शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
6
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
7
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
8
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
9
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
10
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
11
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
12
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

रेल्वे फाटक चार महिन्यांसाठी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:21 IST

दहेगाव (गावंडे) येथे रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी बोगदा तयार करून तेथून ये-जा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर रेल्वे फाटक बंद करण्यात आले आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांची मागणी : रेल्वे विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : दहेगाव (गावंडे) येथे रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी बोगदा तयार करून तेथून ये-जा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर रेल्वे फाटक बंद करण्यात आले आहे. सदर बोगद्या जवळून नाला गेला असून पावसाळ्याच्या दिवसात नाल्याला पूर आल्यावर ये-जा करणे कठीण होते. यामुळे पावसाळ्याचे चार महिने रेल्वे फाटकाहून ये-जा करण्यास अनुमती देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांची आहे. तसे निवेदन संबंधितांना देण्यात आले आहे.गावामध्ये जाण्यासाठी रेल्वे विभागाने रेल्वे फाटक बंद करून सिमेंटचा बोगदा तयार केला आहे. मात्र, बोगद्या शेजारून नाला गेला असून पावसाळ्याच्या दिवसात तेथून ये-जा करणे धोक्याचे ठरणारे आहे. सदर बोगद्याची निर्मिती करताना रेल्वे विभागातील अभियंत्यांनी काही प्रमाणात स्थानिक नागरिकांचे म्हणणे समजावून घेणे गरजेचे होते. परंतु, तसे करण्यात आले नाही. इतकेच नव्हे तर मनमर्जी कामाचा सपाटाच लावण्यात आला. त्यामुळे पावसाच्या पाण्यात व नाल्याला पूर आल्यावर ये-जा करणाºयांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सदर काम सुरू असताना जेव्हा-जेव्हा तेथील रहिवाशांनी आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा-तेव्हा संबंधितांकडून दुर्लक्षच करण्यात आले. पावसाळ्याच्या दिवसात सदर बोगद्यातून ये-जा करणे धोक्याचे ठरत असल्याने रेल्वे फाटक क्रमांक ८४ हे सूरू ठेवण्यात यावे, अशी मागणी तेथील ग्रामस्थांची आहे. पहिल्याच पावसामुळे तेथील रहिवाशांचा इतर गावांशी संपर्क तुटला होता. त्यानंतर पं.स. सदस्य हेमचंद रंगारी, नागपूरचे माजी नगरसेवक मधु घाटे, गजू दुतारे, गौरव गावंडे, देवेंद्र दुबे, उपसरपंच विजय श्रीरामे, अरविंद खोडके यांनी सदर समस्या खा. रामदास तडस यांच्या समक्ष मांडली. त्यावर खासदार तडस यांनी रेल्वे विभागाच्या नागपूर कार्यालयातील अधिकाऱ्यांशी बोलून योग्य कार्यवाही करण्याचे आश्वान दिले होते. शेतकरी व नागरिकांची समस्या लक्षात घेवून योग्य कार्यवाहीची मागणी आहे.ग्रामस्थांशीच दगाफटका?बोगदा तयार झाल्यावरही रेल्वे फाटकावरून ये-जा सुरू ठेवण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे विभागाच्या अधिकाºयांकडून देण्यात आले होते; पण हे आश्वासन पाळण्याकडे दुर्लक्षच केल्या जात आहे. त्यामुळे रेल्वे विभागाचे अधिकारी व कर्मचारी ग्रामस्थांशी दगाफटका तर करीत नाही ना, असा प्रश्न सध्या नागरिकांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :railwayरेल्वे