शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

सोयाबीनवर खोडकिडीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:46 IST

अस्मानी व सुल्तानी संकटांचा सामना यंदाही देवळी तालुक्यातील विजयगोपाल परिसरातील शेतकऱ्यांना करावा लागत असल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. या परिसरात सोयाबीन पिकावर सध्या खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची वाढली चिंता : कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अस्मानी व सुल्तानी संकटांचा सामना यंदाही देवळी तालुक्यातील विजयगोपाल परिसरातील शेतकऱ्यांना करावा लागत असल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. या परिसरात सोयाबीन पिकावर सध्या खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.देवळी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा कपाशी व तूर पिकाला फाटा देत सोयाबीन पिकाची लागव केली. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पेरणीच्या कामाला गती मिळाली. वेळोवेळी योग्य निगा घेतल्याने सोयाबीन पिकांची वाढही बऱ्यापैकी झाली; पण अशातच सध्या सोयाबीन पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. देवळी तालुक्यातील विजयगोपाल परिसरात सदर रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. खोडकिडीच्या प्रादुर्भावातून सोयाबीन पीक कसे वाचविता येईल यासाठी सध्या शेतकरी प्रयत्नही करीत आहेत. मात्र, पाहिजे तसे यश त्यांना येत नसल्याचे शेतकरी सांगतात. विजयगोपाल भागातील विश्वेश्वर अवसरे, अभिलाश ढांगे, विजय पेटकर, राहूल पेटकर, मयुर अवसरे या शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या सोयाबीन पिकावर सध्या खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते. खोडकिडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच तो दूर सारण्यासाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी या भागातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आहे.दोन शेतकऱ्यांनी मोडले पीकखोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे विजयगोपाल परिसरातील दोन शेतकऱ्यांची उभे सोयाबीन पीक मोडले आहे. वसंत रंधये व सतीश पेठे या शेतकऱ्यांनी लागवड केलेले सोयाबीन पीक खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे मुळासकट उपटल्याचे सांगण्यात येते. त्यांना यंदा खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसानच सहन करावे लागल्याने त्यांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरऱ्यांची आहे.उत्पादनात घट येण्याची भीतीखोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सदर रोगाच्या प्रादुर्भावामुळे उभे पीक करपल्यागत होत असल्याने यंदा उत्पादनात घट येण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती