शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:09 IST

अनेक होतकरू तरुणांसह कामगारांनी कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी मिळेल तेथून कर्ज घेवून शहरातील मुख्य मार्गावर विविध खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने थाटली आहेत.

ठळक मुद्देआंबेडकरवादी एकता मंच व प्रहार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : अनेक होतकरू तरुणांसह कामगारांनी कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी मिळेल तेथून कर्ज घेवून शहरातील मुख्य मार्गावर विविध खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने थाटली आहेत. ही दुकाने अतिक्रमण करून लावण्यात आली असली तरी ती अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान उचलल्या गेल्यावर कसाबसा रोजगार मिळालेले तरुण व कामगार पुन्हा बेरोजगार होतील. परिणामी, मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्यात यावी, अशी मागणी आंबेडकरवादी एकता मंच व प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन ठाणेदारांच्या मार्फत जिल्हाधिकाºयांना पाठविण्यात आले.अनेकांनी कर्ज घेवून मुख्य मार्गावर व इतर ठिकाणी छोटे-मोठे व्यवसाय थाटले आहेत. पान टपरी, चहा टपरी, भाजी विक्री आदी व्यवसायातून हे तरुण व कामगार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत; पण २३ जूनला पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा गजराज अनेकांचा रोजगारच हिरावून घेणार आहे. यामुळे सदर होतकरू तरुणांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बेरोजगारांची व होतकरू तरुणांची समस्या लक्षात घेता राबविण्यात येणारी अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्यात यावी. सर्वप्रथम या छोट्या व्यावसायिकांना स्थानिक नगर परिषदेच्या माध्यमातून व्यवसायासाठी जागा निश्चित करून देण्यात यावी, त्यानंतरच अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन नगरसेवक तथा आंबेडकरवादी एकता मंचचे संयोजक कुंदन जांभुळकर यांच्या नेतृत्त्वात पुलगाव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे यांना देण्यात आले. शिवाय निवेदनाची प्रत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अभय शिंगाडे यांनाही सादर करीत त्यांच्या मार्फत सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. सदर मागणीवर वेळीच विचार करण्यात यावा, अन्यथा बळाचा वापर करून पूर्वी सारखा अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा आम्ही विरोध करू तसेच तीव्र आंदोलन करू, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना नगरसेवक कुंदर जांभुळकर यांच्यासह प्रकाश टेभुर्णे, करूणा टेभुर्णे, जमना खोडे, शोभा ठवकर, चंद्रकला डोईफोडे, प्रहार संघटनेचे नितीन बढे, राजेश सावरकर, तुषार वाघ, शैलेश सहारे, तुषशार कोंडे आदींची उपस्थिी होती. वाढती बेरोजगारी व तरुणांसमोर असलेले विविध आवाहने लक्षात घेवून योग्य कार्यवाहीची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.आंदोलनाचा इशाराअतिक्रमण हटाव मोहीम ही शहर विकास हा हेतू डोळ्यासमोर ठेवून राबविल्या जात असली तरी या मोहिमेमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. शहर विकासाला आमचा विरोध नाही; पण पूर्वी या छोट्या व्यावसायिकांना हक्काची जागा द्यावी नंतरच ही मोहीम राबवावी अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण