शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
2
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
3
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
4
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेस; पाकिस्तानला लागणार मिरची..!
5
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
6
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
7
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
8
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
9
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
10
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
11
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
12
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
13
BSE Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
14
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!
15
संतापजनक! ६ मुलं तरी मुखाग्नीसाठी ६ तास थांबले, अंत्यसंस्कारावेळी संपत्तीवरुन स्मशानभूमीत भिडले
16
हत्या की अपघात? रस्त्यावर स्कूटी, शेतात चप्पल... बेपत्ता बँक मॅनेजरचा विहिरीत सापडला मृतदेह
17
जम्मू-काश्मीरमधील दोडामध्ये भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेले वाहन दरीत कोसळले; सात जणांचा मृत्यू
18
Bread Gulabjam: उरलेल्या ब्रेडच्या स्लाईजपासून १० मिनिटात करा मऊ रसरशीत गुलाबजाम! 
19
"मी एक मोठा सिनेमा करतोय...भाऊ कदम अन् 'हा' अभिनेता दिसणार"; निलेश साबळेचा खुलासा
20
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

रेल्वे फाटक चार महिन्यांसाठी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:21 IST

दहेगाव (गावंडे) येथे रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी बोगदा तयार करून तेथून ये-जा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर रेल्वे फाटक बंद करण्यात आले आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांची मागणी : रेल्वे विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : दहेगाव (गावंडे) येथे रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी बोगदा तयार करून तेथून ये-जा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर रेल्वे फाटक बंद करण्यात आले आहे. सदर बोगद्या जवळून नाला गेला असून पावसाळ्याच्या दिवसात नाल्याला पूर आल्यावर ये-जा करणे कठीण होते. यामुळे पावसाळ्याचे चार महिने रेल्वे फाटकाहून ये-जा करण्यास अनुमती देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांची आहे. तसे निवेदन संबंधितांना देण्यात आले आहे.गावामध्ये जाण्यासाठी रेल्वे विभागाने रेल्वे फाटक बंद करून सिमेंटचा बोगदा तयार केला आहे. मात्र, बोगद्या शेजारून नाला गेला असून पावसाळ्याच्या दिवसात तेथून ये-जा करणे धोक्याचे ठरणारे आहे. सदर बोगद्याची निर्मिती करताना रेल्वे विभागातील अभियंत्यांनी काही प्रमाणात स्थानिक नागरिकांचे म्हणणे समजावून घेणे गरजेचे होते. परंतु, तसे करण्यात आले नाही. इतकेच नव्हे तर मनमर्जी कामाचा सपाटाच लावण्यात आला. त्यामुळे पावसाच्या पाण्यात व नाल्याला पूर आल्यावर ये-जा करणाºयांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सदर काम सुरू असताना जेव्हा-जेव्हा तेथील रहिवाशांनी आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा-तेव्हा संबंधितांकडून दुर्लक्षच करण्यात आले. पावसाळ्याच्या दिवसात सदर बोगद्यातून ये-जा करणे धोक्याचे ठरत असल्याने रेल्वे फाटक क्रमांक ८४ हे सूरू ठेवण्यात यावे, अशी मागणी तेथील ग्रामस्थांची आहे. पहिल्याच पावसामुळे तेथील रहिवाशांचा इतर गावांशी संपर्क तुटला होता. त्यानंतर पं.स. सदस्य हेमचंद रंगारी, नागपूरचे माजी नगरसेवक मधु घाटे, गजू दुतारे, गौरव गावंडे, देवेंद्र दुबे, उपसरपंच विजय श्रीरामे, अरविंद खोडके यांनी सदर समस्या खा. रामदास तडस यांच्या समक्ष मांडली. त्यावर खासदार तडस यांनी रेल्वे विभागाच्या नागपूर कार्यालयातील अधिकाऱ्यांशी बोलून योग्य कार्यवाही करण्याचे आश्वान दिले होते. शेतकरी व नागरिकांची समस्या लक्षात घेवून योग्य कार्यवाहीची मागणी आहे.ग्रामस्थांशीच दगाफटका?बोगदा तयार झाल्यावरही रेल्वे फाटकावरून ये-जा सुरू ठेवण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे विभागाच्या अधिकाºयांकडून देण्यात आले होते; पण हे आश्वासन पाळण्याकडे दुर्लक्षच केल्या जात आहे. त्यामुळे रेल्वे विभागाचे अधिकारी व कर्मचारी ग्रामस्थांशी दगाफटका तर करीत नाही ना, असा प्रश्न सध्या नागरिकांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :railwayरेल्वे