शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

ST Strike : वर्ध्यात 24 तासांत सव्वासहा लाखांचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2018 14:06 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी वेतन कराराच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी शुक्रवापासून (8 जून) बेमुदत संप सुरू केला आहे

वर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी वेतन कराराच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी शुक्रवापासून (8 जून) बेमुदत संप सुरू केला आहे. आंदोलनकर्त्या कामगारांच्या मागण्यांवर योग्य तोडगा न काढण्यात आल्याने शनिवारी दुस-याही दिवशी आंदोलन सुरूच आहे. आंदोलनादरम्यान अवघ्या 24 तासात रापमच्या वर्धा विभागात दीड शतकाहून अधिक बस फे-या रद्द झाल्याने या विभागाचे सुमारे सव्वा सहा लाखांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात रापमचे वर्धा, पुलगाव, आर्वी, हिंगणघाट व तळेगाव असे पाच आगार आहेत. या पाचही आगारातून दररोज सुमारे ३५९ बस फे-यांचे नियोजन केले जाते. संपाच्या पहिल्या दिवशी केवळ अल्प मनुष्यबळामुळे अनेक बसफे-या रद्द झाल्या होत्या. या संपात रापमचे वाहक व चालकांसह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने रापमच्यावतीने देण्यात येणारी वाहतूक सेवा संपाच्या दुस-या दिवस असलेल्या शनिवारी प्रभावित झाल्याचे दिसून आले.

(ST कर्मचाऱ्यांना संपाचा फटका, पगारात झालेली वाढ सरकार रद्द करणार?)

शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ७६ बस फे-या रद्द झाल्या होत्या. तर शनिवारी दुपारी १२ वाजता केवळ १८८ फे-या सोडण्यात आल्याचे रापमच्या अधिका-यांनी सांगितले. रापम कामगारांच्या या आंदोलनादरम्यान जिल्ह्यातील रापमच्या पाचही आगारात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिसी बंदोबस्तातच रापमच्या वर्धासह पुलगाव, आर्वी, हिंगणघाट व तळेगाव आगारातून बसेस सोडल्या जात होत्या. सदर संपामुळे काही प्रमाणात नागरिकांसह प्रवाशांना अनेक अडचणींचा सामनाच करावा लागला.

आंदोलन तीव्र होण्याचे संकेत

रापमच्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शुक्रवारपासून संप पुकारला असला तरी या संपात कामगार संघटने संपूर्ण तर एमएमकेचे काहीच पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाल्याने पाहिजे तशी रापमची वाहतूक सेवा प्रभावित झालेली नाही. आंदोलनाच्या दुस-याही दिवशी संबंधितांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर विचार न केल्याने शनिवारी विविध संघटनेच्या पदाधिका-यांनी चर्चा केली. येत्या काही तासात मागण्यांवर समाधानकारक तोडगा न काढण्यास इतर संघटनाही या संपात सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे हे आंदोलन पुढील काही दिवसात तीव्र होण्याची शक्यता कर्मचा-यांकडून वर्तविला जात आहे.

आंदोलनात सहभागींचा मागविला अहवाल

बेमुदत संपामुळे रापमची प्रवासी वाहतूक सेवा विस्कळली आहे. या संपाचा सर्वसामान्य नागरिकांसह प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. रापम कर्मचा-यांनी सुरू केलेले आंदोलन गैरकायदेशीर असल्याचा ठपका ठेवत जिल्ह्यातील पाचही आगारातून सदर संपात कोणकोण सहभागी आहे याचा अहवाल रापमच्या विभाग नियंत्रण कार्यालयाने मागवला आहे. तो अहवाल प्राप्त होताच त्यावर काय कार्यवाही केली जाणार, याकडे सा-यांचेच लक्ष लागले आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संप