शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
4
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
5
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
6
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
7
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
8
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
9
"त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि...", गिरिजा ओकला आलेला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव
10
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
11
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
12
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
13
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
14
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
15
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
16
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
17
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
18
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
19
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
20
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

राज्य महामार्ग ठरतोय कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 06:00 IST

वर्धा-सालोड (हिरापूर) मार्ग अत्यंत वर्दळीचा आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. दिवसाला हजारावर जड वाहने या मार्गावरून सुसाट धावतात. अशातच महामार्गावरील डांबर उखडून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. खड्ड्यांनी या मार्गावर जाळेच विणल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देवाहनचालकांचा जीवघेणा प्रवास। आजवर झालेत शेकडो अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा-सालोड (हिरापूर) राज्य महामार्गाची ठिकठिकाणी डांबर उखडून दैना झालेली आहे. वाहनचालकांना या मार्गावरून जीवघेणा प्रवास करावा लागत असताना शासन-प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे.वर्धा-सालोड (हिरापूर) मार्ग अत्यंत वर्दळीचा आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. दिवसाला हजारावर जड वाहने या मार्गावरून सुसाट धावतात. अशातच महामार्गावरील डांबर उखडून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. खड्ड्यांनी या मार्गावर जाळेच विणल्याचे दिसून येते. दुचाकीचालकांना येथून मार्गक्रमण करताना तारेवरचीच कसरत करावी लागते. हजारावर खड्डे असल्याने संपूर्ण महामार्गच खड्ड्यात गेल्याचे येथून मार्गक्रमण करताना दिसून येते. सालोड, चिकणी (जामणी) व परिसरातील शेतकऱ्यांना शेतमाल याच मार्गावरून आणावा लागतो.रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकवार शेतमाल भरून असलेले वाहन या दुर्दशित रस्त्यामुळे नादुरुस्त होते. महामंडळाच्या बसेस या मार्गावर नेहमीच नादुरुस्त होताना दिसतात. एकंदरीत मार्गाच्या दुर्दशेमुळे सर्वांनाचा फटका बसत आहे. मार्गाच्या कडाही खचलेल्या असून विरुद्ध दिशेने एकाचवेळी दोन वाहने आल्यास लहान वाहनांना अपघात होतो. नागपूर, वर्ध्यावरून यवतमाळ येथे जाण्यास हा मार्ग सोयीचा आहे. आठवड्यापूर्वी झालेल्या अपघातात दोन युवक जखमी झाले. यापूर्वीही कित्येकांना अपंगत्व आले आहे. सर्वत्र मार्गांचे सिमेंटीकरण केले जात असताना या महामार्गाच्या नूतनीकरणाकडे शासन-प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून संभाव्य धोका लक्षात घेऊन या महामार्गाचे नव्याने बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी सालोड (हिरापूर) व परिसरातील गावांतील नागरिकांनी केली आहे.पाच किलोमीटर महामार्ग खड्ड्यातवर्धा-सालोड (हिरापूर) अंतर पाच ते सहा किलोमीटर आहे. या संपूर्ण महामार्गाची मागील कित्येक दिवसांपासून दुर्दशा झाली आहे. मार्गावर हजारावर खड्डे आहेत. रात्री वाहनचालकांना हे खड्डे दृष्टीस पडत नसल्याने वाहने उसळून अपघात होतात. चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या सुट्या भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.जुन्या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे पाठतुळजापूर-बुट्टीबोरी मार्गाचे काम पूर्णत्वास जात आहे. शहरातही विविध रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले. मात्र, जुन्या रस्त्यांच्या दुरुस्तीसह नूतनीकरणाकडे शासनाचे दुर्लक्ष का होत आहे, हे न उलगडणारे कोडे आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा