शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

सोयाबीनवर खोडकिडीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:46 IST

अस्मानी व सुल्तानी संकटांचा सामना यंदाही देवळी तालुक्यातील विजयगोपाल परिसरातील शेतकऱ्यांना करावा लागत असल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. या परिसरात सोयाबीन पिकावर सध्या खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची वाढली चिंता : कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अस्मानी व सुल्तानी संकटांचा सामना यंदाही देवळी तालुक्यातील विजयगोपाल परिसरातील शेतकऱ्यांना करावा लागत असल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. या परिसरात सोयाबीन पिकावर सध्या खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.देवळी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा कपाशी व तूर पिकाला फाटा देत सोयाबीन पिकाची लागव केली. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पेरणीच्या कामाला गती मिळाली. वेळोवेळी योग्य निगा घेतल्याने सोयाबीन पिकांची वाढही बऱ्यापैकी झाली; पण अशातच सध्या सोयाबीन पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. देवळी तालुक्यातील विजयगोपाल परिसरात सदर रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. खोडकिडीच्या प्रादुर्भावातून सोयाबीन पीक कसे वाचविता येईल यासाठी सध्या शेतकरी प्रयत्नही करीत आहेत. मात्र, पाहिजे तसे यश त्यांना येत नसल्याचे शेतकरी सांगतात. विजयगोपाल भागातील विश्वेश्वर अवसरे, अभिलाश ढांगे, विजय पेटकर, राहूल पेटकर, मयुर अवसरे या शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या सोयाबीन पिकावर सध्या खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते. खोडकिडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच तो दूर सारण्यासाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी या भागातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आहे.दोन शेतकऱ्यांनी मोडले पीकखोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे विजयगोपाल परिसरातील दोन शेतकऱ्यांची उभे सोयाबीन पीक मोडले आहे. वसंत रंधये व सतीश पेठे या शेतकऱ्यांनी लागवड केलेले सोयाबीन पीक खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे मुळासकट उपटल्याचे सांगण्यात येते. त्यांना यंदा खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसानच सहन करावे लागल्याने त्यांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरऱ्यांची आहे.उत्पादनात घट येण्याची भीतीखोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सदर रोगाच्या प्रादुर्भावामुळे उभे पीक करपल्यागत होत असल्याने यंदा उत्पादनात घट येण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती