शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

रस्त्याअभावी सोयाबीन शेतातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:23 IST

शेतकऱ्यांना शेताची वहिवाट करता यावी म्हणून पांदण रस्त्यांची निर्मिती केली गेली. पण कालांतराने पांदण रस्त्यांवर अतिक्रमण झाले. काही रस्ते नष्ट झाले तर काहींची आता दुरूस्ती होत आहे. असे असले तरी अनेक शेतांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग नसल्याने शेतकºयांची अडचण होत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्याचे नुकसान : दोन अवैध नाल्यांनी अडविली शेताची वाट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना शेताची वहिवाट करता यावी म्हणून पांदण रस्त्यांची निर्मिती केली गेली. पण कालांतराने पांदण रस्त्यांवर अतिक्रमण झाले. काही रस्ते नष्ट झाले तर काहींची आता दुरूस्ती होत आहे. असे असले तरी अनेक शेतांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग नसल्याने शेतकºयांची अडचण होत आहे. देवळी तालुक्यातील मौजा मुसलाबाद येथे असाच प्रकार होत असून दोन नाल्यांनी शेताची वाट अडविली आहे. परिणामी सोयाबीन शेतातच ढिग मारून आहे. अद्याप ते काढता न आल्याने शेतकºयाचे नुकसान होत आहे.देवळी ते अंदोरी मार्गावर रायपूर गावाजवळ मौजा मुसलाबाद येथे वर्धेतील आशिष पावडे यांची तीन एकर शेती आहे. खरीप हंगामात त्यांनी शेतात सोयाबीन आणि तुरीची पेरणी केली होती. यातील सोयाबीनची कापणी करण्यात आली असून ते ढीग लावून शेतात ठेवण्यात आले आहे. सोयबीन काढण्याकरिता थ्रेशर, हडंबा यासारखे यंत्रसाहित्य शेतात घेऊन जाणे गरजेचे असते; पण शेतात जाण्याकरिता रस्ताच राहिला नसल्याने सोयाबीनची काढणी रखडली आहे. मुसलाबाद येथील पावडे यांच्या शेतालगत दोन नाल्या होत्या. त्या नाल्यांचे रूपांतर मोठ्या नाल्यामध्ये झाले आहे. सध्या रबी हंगामाकरिता कालव्यामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे शेतालगतचे दोन्ही नाले तुडूंब भरले आहेत. परिणामी, शेतात जाण्याकरिता रस्ताच राहिला नसल्याचे शेतकºयाकडून सांगितले जात आहे.याबाबत संबंधित शेतकºयाने पाटबंधारे विभागाकडे विचारणा केली. सदर विभागातील अधिकाºयांनी चौकशी केली असता दोन्ही नाले अवैध आहेत. ते कुणीही खोदलेले नाहीत. पाटबंधारे विभागानेही सदर कालव्याचे काम केलेले नाही, ही बाब समोर आले. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनीही हात वर केले आहेत. परिणामी, शेतकºयाने दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोयाबीन काढणीचा हंगाम उलटला असून परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारपेठेत विकलेही गेले आहे; पण पावडे यांना शेतात जाण्याकरिता रस्ताच नसल्याने अद्याप सोयाबीनची काढणीही करता आली नाही. परिणामी, त्यांच्यावर कर्जबाजारी होऊन जगण्याची वेळ आली आहे.पांदण रस्ता तयार करणे तथा नाले बुजविण्याची मागणीमुसलाबाद येथील पावडे यांच्या शेतात जाण्याकरिता कुठलाही रस्ता राहिलेला नाही. पांदण रस्त्यावर सर्वत्र झुडपांचे साम्राज्य आहे तर जो रस्ता होता त्याची वाट नाल्यांनी अडविली आहे. परिणामी, शेतातील शेतमाल घरी आणणेही कठीण झाले आहे. खरीप हंगामातीलच शेतमाल घरी आणता आला नाही तर तूर पिकाचे काय होणार आणि रबी हंगामातील पेरणी कशी करावी, आदी चिंता शेतकऱ्याला त्रस्त करीत आहे. महसूल प्रशासनाने पांदण रस्ता मोकळा करून त्याची दुरूस्ती करावी तथा नाले बुजवून शेताची वहिवाट करण्याकरिता रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी