शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

भदाडी नदीपात्राच्या खोलीकरण कामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:49 IST

कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट, महाराष्ट्र शासन व लोकसहभाग असे संयुक्त विद्यमाने चिकणी जामणी येथे यशोदा नदी खोरे पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत भदाडी नदी पात्राच्या सरळीकरण, रूंदीकरण व खोलीकरण कामाला प्रारंभ झाला आहे.

ठळक मुद्देयशोदा नदी खोरे प्रकल्पांतर्गत कामे प्रगतीपथावर : विहिरी तथा भूजल पाणी पातळी वाढून शेतीला लाभ

ऑनलाईन लोकमतचिकणी (जामणी) : कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट, महाराष्ट्र शासन व लोकसहभाग असे संयुक्त विद्यमाने चिकणी जामणी येथे यशोदा नदी खोरे पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत भदाडी नदी पात्राच्या सरळीकरण, रूंदीकरण व खोलीकरण कामाला प्रारंभ झाला आहे.एक किमी अंतराच्या या कामाचा शुभारंभ चिकणी येथील सरपंच ललीता डफरे, उपसरपंच निलीमा पंधरे, ग्रामविकास अधिकारी जंगम, जलस्त्रोत विकास कार्यक्रम अधिकारी विनोद पारिसे, नवनीत उपाध्याय, चंद्रशेखर मोहिजे, ग्रामसेवक रितेश लाटकर, अभय मून यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी पारिसे यांनी विविध योजना, संस्थेचे कार्य आणि यशोदा नदी खोरे प्रकल्पाच्या महत्त्वाबाबत माहिती विषद केली. भदाडी नदी खोलीकरणाचे काम कमलनयन बजाज फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट, महाराष्ट्र शासन आणि लोकसहभाग अशा संयुक्त प्रयत्नातून केले जात आहे. नदीलगत असलेल्या शेतीचे तथा काठावरील घरांचे दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे मोठे नुसकान होत होते. नदी पात्राच्या खोलीकरण व रूंदीकरणामुळे हे नुकसान टाळता येणार आहे. शिवाय विहिररींची पाण्याची पातळी वाढणार आहे. भूजल पातळी वाढून सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. पर्यायाने उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. शिवाय गुरांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. पुरामुळे पडिक पडलेली जमीन वाहतीखाली येऊन उत्पन्न घेता येणार आहे. जमिनीची सुपिकता वाढणार असून पर्यायाने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.भदाडी नदी पात्राच्या खोलीकरणाचे हे काम एक किमी अंतरात करण्यात येणार आहे. याचा ३१ शेतकऱ्यांना तथा १५१ एकर शेतीला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ होणार आहे. यापूर्वी चिकणी गावामध्ये एकूण ३ किमी लांबीचे काम करण्यात आले असून याद्वारे ९१ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. एकूण या कामामुळे ३८५ एकर शेतीला फायदा होणार आहे. लाभक्षेत्रात येणाऱ्या ३५ विहिरींच्या पाण्याची पातळी वाढणार आहे.सदर यशोदा नदी खोरे प्रकल्प हा जिल्ह्यातील चार तालुक्यांत राबविला जात आहे. यात आर्वी २ गावे, वर्धा ७५ गावे, देवळी ५५ गावे, हिंगणघाट ११ गावे अशा एकूण १४३ गावांमध्ये कामे प्रस्तावित असल्याचेही सांगण्यात आले. कार्यक्रमाला रवी माणिकपुरे, अतुल देशमुख, शेखबाबा देवतळे, नितीन भोयर, नितीन आखुड, अतुल डफरे, दिगांबर वाणी, कमलाकर अलोने, लखन कुंभरे, अंबादास मडकाम, मनोज उईके, रूपेश डायरे, प्रदीप भोयर, विजय डागरे, गजानन मडकाम, झोलबा डायरे, प्रशांत डफरे, राजू तोडाम, दिलीप इंगोले आदींनी सहकार्य केले.चार तालुक्यांतील १४३ गावांमध्ये कामे प्रस्तावितयशोदा नदी खोरे पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये १४३ गावांमध्ये कामे प्रस्तावित आहेत. यात आर्वी तालुक्यातील दोन, वर्धा ७५, देवळी ५५ व हिंगणघाट ११ अशी गावे समाविष्ट आहेत. सध्या चिकणी जामणी येथील कामे सुरू असून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या १२२ शेतकऱ्यांना व ३८५ एकर शेतीला फायदा मिळणार आहे.

टॅग्स :riverनदी