शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

ST Strike : वर्ध्यात 24 तासांत सव्वासहा लाखांचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2018 14:06 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी वेतन कराराच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी शुक्रवापासून (8 जून) बेमुदत संप सुरू केला आहे

वर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी वेतन कराराच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी शुक्रवापासून (8 जून) बेमुदत संप सुरू केला आहे. आंदोलनकर्त्या कामगारांच्या मागण्यांवर योग्य तोडगा न काढण्यात आल्याने शनिवारी दुस-याही दिवशी आंदोलन सुरूच आहे. आंदोलनादरम्यान अवघ्या 24 तासात रापमच्या वर्धा विभागात दीड शतकाहून अधिक बस फे-या रद्द झाल्याने या विभागाचे सुमारे सव्वा सहा लाखांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात रापमचे वर्धा, पुलगाव, आर्वी, हिंगणघाट व तळेगाव असे पाच आगार आहेत. या पाचही आगारातून दररोज सुमारे ३५९ बस फे-यांचे नियोजन केले जाते. संपाच्या पहिल्या दिवशी केवळ अल्प मनुष्यबळामुळे अनेक बसफे-या रद्द झाल्या होत्या. या संपात रापमचे वाहक व चालकांसह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने रापमच्यावतीने देण्यात येणारी वाहतूक सेवा संपाच्या दुस-या दिवस असलेल्या शनिवारी प्रभावित झाल्याचे दिसून आले.

(ST कर्मचाऱ्यांना संपाचा फटका, पगारात झालेली वाढ सरकार रद्द करणार?)

शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ७६ बस फे-या रद्द झाल्या होत्या. तर शनिवारी दुपारी १२ वाजता केवळ १८८ फे-या सोडण्यात आल्याचे रापमच्या अधिका-यांनी सांगितले. रापम कामगारांच्या या आंदोलनादरम्यान जिल्ह्यातील रापमच्या पाचही आगारात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिसी बंदोबस्तातच रापमच्या वर्धासह पुलगाव, आर्वी, हिंगणघाट व तळेगाव आगारातून बसेस सोडल्या जात होत्या. सदर संपामुळे काही प्रमाणात नागरिकांसह प्रवाशांना अनेक अडचणींचा सामनाच करावा लागला.

आंदोलन तीव्र होण्याचे संकेत

रापमच्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शुक्रवारपासून संप पुकारला असला तरी या संपात कामगार संघटने संपूर्ण तर एमएमकेचे काहीच पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाल्याने पाहिजे तशी रापमची वाहतूक सेवा प्रभावित झालेली नाही. आंदोलनाच्या दुस-याही दिवशी संबंधितांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर विचार न केल्याने शनिवारी विविध संघटनेच्या पदाधिका-यांनी चर्चा केली. येत्या काही तासात मागण्यांवर समाधानकारक तोडगा न काढण्यास इतर संघटनाही या संपात सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे हे आंदोलन पुढील काही दिवसात तीव्र होण्याची शक्यता कर्मचा-यांकडून वर्तविला जात आहे.

आंदोलनात सहभागींचा मागविला अहवाल

बेमुदत संपामुळे रापमची प्रवासी वाहतूक सेवा विस्कळली आहे. या संपाचा सर्वसामान्य नागरिकांसह प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. रापम कर्मचा-यांनी सुरू केलेले आंदोलन गैरकायदेशीर असल्याचा ठपका ठेवत जिल्ह्यातील पाचही आगारातून सदर संपात कोणकोण सहभागी आहे याचा अहवाल रापमच्या विभाग नियंत्रण कार्यालयाने मागवला आहे. तो अहवाल प्राप्त होताच त्यावर काय कार्यवाही केली जाणार, याकडे सा-यांचेच लक्ष लागले आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संप