शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंपांचा विद्युतपुरवठा खंडित करणे थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2022 05:00 IST

महावितरणच्या धडक विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेमुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. कृषी पंपांचा विद्युतपुरवठा खंडित झाल्यावर विहिरीत पाणी असतानाही सिंंचनाअभावी उत्पादनावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच महावितरणने ही मोहीम तातडीने थांबवावी आणि शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना २४ तास विद्युतपुरवठा द्यावा, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : महावितरणकडून थकबाकीचे कारण पुढे करून कृषी पंपांचा वारंवार विद्युत पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. महावितरणे ही कार्यवाही थांबवित शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना २४ तास विद्युतपुरवठा द्यावा, या मुख्य मागणीसाठी शुक्रवारी संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत नागपूर-अमरावती महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व संदीप भिसे यांनी केले.महावितरणच्या धडक विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेमुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. कृषी पंपांचा विद्युतपुरवठा खंडित झाल्यावर विहिरीत पाणी असतानाही सिंंचनाअभावी उत्पादनावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच महावितरणने ही मोहीम तातडीने थांबवावी आणि शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना २४ तास विद्युतपुरवठा द्यावा, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली. नारा टी-पॉईंवर करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे नागपूर-अमरावती मार्गावरील वाहतूक काही काळाकरिता खोळंबली होती. आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक योगेंद्र यादव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आंदोलन स्थळ गाठून महावितरणचे अधिकारी राजूरकर यांच्याशी चर्चा घडवून दिली.  महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून दिलेल्या ठोस आश्वासनाअंती आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

 

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप