शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

राज्य महामार्ग ठरतोय कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 06:00 IST

वर्धा-सालोड (हिरापूर) मार्ग अत्यंत वर्दळीचा आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. दिवसाला हजारावर जड वाहने या मार्गावरून सुसाट धावतात. अशातच महामार्गावरील डांबर उखडून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. खड्ड्यांनी या मार्गावर जाळेच विणल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देवाहनचालकांचा जीवघेणा प्रवास। आजवर झालेत शेकडो अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा-सालोड (हिरापूर) राज्य महामार्गाची ठिकठिकाणी डांबर उखडून दैना झालेली आहे. वाहनचालकांना या मार्गावरून जीवघेणा प्रवास करावा लागत असताना शासन-प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे.वर्धा-सालोड (हिरापूर) मार्ग अत्यंत वर्दळीचा आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. दिवसाला हजारावर जड वाहने या मार्गावरून सुसाट धावतात. अशातच महामार्गावरील डांबर उखडून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. खड्ड्यांनी या मार्गावर जाळेच विणल्याचे दिसून येते. दुचाकीचालकांना येथून मार्गक्रमण करताना तारेवरचीच कसरत करावी लागते. हजारावर खड्डे असल्याने संपूर्ण महामार्गच खड्ड्यात गेल्याचे येथून मार्गक्रमण करताना दिसून येते. सालोड, चिकणी (जामणी) व परिसरातील शेतकऱ्यांना शेतमाल याच मार्गावरून आणावा लागतो.रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकवार शेतमाल भरून असलेले वाहन या दुर्दशित रस्त्यामुळे नादुरुस्त होते. महामंडळाच्या बसेस या मार्गावर नेहमीच नादुरुस्त होताना दिसतात. एकंदरीत मार्गाच्या दुर्दशेमुळे सर्वांनाचा फटका बसत आहे. मार्गाच्या कडाही खचलेल्या असून विरुद्ध दिशेने एकाचवेळी दोन वाहने आल्यास लहान वाहनांना अपघात होतो. नागपूर, वर्ध्यावरून यवतमाळ येथे जाण्यास हा मार्ग सोयीचा आहे. आठवड्यापूर्वी झालेल्या अपघातात दोन युवक जखमी झाले. यापूर्वीही कित्येकांना अपंगत्व आले आहे. सर्वत्र मार्गांचे सिमेंटीकरण केले जात असताना या महामार्गाच्या नूतनीकरणाकडे शासन-प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून संभाव्य धोका लक्षात घेऊन या महामार्गाचे नव्याने बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी सालोड (हिरापूर) व परिसरातील गावांतील नागरिकांनी केली आहे.पाच किलोमीटर महामार्ग खड्ड्यातवर्धा-सालोड (हिरापूर) अंतर पाच ते सहा किलोमीटर आहे. या संपूर्ण महामार्गाची मागील कित्येक दिवसांपासून दुर्दशा झाली आहे. मार्गावर हजारावर खड्डे आहेत. रात्री वाहनचालकांना हे खड्डे दृष्टीस पडत नसल्याने वाहने उसळून अपघात होतात. चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या सुट्या भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.जुन्या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे पाठतुळजापूर-बुट्टीबोरी मार्गाचे काम पूर्णत्वास जात आहे. शहरातही विविध रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले. मात्र, जुन्या रस्त्यांच्या दुरुस्तीसह नूतनीकरणाकडे शासनाचे दुर्लक्ष का होत आहे, हे न उलगडणारे कोडे आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा