शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
4
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
5
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
6
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
7
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
8
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
9
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
10
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
11
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
12
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
13
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
14
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
15
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
16
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
17
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
18
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
19
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
20
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन उत्पादकांच्या खात्यात १३ कोटी ७२ लाखांचा पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 05:00 IST

जिल्ह्यात २०२०-२०२१ च्या खरीप हंगामात १ लाख ३८ हजार २४१ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. यापैकी केवळ ७ हजार २६६ हेक्टरकरिता ८ हजार ५११ शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले होते. मागील वर्षी सोयाबीन पिकांचे ऑगस्ट महिन्यात पडलेल्या अति पावसामुळे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर चक्रभुंगा आणि खोडमाशी या किडीमुळे सोयाबीनची उत्पादकता कमी झाली. 

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : ८ हजार १९८ लाभार्थींना नुकसानभरपाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतीचा व्यवसाय हा बेभरवशाचा झाला आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ तर कधी गारपीट आणि यातूनही पीक वाचले तर किडीचा प्रादुर्भाव असतोच. त्यामुळे पीक घरी येईपर्यंत शेतकऱ्याला काहीच शाश्वती नसते. म्हणूनच शासनाने शेतकऱ्यांना संकटकाळात दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु केली. गेल्या हंगामात सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील ८ हजार १९८ सोयाबीन उत्पादकांना या पीक विम्याने तारले आहे. या शेतकऱ्यांना १३ कोटी ७२ लाख १४ हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे.जिल्ह्यात २०२०-२०२१ च्या खरीप हंगामात १ लाख ३८ हजार २४१ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. यापैकी केवळ ७ हजार २६६ हेक्टरकरिता ८ हजार ५११ शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले होते. मागील वर्षी सोयाबीन पिकांचे ऑगस्ट महिन्यात पडलेल्या अति पावसामुळे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर चक्रभुंगा आणि खोडमाशी या किडीमुळे सोयाबीनची उत्पादकता कमी झाली. अशा परिस्थितीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेतलेल्या  शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळाली आहे. मागील वर्षी कर्ज घेतलेल्या ८ हजार १०६ तर कर्ज न घेतलेल्या ४०५ शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा काढला होता. यामध्ये ७ हजार २६६ हेक्टर क्षेत्र अंतर्भूत झाले होते. तर १ लक्ष ३०  हजार ९७५ हेक्टर क्षेत्राचा विमा काढण्यात आला नव्हता. विमा काढलेल्या ८ हजार ५११ शेतकऱ्यांनी ६५ लक्ष ४० हजार रुपये पीक विम्यापोटी भरले होते. सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने १२ मंडळामध्ये झालेल्या पीक कापणी प्रयोगात सोयाबीनचे उंबरठा उत्पादन कमी आले. त्यामुळे ८ हजार १९८ शेतकऱ्यांना १३ कोटी ७२ लाख १४ हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. त्यामुळे पाऊस आणि किडीमुळे पीक घरात न आलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्यामुळे थोडा तरी दिलासा मिळाला. मात्र ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला नाही त्यांना मात्र नुकसानीचा सामना करावा लागला.  

पूर्वी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीकविमा योजना बंधनकारक करण्यात आली होती. मात्र मागील वर्षीपासून ऐच्छिक केली आहे. त्यामुळे पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. नुकसान भरपाई मिळण्यासाठी यावर्षी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेती