणा, स्वऊर्जा प्रज्वलीत करायची असते आणि त्यासाठीच आहार, विहार आणि विचारांचे उत्तम संतुलन साधून तणावाचे व्यवस्थान करावे लागते. किंबहुना आहार, विहार आणि विचारांचे सुयासेग्य संतुलन हेच स्ट्रेस मॅनेजमेंटचे मुलभूत सुत्र आहे आणि याकरिता शारीरिक कसरत मेडीटेशन महत्वाचे ठरते. तेव्हा दिवसातून किमान दहा मिनीट तरी प्रत्येकाने हे केल्यास आपण योग्यरित्या ताणतणावाचे व्यवस्थापन करू शकतो असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. सतीश पावडे यांनी जागतिकीकरणाच्या या जीवघेण्यास स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्ती हा ताणतणावाच्या जाळ्यात अडकून पडला आहे. त्याचा परिणाम त्या कार्यशक्तीवर ही झाला आहे. त्यामुळे उत्तम निरोगी सकारात्मक समाज निर्मिती करीता तसेच सकारात्मक त्या व्यक्तीमत्वाच्या निर्मितीसाठी स्ट्रेस मॅनेजमेंटची गरज असून सर्वानीच ताणतणावाचे उत्तम व्यवस्थापन साधण्याची कला आत्मसात केली पाहिजे. त्याकरिता वेळोवेळी अशी मार्गदर्शनात्मक कार्यक्रम आयोजित केले जावे, असेही त्यांनी प्रामुख्याने मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनीही या विषयाची महती विशद केली. प्रास्ताविक प्रा. शेख हाशम यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ. राजेंद्र मुंडे यांनी दिला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. स्मिता वानखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू बावणे यांनी केले. याप्रसंगी गुणवंत डकरे, डॉ. सिद्धार्थ बुटले आदी उपस्थित होते.