शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

जनतेच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 23:06 IST

मागील सहा दिवसांपासून १४ गावांचा पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. इतकेच नव्हे तर नळाला येणारे पाणी दुषीत राहत असून त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमनसेची मागणी : जीवन प्राधिकरणला निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील सहा दिवसांपासून १४ गावांचा पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. इतकेच नव्हे तर नळाला येणारे पाणी दुषीत राहत असून त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी मनसेच्यावतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.सिंदी (मेघे)सह परिसरातील नागरिकांना सध्या दुषीत पाण्याचा पुरवठा होत आहे. ही बाब नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने गंभीर आहे. परंतु, त्याकडे संबंधित अधिकाऱ्यांसह ग्रा.पं. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सदर प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त होताच त्याची दखल घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य कार्यवाहीसाठी निवेदन देण्यात आले आहे.येत्या काही दिवसात नागरिकांची सदर समस्या निकाली न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना नितीन अमृतकर, कन्हैया यादव, आशीष धोबे, रजनीकांत ठाणेकार, अनिल देवतारे, नरेश राऊत, रैसुद्दीन शेख, शंकर पापल, राजु पोकळे, योगेश राखुंडे, पंकज वासेकर, प्रणय लोहवे, आकाश नारे, संदीप नागोसे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सिंदी (मेघे) येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :MNSमनसे