शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

वर्धा बाजारपेठेत झाली 4.97 कोटींच्या सोयाबीनची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 05:00 IST

आतापर्यंत या बाजारपेठेत एकूण ११ हजार ५० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली असून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला आहे. एकूणच दिवाळीच्या तोंडावर वर्धा बाजारपेठेत  तब्बल ४ कोटी ९७ लाख २५ हजार रुपये किमतीच्या सोयाबीनची उलाढाल झाली आहे. यंदाच्या वर्षी सुरुवातीस उसंत घेत सुरू राहिलेल्या पावसामुळे उभ्या सोयाबीन पिकाला फटका बसला.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळी बोनस अशी सोयाबीन पिकाची ओळख. वर्धा कृषी उत्पन्न बाजारपेठेत सध्या मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक वाढली आहे. आतापर्यंत या बाजारपेठेत एकूण ११ हजार ५० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली असून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला आहे. एकूणच दिवाळीच्या तोंडावर वर्धा बाजारपेठेत  तब्बल ४ कोटी ९७ लाख २५ हजार रुपये किमतीच्या सोयाबीनची उलाढाल झाली आहे. यंदाच्या वर्षी सुरुवातीस उसंत घेत सुरू राहिलेल्या पावसामुळे उभ्या सोयाबीन पिकाला फटका बसला. तर पीक कापणीला आले असतानाही पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे यंदाच्या वर्षी सोयाबीन उत्पादकांच्या पदरी नापिकी येईल, अशी शक्यता वर्तविली जात होती; परंतु ऑक्टोबर महिन्यात पावसाने विश्रांती घेताच जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांनाही दिलासा मिळाला. पावसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांनी सोयाबीन कापणी व मळणीच्या कामांना गती देत सोयाबीन पीक घरी आणले. दिवाळी हा सण येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून आपलीही दिवाळी चांगली व्हावी या हेतूने काही शेतकरी सोयाबीनची विक्री करीत आहेत. वर्धा बाजारपेठत आतापर्यंत ११ हजार ५० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.

वर्धा बाजारपेठेत ५४ परवानाधारक व्यापारी-    जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल ५४ परवानाधारक व्यापारी आहेत. याच परवानाधारक व्यापाऱ्यांकडून वर्धा बाजार समितीच्या यार्डवर शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केले जात आहे. -    शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना चांगली सेवा-सुविधा देण्यासाठी बाजार समिती प्रयत्न करीत आहे.

दिवाळीचे औचित्य साधून मोठ्या संख्येने शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीच्या यार्डवर विक्रीसाठी आणत आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे वेळीच चुकारे द्यावे, अशा सूचना आपण व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना कुठलीही अडचण येत असल्यास त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा.- श्याम कार्लेकर, सभापती, कृ.उ.बा. समिती, वर्धा.

यंदाच्या नवीन हंगामात आतापर्यंत वर्धा बाजार समितीत ११ हजार ५० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला व्यापाऱ्यांकडून सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपये भाव देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनीही चांगल्या भावाचा लाभ घ्यावा.- समीर पेंडके, सचिव, कृ.उ.बा. समिती, वर्धा.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड