शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाणे महागले

By admin | Updated: June 15, 2014 23:44 IST

मागील वर्षी अतिवृष्टी व गारपीटीच्या कटू आठवणी विसरुन शेतकरी पुन्हा खरीपाच्या तयारीला लागला आहे; परंतु यंदा सोयाबीन बियाण्यांच्या किमतीत अव्वाच्या सव्वा वाढ केली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकरी हवालदिल : खरिपाची तयारी सुरूपिंपळखुटा : मागील वर्षी अतिवृष्टी व गारपीटीच्या कटू आठवणी विसरुन शेतकरी पुन्हा खरीपाच्या तयारीला लागला आहे; परंतु यंदा सोयाबीन बियाण्यांच्या किमतीत अव्वाच्या सव्वा वाढ केली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.गत वर्षीच्या तुलनेत यंदा कपाशी बियाण्यांच्या किमतीत थोडीफार वाढ झाली. मात्र सोयाबीन बियाण्यात ७०० ते ८०० रुपयांची वाढ झाली आहे. सोयाबीन हे मुख्यत्वेकरुन कोरडवाहू पीक आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वरच्या पावसावरच अवलंबून राहावे लागते. त्यातच पाऊस कमी झाला किंवा मान्सून उशीराने पोहोचला तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागते. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीनचे पीक वाया गेले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरी पारंपरिक बियाणे राहिलेले नाही. त्याला बियाणे विकत घेण्याची वेळ आली आहे. पण बियाण्यांच्या वाढलेल्या किंमतीमुळे शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा वाढविण्याचा विचार केलेला दिसत आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच बियाण्यांच्या वाढत्या किंमतींमुळे आर्थिक संकट ओढवले आहे. लग्नसराईची घाई आता संपत आली आहे. शेतकरी आता खरीपाच्या कामासाठी आतूर झाला आहे. मान्सून वेळेवर येणार असे वर्तविण्यात आले होते. आता मात्र मान्सून लांबणीवर जाणार असल्याचे संकेत दिसत आहे. त्यामुळे शेतकरी मृगाच्या प्रतीक्षेत आहे. खरीप हंगामाच्या पूर्व तयारीचा भाग म्हणून या दिवसात शेती मशागतीची कामे केली जातात; मात्र यंदा पेरणीयोग्य जमीन तयार करण्याकरिता लागणाऱ्या खर्चात एकरी २०० ते ३०० रुपये वाढ झाली आहे. परिणामी शेतजमीन तयार करण्याचे काम महागले आहे. या काही वर्षात प्रगतीपेक्षा शेतकरी वर्गाची पिछेहाट होताना दिसत आहे. कधी काळी शेतीची अवजारे, खते, बी-बियाण्यांबाबत स्वावलंबी असलेला हा वर्ग आता प्रत्येक बाबतीत परावलंबी झाला आहे. बैलजोडी सांभाळणे खर्चिक बाब झाल्याने पशुधन विकीस निघाले आहे. ट्रॅक्टरचा उपायोग सर्वत्र केला जात आहे. यावर्षी वाढलेले बियाण्याचे भाव, महागडा मशागतीचा खर्च, मजुरांचे वाढलेले दर या सर्व समस्येला बाजुला ठेवून शेतकरी पुन्हा नफ्यातोट्याच्या शेतीकरीता सज्ज झाल्याचे दिसत आहे.(वार्ताहर)