शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:09 IST

अनेक होतकरू तरुणांसह कामगारांनी कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी मिळेल तेथून कर्ज घेवून शहरातील मुख्य मार्गावर विविध खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने थाटली आहेत.

ठळक मुद्देआंबेडकरवादी एकता मंच व प्रहार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : अनेक होतकरू तरुणांसह कामगारांनी कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी मिळेल तेथून कर्ज घेवून शहरातील मुख्य मार्गावर विविध खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने थाटली आहेत. ही दुकाने अतिक्रमण करून लावण्यात आली असली तरी ती अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान उचलल्या गेल्यावर कसाबसा रोजगार मिळालेले तरुण व कामगार पुन्हा बेरोजगार होतील. परिणामी, मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्यात यावी, अशी मागणी आंबेडकरवादी एकता मंच व प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन ठाणेदारांच्या मार्फत जिल्हाधिकाºयांना पाठविण्यात आले.अनेकांनी कर्ज घेवून मुख्य मार्गावर व इतर ठिकाणी छोटे-मोठे व्यवसाय थाटले आहेत. पान टपरी, चहा टपरी, भाजी विक्री आदी व्यवसायातून हे तरुण व कामगार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत; पण २३ जूनला पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा गजराज अनेकांचा रोजगारच हिरावून घेणार आहे. यामुळे सदर होतकरू तरुणांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बेरोजगारांची व होतकरू तरुणांची समस्या लक्षात घेता राबविण्यात येणारी अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्यात यावी. सर्वप्रथम या छोट्या व्यावसायिकांना स्थानिक नगर परिषदेच्या माध्यमातून व्यवसायासाठी जागा निश्चित करून देण्यात यावी, त्यानंतरच अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन नगरसेवक तथा आंबेडकरवादी एकता मंचचे संयोजक कुंदन जांभुळकर यांच्या नेतृत्त्वात पुलगाव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे यांना देण्यात आले. शिवाय निवेदनाची प्रत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अभय शिंगाडे यांनाही सादर करीत त्यांच्या मार्फत सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. सदर मागणीवर वेळीच विचार करण्यात यावा, अन्यथा बळाचा वापर करून पूर्वी सारखा अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा आम्ही विरोध करू तसेच तीव्र आंदोलन करू, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना नगरसेवक कुंदर जांभुळकर यांच्यासह प्रकाश टेभुर्णे, करूणा टेभुर्णे, जमना खोडे, शोभा ठवकर, चंद्रकला डोईफोडे, प्रहार संघटनेचे नितीन बढे, राजेश सावरकर, तुषार वाघ, शैलेश सहारे, तुषशार कोंडे आदींची उपस्थिी होती. वाढती बेरोजगारी व तरुणांसमोर असलेले विविध आवाहने लक्षात घेवून योग्य कार्यवाहीची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.आंदोलनाचा इशाराअतिक्रमण हटाव मोहीम ही शहर विकास हा हेतू डोळ्यासमोर ठेवून राबविल्या जात असली तरी या मोहिमेमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. शहर विकासाला आमचा विरोध नाही; पण पूर्वी या छोट्या व्यावसायिकांना हक्काची जागा द्यावी नंतरच ही मोहीम राबवावी अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण