शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

कोरोनायनात एसटीची वाहतूक ‘लॉक’ अन्‌ अपघात ‘डाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 05:00 IST

२०१८ ते २०१९ या वर्षात एसटीला तब्बल ५२ अपघात झाले. यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर २०२०-२०२१ या वर्षात १६ अपघात झाले. यात दोघांना जीव गमवावा लागला. या संपूर्ण प्रकरणात एसटी महामंडळाच्या वतीने संबंधितांना १ कोटी १ लाख ८०४ रुपये नुकसानभरपाई देण्यात आली. एसटीने गावखेड्याशी नाळ जोडली असून  एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास समजला जातो. 

ठळक मुद्देअपघातग्रस्तांना महामंडळाकडून १ कोटी १ लाखांची नुकसानभरपाई

सुहास घनोकारलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या  लॉकडाऊन काळात एसटीची चाके फार मोठ्या काळापर्यंत जागीच थांबल्याने या काळात अपघाताच्या घटनांत लक्षणीय घट झाली. ही बाब दिलासादायक ठरली.२०१८ ते २०१९ या वर्षात एसटीला तब्बल ५२ अपघात झाले. यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर २०२०-२०२१ या वर्षात १६ अपघात झाले. यात दोघांना जीव गमवावा लागला. या संपूर्ण प्रकरणात एसटी महामंडळाच्या वतीने संबंधितांना १ कोटी १ लाख ८०४ रुपये नुकसानभरपाई देण्यात आली. एसटीने गावखेड्याशी नाळ जोडली असून  एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास समजला जातो. यामुळेच ती ग्रामीण प्रवाशांकरिता आधार ठरली आहे. मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू  संसर्गाने देशभरासह राज्यात आणि जिल्ह्यात थैमान घातले. यामुळे तब्बल पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक ठप्प होती. या काळात एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. एसटी बंद राहिल्याने गावगाडादेखील जागीच रुतला होता. ऑक्टोबरअखेर एसटीची वाहतूक पूर्वपदावर आली.  मात्र, यावर्षी मार्च महिन्यापासून पुन्हा कोरोनाचे संकट घोंगावू लागले. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत कोरोनाबाधित रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्या झपाट्याने वाढू लागली. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनअंतर्गत तब्बल ४५ दिवस एसटीची वाहतूक बंद होती.  वर्धा विभागांतर्गत पाच आगार असून एकूण २२८ बसेस आहेत. या संपूर्ण बसेसची चाके जागीच थांबली. यात त्यामुळे २०१८-२०१९ च्या तुलनेत २०२०-२०२१ मध्ये अपघातांना ब्रेक लागला. २०१८-१९ या वर्षात  ५२ अपघात झालेत. यात सहा जणांचा मृत्यू तर ७५ जण जखमी झाले. २०२०-२१ या वर्षात १६ अपघात झालेत. यात १० जण जखमी तर दोघांचा मृत्यू झाला. अपघातातील मृत, गंभीर जखमी आणि अपंगत्व आलेल्या प्रवाशांना १ कोटी १ लाख ८०४ रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. एसटीचा प्रवास सुरक्षित आणि  आर्थिक नुकसानभरपाईची हमी असल्यानेच ग्रामीण शहरीच नव्हे,  तर आता ग्रामीण भागातील प्रवासी एसटीतून प्रवासाला पसंती देत असल्याचे दिसून येते. 

असे आहेत मदतीचे निकषखासगी प्रवासी वाहनांना अपघात झाल्यास प्रवाशांना नुकसानभरपाईची कुठलीही हमी नाही. मात्र, एसटीला अपघात झाल्यास प्रवाशांना महामंडळाकडून नुकसानभरपाई दिली जाते. एसटी अपघातात मृत्यू झाल्यास प्रवाशाच्या कुटुंबीयाला १० लाख रुपये, अपंगत्व आल्यास ५ लाख, गंभीर जखमी झाल्यास १ लाख तर किरकोळ जखमी झाल्यास ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली जाते.

 

टॅग्स :state transportएसटी