शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आहार, विहार, विचारांचे संतुलन हेच स्ट्रेस मॅनेजमेंट सूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:49 IST

एखाद्या प्रसंगी, घटनेत अथवा परिस्थितीत आपल्याजवळ संसाधन कमी असतात आणि पे्रशर जास्त येतात. त्यामुळे मानसिक ताण येतो, ताण येणं हे वाइृ नसतं, तो एक प्रोटेक्टीव्ह मेकॅनिझामचे काम करतो. स्ट्रेसमुळे आपण उत्कृष्ट कार्य करू शकतो.

ठळक मुद्देडॉ. सुरेखा ठक्कर : मानसिक ताणतणावावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एखाद्या प्रसंगी, घटनेत अथवा परिस्थितीत आपल्याजवळ संसाधन कमी असतात आणि पे्रशर जास्त येतात. त्यामुळे मानसिक ताण येतो, ताण येणं हे वाइृ नसतं, तो एक प्रोटेक्टीव्ह मेकॅनिझामचे काम करतो. स्ट्रेसमुळे आपण उत्कृष्ट कार्य करू शकतो. ज्याप्रमाणे पतंगीला तिचा दोरा आणि वारा पंच उडण्यास मदत करते तसेच स्ट्रेस देखील आपल्याला मदत करीत असतो. फक्त त्याचे योग्य ते व्यवस्थापन करता यायला हवे. त्याकरिता स्ट्रेस हा नकारात्मक न घेता सकारात्मक दृष्टीकोन, पिरॅडिक रिलॅक्ससेशन आवश्यक असून तणावा विषयीची जागरूकता गरजेची आहे असे प्रतिपादन एडमास विद्यापीठ कोलकत्ता आणि सी.व्ही. रमण विद्यापीठ रायपूरच्या माजी कुलगुरू तथा जनमाध्यम विशेषज्ञ डॉ. सुरेखा ठक्कर यांनी केले.इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन (ईप्टा) आणि यशवंत दाते स्मृती संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच स्थानिक यशवंत दाते स्मृती संस्थेच्या सभागृहात डॉ. सुरेखा ठक्कर यांचे ‘स्टे्स मॅनेजमेंट’ ताण तणाव व्यवस्थापन या विषयावरील व्याख्यान पार पडले. यावेळी हिंदी विश्वविद्यालयाच्या परफार्मींग आर्ट विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सतीश पावडे , यशवंतराव दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. ठक्कर म्हणाल्या की, स्ट्रेस एज लाईक अ फायर असला तरी आगपेटीच्या काडी सारखे जळून न जाता आत्मपे्ररणा प्रकाशित करायची. ज्या प्रमाणे निखाऱ्यावर राख धरते पण आत आग धगधगत असते. त्याप्रमाणे ताणाने आत्मप्रेरणा, स्वऊर्जा प्रज्वलीत करायची असते आणि त्यासाठीच आहार, विहार आणि विचारांचे उत्तम संतुलन साधून तणावाचे व्यवस्थान करावे लागते. किंबहुना आहार, विहार आणि विचारांचे सुयासेग्य संतुलन हेच स्ट्रेस मॅनेजमेंटचे मुलभूत सुत्र आहे आणि याकरिता शारीरिक कसरत मेडीटेशन महत्वाचे ठरते. तेव्हा दिवसातून किमान दहा मिनीट तरी प्रत्येकाने हे केल्यास आपण योग्यरित्या ताणतणावाचे व्यवस्थापन करू शकतो असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. सतीश पावडे यांनी जागतिकीकरणाच्या या जीवघेण्यास स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्ती हा ताणतणावाच्या जाळ्यात अडकून पडला आहे. त्याचा परिणाम त्या कार्यशक्तीवर ही झाला आहे. त्यामुळे उत्तम निरोगी सकारात्मक समाज निर्मिती करीता तसेच सकारात्मक त्या व्यक्तीमत्वाच्या निर्मितीसाठी स्ट्रेस मॅनेजमेंटची गरज असून सर्वानीच ताणतणावाचे उत्तम व्यवस्थापन साधण्याची कला आत्मसात केली पाहिजे. त्याकरिता वेळोवेळी अशी मार्गदर्शनात्मक कार्यक्रम आयोजित केले जावे, असेही त्यांनी प्रामुख्याने मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनीही या विषयाची महती विशद केली. प्रास्ताविक प्रा. शेख हाशम यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ. राजेंद्र मुंडे यांनी दिला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. स्मिता वानखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू बावणे यांनी केले. याप्रसंगी गुणवंत डकरे, डॉ. सिद्धार्थ बुटले आदी उपस्थित होते.