शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

भदाडी नदीपात्राच्या खोलीकरण कामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:49 IST

कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट, महाराष्ट्र शासन व लोकसहभाग असे संयुक्त विद्यमाने चिकणी जामणी येथे यशोदा नदी खोरे पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत भदाडी नदी पात्राच्या सरळीकरण, रूंदीकरण व खोलीकरण कामाला प्रारंभ झाला आहे.

ठळक मुद्देयशोदा नदी खोरे प्रकल्पांतर्गत कामे प्रगतीपथावर : विहिरी तथा भूजल पाणी पातळी वाढून शेतीला लाभ

ऑनलाईन लोकमतचिकणी (जामणी) : कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट, महाराष्ट्र शासन व लोकसहभाग असे संयुक्त विद्यमाने चिकणी जामणी येथे यशोदा नदी खोरे पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत भदाडी नदी पात्राच्या सरळीकरण, रूंदीकरण व खोलीकरण कामाला प्रारंभ झाला आहे.एक किमी अंतराच्या या कामाचा शुभारंभ चिकणी येथील सरपंच ललीता डफरे, उपसरपंच निलीमा पंधरे, ग्रामविकास अधिकारी जंगम, जलस्त्रोत विकास कार्यक्रम अधिकारी विनोद पारिसे, नवनीत उपाध्याय, चंद्रशेखर मोहिजे, ग्रामसेवक रितेश लाटकर, अभय मून यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी पारिसे यांनी विविध योजना, संस्थेचे कार्य आणि यशोदा नदी खोरे प्रकल्पाच्या महत्त्वाबाबत माहिती विषद केली. भदाडी नदी खोलीकरणाचे काम कमलनयन बजाज फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट, महाराष्ट्र शासन आणि लोकसहभाग अशा संयुक्त प्रयत्नातून केले जात आहे. नदीलगत असलेल्या शेतीचे तथा काठावरील घरांचे दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे मोठे नुसकान होत होते. नदी पात्राच्या खोलीकरण व रूंदीकरणामुळे हे नुकसान टाळता येणार आहे. शिवाय विहिररींची पाण्याची पातळी वाढणार आहे. भूजल पातळी वाढून सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. पर्यायाने उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. शिवाय गुरांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. पुरामुळे पडिक पडलेली जमीन वाहतीखाली येऊन उत्पन्न घेता येणार आहे. जमिनीची सुपिकता वाढणार असून पर्यायाने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.भदाडी नदी पात्राच्या खोलीकरणाचे हे काम एक किमी अंतरात करण्यात येणार आहे. याचा ३१ शेतकऱ्यांना तथा १५१ एकर शेतीला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ होणार आहे. यापूर्वी चिकणी गावामध्ये एकूण ३ किमी लांबीचे काम करण्यात आले असून याद्वारे ९१ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. एकूण या कामामुळे ३८५ एकर शेतीला फायदा होणार आहे. लाभक्षेत्रात येणाऱ्या ३५ विहिरींच्या पाण्याची पातळी वाढणार आहे.सदर यशोदा नदी खोरे प्रकल्प हा जिल्ह्यातील चार तालुक्यांत राबविला जात आहे. यात आर्वी २ गावे, वर्धा ७५ गावे, देवळी ५५ गावे, हिंगणघाट ११ गावे अशा एकूण १४३ गावांमध्ये कामे प्रस्तावित असल्याचेही सांगण्यात आले. कार्यक्रमाला रवी माणिकपुरे, अतुल देशमुख, शेखबाबा देवतळे, नितीन भोयर, नितीन आखुड, अतुल डफरे, दिगांबर वाणी, कमलाकर अलोने, लखन कुंभरे, अंबादास मडकाम, मनोज उईके, रूपेश डायरे, प्रदीप भोयर, विजय डागरे, गजानन मडकाम, झोलबा डायरे, प्रशांत डफरे, राजू तोडाम, दिलीप इंगोले आदींनी सहकार्य केले.चार तालुक्यांतील १४३ गावांमध्ये कामे प्रस्तावितयशोदा नदी खोरे पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये १४३ गावांमध्ये कामे प्रस्तावित आहेत. यात आर्वी तालुक्यातील दोन, वर्धा ७५, देवळी ५५ व हिंगणघाट ११ अशी गावे समाविष्ट आहेत. सध्या चिकणी जामणी येथील कामे सुरू असून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या १२२ शेतकऱ्यांना व ३८५ एकर शेतीला फायदा मिळणार आहे.

टॅग्स :riverनदी