शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
2
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
3
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
4
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
5
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
6
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
7
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
8
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
9
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
10
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
11
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
12
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
13
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
14
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
15
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
16
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
17
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
18
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
19
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
20
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाचा पिकांना तडाखा

By admin | Updated: February 12, 2015 01:30 IST

गत दोन वर्षापासून रबी पिके ऐन बहरावर आली असताना निसर्गाचा कहर व त्यामुळे प्रचंड नुकसान हे समीकरणच जिल्ह्यात रूढ झाले आहे. गत वर्षी गव्हाची वाट लागली.

वर्धा : गत दोन वर्षापासून रबी पिके ऐन बहरावर आली असताना निसर्गाचा कहर व त्यामुळे प्रचंड नुकसान हे समीकरणच जिल्ह्यात रूढ झाले आहे. गत वर्षी गव्हाची वाट लागली. यंदा असे होणार नाही अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु जिल्ह्याला मंगळवारी मध्यरात्री वादळ वाऱ्यासह पावसाने पुरते झोडपून काढले. यात आठही तालुक्यातील गहू, चणा, तूर या उत्पादनावर आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. यात समुद्रपूर तालुक्यात एक बैल मरण पावला.याव्यतिरिक्त कुठलीही जीवितहानी झाल्याची नोंद नसली तरी पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. ओंब्यावर आलेला गहू पुरता खाली झोपला. हरभरा पिकाचा फुलोरा गळाला. उरलासुरला कापूसही जमीनदोस्त झाला. यंदा आंब्याला चांगला बहर आला आहे. पण रात्रीच्या पावसाने हा बार रातोरात गळाला. तसेच फळावर आलेला संत्राही गळाला. इतर लिंबूवर्गीय पिकांचेही बरेच नुकसान झाले. कारंजा तालुक्यात काही ठिकाणी गारा पडल्याची माहिती आहे. वर्धा तालुक्यात वायगाव(नि.), तळेगाव(टा.), शिरसगाव, गोजी, यासह पवनार, सेवाग्राम आदी शिवारातील पिकांचे मोठे नुकसान झाले. वायगाव(नि) शिवारातील आशिष जिंदे, अशोक देशमुख, प्रशांत वाटगुळे, राजू भोमले, सतीश गोल्हर, पुंडलिक चावरे, पुरूषोत्तम वेले, प्रशांत आदींचे नुकसान झाले. आधीच सोयाबीन व कापसाला अत्यल्प भाव देऊन शेतकरी वर्गाची पिळवणूक केली जात आहे. त्यातच रबी पिकांचे नुकसान झाल्याने आता कोणते पीक घ्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शासनाने नुकसानीचा सर्व्हे करून मदत द्यावी अशी मागणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क) कारंजात गारपिटीचा कहरकारंजा(घा.) - मध्यरात्रीच्या सुमारास विजेचा कडकडाट, वादळी वारा व पावसासह काही ठिकाणी गारपिटीने कहर केला. तालुक्यातील हेटीकुंडी, मोर्शी, खरसरवाडा, ठाणेगाव, जामनी आदी गावातील गहू, हरभरा, तूर आदी पिके ऐन कापणीवर असताना मातीमोल झाली. भाजीपाला पिकांसह संत्रा, लिंबु फळपिकालाही याचा फटका बसला आहे. काल दिवसभर आकाश निरभ्र होते. परंतु मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस आणि गारांचा वर्षाव झाल्याने पिके जमीनदोस्त झाली. गव्हाची पत जाण्याचाही धोका निर्माण आहे. वादळी पावसामुळे गहू लोटलाहिंगणघाट- तालुक्यात पहाटे विजेच्या गडगडाटासह वादळी पावसामुळे जवळपास ३० ते ४० टक्के गहु लोटला. जनावरांच्या चाऱ्यासाठी म्हणून लावलेल्या ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बुधवारी सकाळी १०.२ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. तालुक्यात गव्हाचा २ हजार हेक्टरचा पेरा असून यापैकी ओंबीवर आलेला ३० ते ४० टक्के गहू जमिनीवर लोटला. त्यामुळे. त्यामुळे नुकसान होणार होणार असल्याची माहिती आहे. कोरडवाहू चण्याचेही नुकसानसिंचनाची सोय नसलेले अनेक शेतकरी लवकर हरभरा पेरत असतात याला कोरडवाहू हरभरा म्हटले जाते. हा चना कापणीवर आला आहे. सेलू परिसरात अनेक शेतात या चन्याची कापणी करून त्याचे गठ्ठे जमा करून ठेवले होते. परंतु हा चणाही ओला झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सेलू परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहे.आंब्याचा बहर गळालायंदा आंब्याला भरपूर प्रमाणात बहर आला आहे. परंतु रात्री अवकाळी झालेल्या पावसाने आंब्याचा बहर मोठ्या प्रमाणात गळाला. त्यामुळे गावरानी आंब्याचा स्वाद चाखायला मिळेल का असा प्रश्न उपस्थित हित आहे. त्याच प्रकारे कारंजा(घा.) तालुक्यात गारांमुळे व जोरदार पावसाने संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले. आर्वीत गहू, हरभरा पिकांचे नुकसानआर्वी- मंगळवारी मध्यरात्री झालेल्या पावसाचा आर्वीसह तालुक्यातील वाढोना, वागदा, नांदपूर, अहिरवाडा, सर्कसपूर, नेरी, खुबगाव, दहेगाव(मु.), निंबोली(शेंडे), वर्धमनेरी, जळगाव, टाकरखेडा, वाढोणा, पिंपळखुटा, गुमगाव, राजापूर, वाढोडा(पुनर्वसन), सावळापूर, वडगाव, रोहणा, साळधारा, चिंचोली(डांगे), पाचोड, हऱ्हाशी, एकलारा, धनोडी, बाजरवाडा, हरदोळी, पानवाडी आदी गावांना तडाखा बसला.गहू चना पिकांचे नुकसान झाले. आर्वीतील जिनिंग-प्रेसिंगमध्ये असलेल्या कापसाची गंज्या या अवकाळी पावसाने ओल्या झाल्या.