शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

वर्धा बाजारपेठेत झाली 4.97 कोटींच्या सोयाबीनची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 05:00 IST

आतापर्यंत या बाजारपेठेत एकूण ११ हजार ५० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली असून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला आहे. एकूणच दिवाळीच्या तोंडावर वर्धा बाजारपेठेत  तब्बल ४ कोटी ९७ लाख २५ हजार रुपये किमतीच्या सोयाबीनची उलाढाल झाली आहे. यंदाच्या वर्षी सुरुवातीस उसंत घेत सुरू राहिलेल्या पावसामुळे उभ्या सोयाबीन पिकाला फटका बसला.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळी बोनस अशी सोयाबीन पिकाची ओळख. वर्धा कृषी उत्पन्न बाजारपेठेत सध्या मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक वाढली आहे. आतापर्यंत या बाजारपेठेत एकूण ११ हजार ५० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली असून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला आहे. एकूणच दिवाळीच्या तोंडावर वर्धा बाजारपेठेत  तब्बल ४ कोटी ९७ लाख २५ हजार रुपये किमतीच्या सोयाबीनची उलाढाल झाली आहे. यंदाच्या वर्षी सुरुवातीस उसंत घेत सुरू राहिलेल्या पावसामुळे उभ्या सोयाबीन पिकाला फटका बसला. तर पीक कापणीला आले असतानाही पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे यंदाच्या वर्षी सोयाबीन उत्पादकांच्या पदरी नापिकी येईल, अशी शक्यता वर्तविली जात होती; परंतु ऑक्टोबर महिन्यात पावसाने विश्रांती घेताच जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांनाही दिलासा मिळाला. पावसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांनी सोयाबीन कापणी व मळणीच्या कामांना गती देत सोयाबीन पीक घरी आणले. दिवाळी हा सण येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून आपलीही दिवाळी चांगली व्हावी या हेतूने काही शेतकरी सोयाबीनची विक्री करीत आहेत. वर्धा बाजारपेठत आतापर्यंत ११ हजार ५० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.

वर्धा बाजारपेठेत ५४ परवानाधारक व्यापारी-    जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल ५४ परवानाधारक व्यापारी आहेत. याच परवानाधारक व्यापाऱ्यांकडून वर्धा बाजार समितीच्या यार्डवर शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केले जात आहे. -    शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना चांगली सेवा-सुविधा देण्यासाठी बाजार समिती प्रयत्न करीत आहे.

दिवाळीचे औचित्य साधून मोठ्या संख्येने शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीच्या यार्डवर विक्रीसाठी आणत आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे वेळीच चुकारे द्यावे, अशा सूचना आपण व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना कुठलीही अडचण येत असल्यास त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा.- श्याम कार्लेकर, सभापती, कृ.उ.बा. समिती, वर्धा.

यंदाच्या नवीन हंगामात आतापर्यंत वर्धा बाजार समितीत ११ हजार ५० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला व्यापाऱ्यांकडून सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपये भाव देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनीही चांगल्या भावाचा लाभ घ्यावा.- समीर पेंडके, सचिव, कृ.उ.बा. समिती, वर्धा.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड