शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

‘धाम’ची साठवण क्षमता ३.०२५ दलघमीने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

१९८६ मध्ये काम पूर्ण झालेला धाम जलाशय हा मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे बांधकाम होऊन जवळपास ३८ वर्षांचा कालावधी लोटला आहे. तेव्हापासून या प्रकल्पातून एक वेळाही गाळ काढण्यात आला नाही. शिवाय २०१४-१५ मध्ये गाळ सर्वेक्षण दरम्यान धाम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ३.०२५ दलघमीने कमी झाल्याचा अभिप्राय नोंदविण्यात आला.

ठळक मुद्देगाळाचा फटका : तीनपैकी एकाच ठिकाणाहून काढला गाळ

महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाकाळी येथील धाम प्रकल्प पूर्ण झाल्यापासून या जलाशयातून गाळ काढण्यात आला नाही. परिणामी या जलाशयाची पाणी साठवण क्षमता तब्बल ३.०२५ दलघमीने कमी झाल्याचे २०१४-१५ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात पुढे आले. ‘गाळमुक्त धाम करेल पाणी समस्येवर मात’ या आशयाचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच झोपेचे सोंग घेणारा पाटबंधारे विभाग सर्वेक्षणानंतर चार वर्षांनी खडबडून जागा झाला. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर गाळ काढण्याच्या कामाला लागला. परंतु, या विभागाने धामचे बुडीत क्षेत्र असलेल्या तीन पैकी केवळ एकाच ठिकाणावरून नाममात्र गाळ काढण्यात आल्याचे वास्तव असून धाम प्रकल्प अद्यापही पुर्णपणे गाळमुक्त झालेला नाही.प्राप्त माहितीनुसार, १९८६ मध्ये काम पूर्ण झालेला धाम जलाशय हा मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे बांधकाम होऊन जवळपास ३८ वर्षांचा कालावधी लोटला आहे. तेव्हापासून या प्रकल्पातून एक वेळाही गाळ काढण्यात आला नाही. शिवाय २०१४-१५ मध्ये गाळ सर्वेक्षण दरम्यान धाम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ३.०२५ दलघमीने कमी झाल्याचा अभिप्राय नोंदविण्यात आला. त्यामुळे या धरणाची साठवण क्षमता पुनर्जीवित करण्यासाठी २०१५ किंवा २०१६ मध्ये विशेष काम होणे गरजेचे होते. परंतु, तसे झाले नाही. वर्धा शहर व शहराशेजारील सुमारे १५ गावांतील नागरिकांना धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल करून वर्धा नगर पालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करते. परंतु, गाळयुक्त असलेल्या धाम प्रकल्प व धाम प्रकल्पात असलेल्या कमी जलसाठ्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात वर्धा शहरासह शहराशेजारील सुमारे १४ गावांना जलसंकटाला सामोरे जावे लागले. भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी धाम पूर्णपणे गाळमुक्त होणे गरजेचे असल्याचे लोकमतने वृत्त प्रकाशित करून जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यावर धाम प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र असलेल्या खैरवाडा, मासोद व ब्राह्मणवाडा येथून गाळ काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून निश्चित करण्यात आले. त्या अनुषंगाने वर्धा पाटबंधारे विभागाने सुरूवातीला खैरवाडा (२४ लाख ५५ हजार ६०० रुपये), मासोद (२४ लाख ५५ हजार ६०० रुपये) व ब्राह्मणवाडा (२४ लाख ५५ हजार ६०० रुपये) निधीचे प्राकलन तयार केले. परंतु, हा विषय अधिक खर्ची ठरू पाहत असल्याने व त्यासाठी निधी वेळीच उपलब्ध होणे थोडे अवघड असल्याचे लक्षात येताच धाम गाळमुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले. त्याला एका कंत्राटदाराने प्रतिसाद देत जेसीबी व ट्रॅक्टर नि:शुल्क उपलब्ध करून दिले. तेव्हा मासोद परिसरातून नाममात्र गाळ काढला; पण उर्वरित दोन ठिकाणाहून गाळ काढला नाही. गाळमुक्त धाम हा विषय सध्यातरी अर्धवटच आहे.धाम १०० टक्के भरलामहाकाळी येथील धाम प्रकल्प उन्हाळ्याच्या अखेरीस मृत जलसाठ्यावर आला होता. त्यानंतर पावसाने आपला जोर कायम न ठेवल्याने यंदा हा जलाशय पूर्ण भरणार नाही, असा अंदाज वर्तविल्या जात होता. परंतु, बाप्पाच्या आगमनापूर्वी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान धाम प्रकल्प १०० टक्के भरला असून सध्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे.मासोद परिसरातून काढला ४४,२६४ घ.मी. गाळयंदाच्या उन्हाळ्यात जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या सूचनेनंतर वर्धा पाटबंधारे विभागाने पुढाकार घेत धाम प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र असलेल्या मासोद परिसरातून गाळ काढला. दमदार पावसाला सुरूवात होण्यापूर्वीपर्यंत या परिसरातून केवळ ४४ हजार २६४ घ.मी. गाळ काढण्यात आला आहे. या प्रकल्पात असलेल्या गाळाच्या तूलनेत काढण्यात आलेला गाळ नाममात्र असून थोड्या प्रमाणातच या प्रकल्पाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ झाल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :Damधरण