शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनायनात एसटीची वाहतूक ‘लॉक’ अन्‌ अपघात ‘डाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 05:00 IST

२०१८ ते २०१९ या वर्षात एसटीला तब्बल ५२ अपघात झाले. यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर २०२०-२०२१ या वर्षात १६ अपघात झाले. यात दोघांना जीव गमवावा लागला. या संपूर्ण प्रकरणात एसटी महामंडळाच्या वतीने संबंधितांना १ कोटी १ लाख ८०४ रुपये नुकसानभरपाई देण्यात आली. एसटीने गावखेड्याशी नाळ जोडली असून  एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास समजला जातो. 

ठळक मुद्देअपघातग्रस्तांना महामंडळाकडून १ कोटी १ लाखांची नुकसानभरपाई

सुहास घनोकारलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या  लॉकडाऊन काळात एसटीची चाके फार मोठ्या काळापर्यंत जागीच थांबल्याने या काळात अपघाताच्या घटनांत लक्षणीय घट झाली. ही बाब दिलासादायक ठरली.२०१८ ते २०१९ या वर्षात एसटीला तब्बल ५२ अपघात झाले. यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर २०२०-२०२१ या वर्षात १६ अपघात झाले. यात दोघांना जीव गमवावा लागला. या संपूर्ण प्रकरणात एसटी महामंडळाच्या वतीने संबंधितांना १ कोटी १ लाख ८०४ रुपये नुकसानभरपाई देण्यात आली. एसटीने गावखेड्याशी नाळ जोडली असून  एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास समजला जातो. यामुळेच ती ग्रामीण प्रवाशांकरिता आधार ठरली आहे. मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू  संसर्गाने देशभरासह राज्यात आणि जिल्ह्यात थैमान घातले. यामुळे तब्बल पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक ठप्प होती. या काळात एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. एसटी बंद राहिल्याने गावगाडादेखील जागीच रुतला होता. ऑक्टोबरअखेर एसटीची वाहतूक पूर्वपदावर आली.  मात्र, यावर्षी मार्च महिन्यापासून पुन्हा कोरोनाचे संकट घोंगावू लागले. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत कोरोनाबाधित रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्या झपाट्याने वाढू लागली. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनअंतर्गत तब्बल ४५ दिवस एसटीची वाहतूक बंद होती.  वर्धा विभागांतर्गत पाच आगार असून एकूण २२८ बसेस आहेत. या संपूर्ण बसेसची चाके जागीच थांबली. यात त्यामुळे २०१८-२०१९ च्या तुलनेत २०२०-२०२१ मध्ये अपघातांना ब्रेक लागला. २०१८-१९ या वर्षात  ५२ अपघात झालेत. यात सहा जणांचा मृत्यू तर ७५ जण जखमी झाले. २०२०-२१ या वर्षात १६ अपघात झालेत. यात १० जण जखमी तर दोघांचा मृत्यू झाला. अपघातातील मृत, गंभीर जखमी आणि अपंगत्व आलेल्या प्रवाशांना १ कोटी १ लाख ८०४ रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. एसटीचा प्रवास सुरक्षित आणि  आर्थिक नुकसानभरपाईची हमी असल्यानेच ग्रामीण शहरीच नव्हे,  तर आता ग्रामीण भागातील प्रवासी एसटीतून प्रवासाला पसंती देत असल्याचे दिसून येते. 

असे आहेत मदतीचे निकषखासगी प्रवासी वाहनांना अपघात झाल्यास प्रवाशांना नुकसानभरपाईची कुठलीही हमी नाही. मात्र, एसटीला अपघात झाल्यास प्रवाशांना महामंडळाकडून नुकसानभरपाई दिली जाते. एसटी अपघातात मृत्यू झाल्यास प्रवाशाच्या कुटुंबीयाला १० लाख रुपये, अपंगत्व आल्यास ५ लाख, गंभीर जखमी झाल्यास १ लाख तर किरकोळ जखमी झाल्यास ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली जाते.

 

टॅग्स :state transportएसटी