शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जनतेच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 23:06 IST

मागील सहा दिवसांपासून १४ गावांचा पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. इतकेच नव्हे तर नळाला येणारे पाणी दुषीत राहत असून त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमनसेची मागणी : जीवन प्राधिकरणला निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील सहा दिवसांपासून १४ गावांचा पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. इतकेच नव्हे तर नळाला येणारे पाणी दुषीत राहत असून त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी मनसेच्यावतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.सिंदी (मेघे)सह परिसरातील नागरिकांना सध्या दुषीत पाण्याचा पुरवठा होत आहे. ही बाब नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने गंभीर आहे. परंतु, त्याकडे संबंधित अधिकाऱ्यांसह ग्रा.पं. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सदर प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त होताच त्याची दखल घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य कार्यवाहीसाठी निवेदन देण्यात आले आहे.येत्या काही दिवसात नागरिकांची सदर समस्या निकाली न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना नितीन अमृतकर, कन्हैया यादव, आशीष धोबे, रजनीकांत ठाणेकार, अनिल देवतारे, नरेश राऊत, रैसुद्दीन शेख, शंकर पापल, राजु पोकळे, योगेश राखुंडे, पंकज वासेकर, प्रणय लोहवे, आकाश नारे, संदीप नागोसे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सिंदी (मेघे) येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :MNSमनसे