शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
4
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
5
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
6
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
7
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
8
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
10
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
11
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
12
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
13
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
14
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
15
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
16
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
17
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
18
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
20
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला

प्रकल्पग्रस्तांची फरफट थांबेना

By admin | Updated: April 29, 2016 02:03 IST

निम्न वर्धा प्रकल्पासाठी जिल्ह्यातील २३ गावांच्या जमिनी घेण्यात आल्या. यामुळे त्या गावांचे पुनर्वसन करण्यात आले; ...

पुनर्वसनाचे भिजत घोंगडे : नागरी सुविधांपासूनही नागरिक वंचितआर्वी : निम्न वर्धा प्रकल्पासाठी जिल्ह्यातील २३ गावांच्या जमिनी घेण्यात आल्या. यामुळे त्या गावांचे पुनर्वसन करण्यात आले; पण सदर ग्रामस्थांना मुलभूत सुविधाच पुरविण्यात आल्या नाहीत. यामुळे पुनर्वसनाचे भिजत घोंगडे कायम आहे. सर्कसपूरसह तालुक्यात अनेक प्रकल्पबाधित गावे आहेत. प्रकल्पग्रस्त नागरिकांनी सुविधांसाठी अनेकदा आंदोलने केली; पण उपयोग झाला नाही. शासन, प्रशासनाने याकडे लक्ष देत प्रकल्पग्रस्तांची फरफट थांबविणे गरजेचे झाले आहे.तालुक्यातील सर्कसपूर या गावात नागरी सुविधा पुरवाव्या, गावातील अन्य सुविधा त्वरित द्याव्या या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपोषण केले होते. संबंधित विभागाने माजी आमदार दादाराव केचे यांच्या मध्यस्थीनंतर सात दिवसांच्या आत समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देत आंदोलन थांबविले होते; पण अद्यापही गावात नागरी सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. गावातील समस्या सोडवाव्या, नागरी सुविधा पुरवाव्या, रस्ते, वीज, नाल्या, पाणी या मुलभूत सुविधांची पुर्तता करावी या मागण्यांसाठी अनेकदा निवेदने दिली; पण संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता; पण युवकांचे वय निघून जात असताना त्यांना नोकऱ्या देण्यात आल्या नाही. प्रकल्पग्रस्तांच्या वयोमर्यादेचा शासन निर्णय फेब्रुवारी २००७ मध्ये काढला. अद्याप त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही. सर्कसपूर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. सर्कसपूर पुनर्वसन गावात प्लॉट व शासकीय जागेत घाणीचे साम्राज्य आहे. स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी पोचरस्ता नाही. शेडची अत्यंत दुरवस्था झाली आहे. शाळा, समाज मंदिर परिसराची डागडुजी करण्यात आलेली नाही. प्रवासी निवारा दुरवस्थेत असून ग्रामपंचायतची कामेही खोळंबलेली आहेत. गावात बाजार भरत नसल्याने मार्केट ओटे रद्द करून त्या निधीचा वापर ग्रामस्थांसाठी करणे गरजेचे होते; पण त्याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचेच दिसून येत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याकरिता व्यवस्था नाही. उदरनिर्वाह भत्ताही देण्यात आलेला नाही. न्यायालयातील प्रकरणे व्हीआयडीने मागे घ्यावी, ही मागणीही धूळखात आहे. सर्कसपूर व अहिरवाडा येथील घर बांधकामासाठी वर्धा व बाकळी नदीतून रेती काढण्याची मुभा देण्यात यावी व अन्य मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. या समस्या त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी सर्कसपूर येथील प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात येत आहे. पुनर्वसन ठिकाणी अकरा नागरी सुविधा त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित विभागाने दिले होते; पण त्या समस्या अद्याप सुटलेल्या नाही. यासाठी फेबु्रवारी महिन्यात टाकीवर चढून आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला होता. यानंतर तरी कार्यवाही होईल, अशी अपेक्षा होती; पण प्रशासनाने हालचालच न केल्याने प्रकल्पग्रस्तांची फरफट कायम आहे.(तालुका प्रतिनिधी)उदरनिर्वाह भत्ता बंद; ग्रामस्थ अडचणीतप्रकल्पग्रस्त नागरिकांना सर्व मुलभूत सुविधा पुरविणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे पुनर्वसित गावांचे भिजत घोंगडे आजही कायम आहे. सर्कसपूर येथील ग्रामस्थांना नागरी सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. प्रकल्पग्रस्त युवकांना नोकऱ्याही देण्यात आलेल्या नाही. शिवाय उदरनिर्वाह करताना अडचणी जाऊ नये म्हणून शासनाकडून मिळणारा उदरनिर्वाह भत्ताही गत काही महिन्यांपासून बंद आहे. या प्रकारामुळे प्रकल्पग्रस्त नागरिक त्रस्त झाले आहेत. सर्कसपूर येथील ग्रामस्थांनी पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उपसले; पण उपयोग झाला नाही. यासारखी अनेक गावे तालुक्यात असून प्रकल्पग्रस्तांना न्याय देणे गरजेचे झाले आहे.