शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

वर्धा बाजारपेठेत झाली 4.97 कोटींच्या सोयाबीनची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 05:00 IST

आतापर्यंत या बाजारपेठेत एकूण ११ हजार ५० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली असून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला आहे. एकूणच दिवाळीच्या तोंडावर वर्धा बाजारपेठेत  तब्बल ४ कोटी ९७ लाख २५ हजार रुपये किमतीच्या सोयाबीनची उलाढाल झाली आहे. यंदाच्या वर्षी सुरुवातीस उसंत घेत सुरू राहिलेल्या पावसामुळे उभ्या सोयाबीन पिकाला फटका बसला.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळी बोनस अशी सोयाबीन पिकाची ओळख. वर्धा कृषी उत्पन्न बाजारपेठेत सध्या मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक वाढली आहे. आतापर्यंत या बाजारपेठेत एकूण ११ हजार ५० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली असून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला आहे. एकूणच दिवाळीच्या तोंडावर वर्धा बाजारपेठेत  तब्बल ४ कोटी ९७ लाख २५ हजार रुपये किमतीच्या सोयाबीनची उलाढाल झाली आहे. यंदाच्या वर्षी सुरुवातीस उसंत घेत सुरू राहिलेल्या पावसामुळे उभ्या सोयाबीन पिकाला फटका बसला. तर पीक कापणीला आले असतानाही पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे यंदाच्या वर्षी सोयाबीन उत्पादकांच्या पदरी नापिकी येईल, अशी शक्यता वर्तविली जात होती; परंतु ऑक्टोबर महिन्यात पावसाने विश्रांती घेताच जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांनाही दिलासा मिळाला. पावसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांनी सोयाबीन कापणी व मळणीच्या कामांना गती देत सोयाबीन पीक घरी आणले. दिवाळी हा सण येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून आपलीही दिवाळी चांगली व्हावी या हेतूने काही शेतकरी सोयाबीनची विक्री करीत आहेत. वर्धा बाजारपेठत आतापर्यंत ११ हजार ५० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.

वर्धा बाजारपेठेत ५४ परवानाधारक व्यापारी-    जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल ५४ परवानाधारक व्यापारी आहेत. याच परवानाधारक व्यापाऱ्यांकडून वर्धा बाजार समितीच्या यार्डवर शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केले जात आहे. -    शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना चांगली सेवा-सुविधा देण्यासाठी बाजार समिती प्रयत्न करीत आहे.

दिवाळीचे औचित्य साधून मोठ्या संख्येने शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीच्या यार्डवर विक्रीसाठी आणत आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे वेळीच चुकारे द्यावे, अशा सूचना आपण व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना कुठलीही अडचण येत असल्यास त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा.- श्याम कार्लेकर, सभापती, कृ.उ.बा. समिती, वर्धा.

यंदाच्या नवीन हंगामात आतापर्यंत वर्धा बाजार समितीत ११ हजार ५० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला व्यापाऱ्यांकडून सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपये भाव देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनीही चांगल्या भावाचा लाभ घ्यावा.- समीर पेंडके, सचिव, कृ.उ.बा. समिती, वर्धा.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड