शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘धाम’ची साठवण क्षमता ३.०२५ दलघमीने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

१९८६ मध्ये काम पूर्ण झालेला धाम जलाशय हा मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे बांधकाम होऊन जवळपास ३८ वर्षांचा कालावधी लोटला आहे. तेव्हापासून या प्रकल्पातून एक वेळाही गाळ काढण्यात आला नाही. शिवाय २०१४-१५ मध्ये गाळ सर्वेक्षण दरम्यान धाम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ३.०२५ दलघमीने कमी झाल्याचा अभिप्राय नोंदविण्यात आला.

ठळक मुद्देगाळाचा फटका : तीनपैकी एकाच ठिकाणाहून काढला गाळ

महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाकाळी येथील धाम प्रकल्प पूर्ण झाल्यापासून या जलाशयातून गाळ काढण्यात आला नाही. परिणामी या जलाशयाची पाणी साठवण क्षमता तब्बल ३.०२५ दलघमीने कमी झाल्याचे २०१४-१५ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात पुढे आले. ‘गाळमुक्त धाम करेल पाणी समस्येवर मात’ या आशयाचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच झोपेचे सोंग घेणारा पाटबंधारे विभाग सर्वेक्षणानंतर चार वर्षांनी खडबडून जागा झाला. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर गाळ काढण्याच्या कामाला लागला. परंतु, या विभागाने धामचे बुडीत क्षेत्र असलेल्या तीन पैकी केवळ एकाच ठिकाणावरून नाममात्र गाळ काढण्यात आल्याचे वास्तव असून धाम प्रकल्प अद्यापही पुर्णपणे गाळमुक्त झालेला नाही.प्राप्त माहितीनुसार, १९८६ मध्ये काम पूर्ण झालेला धाम जलाशय हा मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे बांधकाम होऊन जवळपास ३८ वर्षांचा कालावधी लोटला आहे. तेव्हापासून या प्रकल्पातून एक वेळाही गाळ काढण्यात आला नाही. शिवाय २०१४-१५ मध्ये गाळ सर्वेक्षण दरम्यान धाम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ३.०२५ दलघमीने कमी झाल्याचा अभिप्राय नोंदविण्यात आला. त्यामुळे या धरणाची साठवण क्षमता पुनर्जीवित करण्यासाठी २०१५ किंवा २०१६ मध्ये विशेष काम होणे गरजेचे होते. परंतु, तसे झाले नाही. वर्धा शहर व शहराशेजारील सुमारे १५ गावांतील नागरिकांना धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल करून वर्धा नगर पालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करते. परंतु, गाळयुक्त असलेल्या धाम प्रकल्प व धाम प्रकल्पात असलेल्या कमी जलसाठ्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात वर्धा शहरासह शहराशेजारील सुमारे १४ गावांना जलसंकटाला सामोरे जावे लागले. भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी धाम पूर्णपणे गाळमुक्त होणे गरजेचे असल्याचे लोकमतने वृत्त प्रकाशित करून जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यावर धाम प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र असलेल्या खैरवाडा, मासोद व ब्राह्मणवाडा येथून गाळ काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून निश्चित करण्यात आले. त्या अनुषंगाने वर्धा पाटबंधारे विभागाने सुरूवातीला खैरवाडा (२४ लाख ५५ हजार ६०० रुपये), मासोद (२४ लाख ५५ हजार ६०० रुपये) व ब्राह्मणवाडा (२४ लाख ५५ हजार ६०० रुपये) निधीचे प्राकलन तयार केले. परंतु, हा विषय अधिक खर्ची ठरू पाहत असल्याने व त्यासाठी निधी वेळीच उपलब्ध होणे थोडे अवघड असल्याचे लक्षात येताच धाम गाळमुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले. त्याला एका कंत्राटदाराने प्रतिसाद देत जेसीबी व ट्रॅक्टर नि:शुल्क उपलब्ध करून दिले. तेव्हा मासोद परिसरातून नाममात्र गाळ काढला; पण उर्वरित दोन ठिकाणाहून गाळ काढला नाही. गाळमुक्त धाम हा विषय सध्यातरी अर्धवटच आहे.धाम १०० टक्के भरलामहाकाळी येथील धाम प्रकल्प उन्हाळ्याच्या अखेरीस मृत जलसाठ्यावर आला होता. त्यानंतर पावसाने आपला जोर कायम न ठेवल्याने यंदा हा जलाशय पूर्ण भरणार नाही, असा अंदाज वर्तविल्या जात होता. परंतु, बाप्पाच्या आगमनापूर्वी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान धाम प्रकल्प १०० टक्के भरला असून सध्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे.मासोद परिसरातून काढला ४४,२६४ घ.मी. गाळयंदाच्या उन्हाळ्यात जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या सूचनेनंतर वर्धा पाटबंधारे विभागाने पुढाकार घेत धाम प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र असलेल्या मासोद परिसरातून गाळ काढला. दमदार पावसाला सुरूवात होण्यापूर्वीपर्यंत या परिसरातून केवळ ४४ हजार २६४ घ.मी. गाळ काढण्यात आला आहे. या प्रकल्पात असलेल्या गाळाच्या तूलनेत काढण्यात आलेला गाळ नाममात्र असून थोड्या प्रमाणातच या प्रकल्पाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ झाल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :Damधरण